शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

पर्यावरणावर आधारीत संवेदनशील कलाकृतींची गरज : पोपटराव पवार

By साहेबराव नरसाळे | Updated: June 10, 2023 17:27 IST

न्यू आर्टस् महाविद्यालयात आयोजित दुसऱ्या राष्ट्रीय पर्यावरण चित्रपट महोत्सवात ते बोलत होते. 

अहमदनगर : दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल ढासळत असून याबाबत आपण उदासीन होत असल्याचं चित्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरणाबाबत प्रबोधन करणाऱ्या संवेदनशील लघुपट, माहितीपटांची निर्मिती होणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी अहमदनगर येथे केले. न्यू आर्टस् महाविद्यालयात आयोजित दुसऱ्या राष्ट्रीय पर्यावरण चित्रपट महोत्सवात ते बोलत होते. 

अहमदनगर शहरातील रंगभूमी संस्थेच्या संकल्पनेतून अहमदनगर महानगरपालिका आणि न्यू आर्ट्स महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित केला होता. यात पुणे येथील 'डे झिरो' या लघुपटाने प्रथम क्रमांक पटकावला. यंदाचे हे दुसरे वर्ष असून मागील वर्षीच्या तुलनेत पर्यावरणावर भाष्य करणाऱ्या लघुपट व माहितीपटांची संख्या कमी होत असल्याची खंत आयोजक कृष्णा बेलगावकर यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यू आर्टस् महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्करराव झावरे, दिग्दर्शक मंगेश बदर आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, माणसाने निसर्गाकडे दुर्लक्ष केल्यामुळे पर्यावरणाच्या अनेक समस्या जास्त प्रमाणात जाणवत आहेत. पुढील काळात चित्रपट, लघुपट यांसारख्या प्रभावी माध्यमांच्या मदतीने या समस्यांवर भाष्य झाले पाहिजे. कृषिमित्र पुरस्कारप्राप्त डॉ. वने, सचिन ठुबे, राहुल रसाळ आणि सुर्यकांत नेटके यांच्यासारखे शेतकरी असतील तर पुढील काही वर्षांत शेती व्यवसाय आणि शेतकरी हेच महत्वाचे घटक असतील, असे सांगत पवार यांनी त्यांचेही कौतुक केले. 

वीणा दिघे यांनी सूत्रसंचालन केले. रंगभूमीचे कृष्णा बेलगावकर यांनी आभार मानले. रंगभूमीचे समन्वयक आकाश गोटीपामुल, प्रा. अक्षय अंबाडे, मनीषा सानप, अभिजित भालेराव, शिवाजी तुले, दिपेश शिंदे, किशोर शिंदे यांनी हा महोत्सवासाठी परिश्रम घेतले.

विजेत्यांचा सन्मानपर्यावरण महोत्सवात प्रथम क्रमांक पुणे येथील शुभम पांडव दिग्दर्शित 'डे झिरो' या लघुपटाला तर द्वितीय क्रमांक सुहास तरंगे दिग्दर्शित 'कोलाहल' आणि तृतीय क्रमांक प्रवीण खाडे दिग्दर्शित 'ताजमहल' या लघुपटास प्रदान करण्यात आला. बारामती येथील प्रा. राहुल चौधरी यांनी या लघुपटांचे परीक्षण केले. विजेत्या लघुपटांना रोख बक्षीसे देऊन सन्मानित करण्यात आले.

डॉ.वने, ठुबे, रसाळ, नेटके यांना कृषिमित्र पुरस्कार प्रदान   राष्ट्रीय पर्यावरण चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने निसर्गमित्र विशेष पुरस्कार हवामान तज्ञ पंजाबराव डख यांना जाहीर करण्यात आला. तसेच डॉ. दत्तात्रय वने, सचिन ठुबे, राहुल रसाळ, सूर्यकांत नेटके यांना पवार यांच्या हस्ते 'कृषिमित्र' पुरस्कार प्रदान करण्यात आला.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर