शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
4
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
5
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
6
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
7
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
8
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
9
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
11
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
12
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
13
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
14
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
15
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
16
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
17
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
18
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
19
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
20
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?

वैद्यकीय प्रवेशासाठी ‘नीट’च आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:27 IST

चंद्रकांत शेळके अहमदनगर : नीट परीक्षा न देता वैद्यकीय प्रवेश देण्याचा निर्णय तामिळनाडू सरकारने घेतला आहे. परंतु हा निर्णय ...

चंद्रकांत शेळके

अहमदनगर : नीट परीक्षा न देता वैद्यकीय प्रवेश देण्याचा निर्णय तामिळनाडू सरकारने घेतला आहे. परंतु हा निर्णय चुकीचा असून भावी दर्जेदार डाॅक्टर घडवायचे असतील तर ‘नीट’द्वारेच वैद्यकीय प्रवेश असावा, अशा प्रतिक्रिया तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहेत.

एमबीबीएस, बीडीएस, बीएचएमएस, बीएएमएस, बीयूएमएस आदी वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणारी नीट (राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा) परीक्षा दरवर्षी देशभरात एकाच दिवशी 'नॅशनल टेस्टिंग एजन्सी'कडून (एनटीए) घेण्यात येते. यंदाची परीक्षा १२ सप्टेंबर रोजी झाली. या परीक्षेच्या एक दिवस आधी तामिळनाडूतील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. त्याचे पडसाद तामिळनाडू विधानसभेत उमटले. त्याचा परिणाम म्हणून नीट परीक्षेतून सूट देणारे विधेयक तामिळनाडू विधानसभेत संमत करण्यात आले. त्यामुळे तेथे आता वैद्यकीय प्रवेश नीट परीक्षेऐवजी बारावी परीक्षेच्या गुणांवर होणार आहेत. याच धर्तीवर इतर राज्यांतही प्रवेश व्हावेत का? नीट रद्द केल्याचा निर्णय योग्य आहे का? याबाबत जिल्ह्यातील काही तज्ज्ञांशी चर्चा केली असता तामिळनाडूचा निर्णय चुकीचा असल्याचे सर्वांचे एकमत झाले. नीट परीक्षा देशपातळीवर एकाचवेळी होत असल्याने सर्व विद्यार्थ्यांचे समान मूल्यमापन होते. त्यातून सर्वांची गुणवत्ता सिद्ध करता येते. वैद्यकीयसारख्या जोखमीच्या क्षेत्रात गुणवत्ता सिद्ध व्हायलाच पाहिजे. त्यासाठी नीट हाच पर्याय असू शकतो. त्याला कोणत्याही सरकारने शाॅर्टकट देऊ नये, असे तज्ज्ञांचे मत आहे.

------------

नीट न देता वैद्यकीय प्रवेशाचा तामिळनाडूचा निर्णय अयोग्य आहे. पुढे तो न्यायालयातही टिकणार नाही. वैद्यकीयसारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रात पाऊल ठेवताना गुणवत्तेशी तडजोड होता कामा नये. नीट परीक्षेद्वारे वैद्यकीय अभ्यासक्रमात एकवाक्यता राहते. तसेच विद्यार्थ्याने बारावी परीक्षा कोणत्याही बोर्डातून दिली असली तरी नीटमधून त्याला समान संधी मिळते. ग्रामीण मुलांमध्येही गुणवत्ता असेल तर ते मागे पडणार नाहीत.

- डाॅ. सुचित तांबोळी, समुपदेशक वैद्यकीय प्रवेश परीक्षा

------------------

तामिळनाडू सरकारचा निर्णय साफ चुकीचा आहे. कोरोनामुळे बारावीची परीक्षा झाली नाही. मग बारावीच्या गुणांवर वैद्यकीयसारख्या जबाबदारीच्या क्षेत्रात प्रवेश देणे संयुक्तिक ठरणार नाही. गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी नीट आवश्यकच आहे. ग्रामीण भागातील मुलेही आता मोठ्या प्रमाणात वैद्यकीय क्षेत्राला पसंती देत आहेत.

- रवींद्र काळे, नीट परीक्षा मार्गदर्शक

---------------

नीट परीक्षेद्वारेच वैद्यकीय प्रवेश व्हावेत. मुले नीटचा अभ्यास नियोजनपूर्वक वर्षभरापासून करतात. त्यातून समान संधीने गुणवत्ता सिद्ध होऊ शकते.

- साई काळे, विद्यार्थी

-------------

वैद्यकीय प्रवेश ‘नीट’मधूनच व्हायला हवेत. देशपातळीवर एकच परीक्षा असल्याने सर्वांना समान संधी मिळते. दुसरीकडे वैद्यकीय प्रवेशाच्या जागा कमी आहेत, त्या वाढवायला हव्यात.

- ऋग्वेदा कुलकर्णी, विद्यार्थिनी