शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

नातेवाईकही वाळीत चार पिढ्यांपासून ३० कुटुंबांच्या वाट्याला उपेक्षा

By admin | Updated: October 10, 2016 01:06 IST

अरुण वाघमोडे , अहमदनगर आंतरजातीय विवाह केल्याने ६० वर्षांपूर्वी श्रीगोंदा फॅक्टरी येथील एका तिरमली कुटुंबासह त्यांच्या नातेवाइकांना याच समाजातील जातपंचायतीने

अरुण वाघमोडे , अहमदनगरआंतरजातीय विवाह केल्याने ६० वर्षांपूर्वी श्रीगोंदा फॅक्टरी येथील एका तिरमली कुटुंबासह त्यांच्या नातेवाइकांना याच समाजातील जातपंचायतीने वाळीत टाकले़ तीन पिढ्या लोटल्या. या कुुटुंबांचा मोठा विस्तार विस्तार झाला़ जातपंचायतीने ठेवलेला ठपका मात्र आजही कायम आहे़ ३० कुटुंबांतील सुशिक्षित झालेली चौथी पिढी आता जातीत सामील करून घेण्यासाठी संघर्ष करत आहे़ जातीत घ्यावे, यासाठी २० लाख रुपये देण्याचे मान्य केले, तरी पंचांनी जातीत न घेतल्याने आता त्यांनी कायदेशीर मार्गाने लढा सुरू केला आहे़ श्रीगोंदा फॅक्टरीजवळील रस्त्याच्या कडेला असलेल्या जोशी वस्तीत ४०० भटके विमुक्त कुटुंब गेली अनेक वर्षे वास्तव्यास आहेत़ तिरमली कुटुंबातील ३० ते ४० कुटुंबही येथे राहतात़ ६० वर्षांपर्वी या कुटुंबात दुसऱ्या जातीतील महिला आल्याने त्यांना बहिष्कृत केले़ बहिष्कृत केलेल्या कुटुंबांतील मुला-मुलींचे कुठेच लग्न जमेनात़ पर्याने या कुुटुंबांना पुन्हा आंतरजातीय विवाह करण्याची वेळ आली़ तेव्हा पुन्हा जातपंचायत बसली आणि या कुटुंबांवर ठपका ठेवण्यात आला़ आज या २५ ते ३० कुटुंबांत १३० पेक्षा जास्त लोकसंख्या आहे. अनेक मुली दहावी, बारावी, तर दहा ते बारा मुले पदवीचे शिक्षण घेत आहेत़ अनेकांची पक्की घरेही आहेत़ मात्र केवळ जातपंचायतीने बहिष्कृत केल्याने या कुटुंबांतील मुले आणि मुलींची कुठेच सोयरीक जमेना़ यांच्याशी नाते जोडले, तर आपल्यालाही पंच बहिष्कृत करतील, अशी या समाजातील लोकांना भीती आहे़ तर ज्यांनी या बहिष्कृत कुटुंबांशी नाते जोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना धमकी देऊन नाते तोडण्यास भाग पाडले़ सार्वजनिक कार्यक्रमात या कुटुंबांना सामील करून घेतले जात नाही़ अंत्यविधीसाठीही त्यांच्याकडे कुणाला येऊ दिले जात नाही़ उपेक्षित जीवन जगण्याची वेळ या कुटुंबांवर आली आहे़ जातीपंचायतीसमोर व्यथा मांडूनही त्यांची दखल घेतली नाही़ ४श्रीगोंदा फॅक्टरी येथील बहिष्कृत केलेल्या कुटुंबांतील मंगल गायकवाड, सुरेश पालवे, राहुल गायकवाड, चंदर पालवे, अण्णा गायकवाड, गंगाराम गायकवाड आदी सुशिक्षित तरुणांनी या जातपंचायतीविरोधात कायदेशीर मार्गाने लढा देण्याचे निर्णय घेतला आहे़ या लढ्यात लोकाधिकारी आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड़ अरुण जाधव यांनी पुढाकार घेतला आहे़ आठ दिवसांपूर्वी जाधव यांच्या नेतृत्वाखाली या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले़ श्रीगोंदा फॅक्टरी येथून दुसरीकडे वास्तव्यास गेलेल्या या कुटुंबातील नातेवाइकांनाही जातपंचायतीने बहिष्कृत केले आहे़ यामध्ये कोपरगाव ३, आष्टी १, संगमनेर २, पाटसरा ४, तर शेवगाव येथील २ कुटुंबांना वाळीत टाकण्यात आले आहे़