शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रखडलेल्या महामार्गाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 11:24 IST

हरिहर गर्जे पाथर्डी : कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गांतर्गत पाथर्डी तालुक्यातील १३० कोटी रूपये खर्चाच्या या महामार्गाचे काम गेल्या तीन ...

हरिहर गर्जेपाथर्डी : कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गांतर्गत पाथर्डी तालुक्यातील १३० कोटी रूपये खर्चाच्या या महामार्गाचे काम गेल्या तीन वर्षांपासून रखडले आहे. ठिकठिकाणी रस्ता खोदून ठेवल्याने तसेच खड्डे पडल्याने प्रवाशांना वारंवार अपघाताला सामोरे जावे लागत आहे. या गंभीर समस्येकडे लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या नुतनीकरणासाठी १३० कोटी रूपये आर्थिक तरतूद करण्यात येऊन गेल्या तीन वर्षांपासून नुतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु २०१६ पासून अर्धवटच काम असल्याने या महामार्गाने प्रवास करणाºया शेकडो निष्पाप प्रवाशांचे अपघात होत आहेत. याबाबत स्थानिक राजकीय पदाधिकारी,विरोधक यांनी तेवढ्यापुरती आंदोलने केली. पण पुढे आंदोलनाचा हा जोर चमत्कारिकरित्या ओसरताना दिसत आहे. परंतुसत्ताधारी पुढाºयांनी याप्रश्नाकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे.याबाबत आवाज उठविण्यात अपयशी ठरलेल्या लोकप्रतिनिधींविरूद्ध संताप व्यक्त करण्यात येत आहे.परिस्थितीचा गैरफायदा घेत स्थानिक गुंडांनी ठेकेदाराची अडवणूक करून महामार्गाच्या बांधकाम साहित्य व मोठ्या प्रमाणावर गौण खनिजांची चोरी करीत लाखो रूपये कमविले आहेत. असे प्रकार राजरोस घडत असल्याने या कामाचा ठेकेदार तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत आहे. दिवसेंदिवस तोटा सहन करावा लागत असल्याने या कामाच्या उपठेकेदारांमध्ये आपसात देवघेवीवरून वाद निर्माण झाले आहेत.ठेकेदाराने निविदेत नसलेली नियमबाह्य कामे केल्याने या कामाची बिले रखडली आहेत. आंदोलनांना वैतागलेल्या महामार्ग अधिकाºयांनी आपल्या बदल्या दुसरीकडे करून घेतल्या आहेत. त्यामुळे महामार्गाचे काम अत्यंत कासवगतीने सुरू आहे.मोठ्या प्रमाणात अपघातांची संख्या वाढून हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. जी.डी.सी.एल कंपनीकडे साडे सहा कोटी रूपये व अतिरिक्त कामाचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे २० कोटी रूपयांची बिले अडकली आहेत. मुख्य ठेकेदार व आमच्यातील बँक खाते स्वतंत्र करून थकीत बिले मिळाल्यास लवकरच सर्व कामे पूर्ण करू - रवींद्र कासार, ठेकेदार.दोन ठेकेदारांमधील वादामुळे महामार्गाचे काम रखडले आहे. त्याबाबत वरिष्ठ स्तरावरून कार्यवाही सुरू आहे. - बी.बी.नन्नवरे, अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी