शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
6
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
7
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
8
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
9
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
10
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
11
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
12
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
13
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
14
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
15
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
16
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
17
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
18
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
19
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
20
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 

राष्ट्रवादीचा आक्रमक मूड!

By admin | Updated: June 8, 2014 00:34 IST

अहमदनगर: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ‘शांत’ झालेली राष्ट्रवादी पुन्हा एकदा आक्रमणाच्या मूडमध्ये आहे.

अहमदनगर: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ‘शांत’ झालेली राष्ट्रवादी पुन्हा एकदा आक्रमणाच्या मूडमध्ये आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने थेट कार्यकर्त्यांपर्यंत जाऊन त्यांच्यात ‘चैतन्य’ आणण्याची रणनिती आखली जात आहे. काल मुंबईत शरद पवार यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीनंतर यापुढे स्वबळावर की आघाडी, याची चाचपणी घेतली जाणार आहे. नगर जिल्ह्यात विधानसभेचे सत्र संपल्यावर तालुकावार बैठका होतील. दरम्यान, जिल्ह्यातही अधिक जागांवर दावा ठोकण्याची तयारी राष्ट्रवादीकडून केली जात आहे.लोकसभा निवडणुकीनंतर आघाडी कमालीची धास्तावली आहे. राष्ट्रवादीने मात्र हे आव्हान भेदण्यासाठी तयारी सुरु केली आहे. काल मुंबईत बैठक झाली. या बैठकीत आगामी निवडणुकीत काय रणनिती असावी, यावर चर्चा झाली. स्वबळ की आघाडी हा प्रश्नही समोर आला. त्याप्रमाणे कार्यकर्त्यांना योग्य दिशा द्यावी लागेल, यावरही मंथन झाले. नगर जिल्ह्यातही पक्ष पुन्हा लक्ष केंद्रीत करणार आहे. त्यासाठी आगामी निवडणुकीची चाचपणी म्हणून जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते यांच्याशी थेट संवाद साधला जाणार आहे. तालुकावार बैठका घेवून पक्षश्रेष्ठींना अहवाल दिला जाणार आहे, ‘लोकमत’शी बोलताना पक्ष निरीक्षक अंकुश काकडे याबाबत म्हणाले, सध्या विधानसभेचे सत्र सुरु आहे. पालकमंत्री मधुकरराव पिचड व्यस्त आहेत. सत्र संपताच तालुकावार बैठका होतील. त्यात आगामी निवडणुकीसाठीच्या पर्यायांवर चर्चा होईल. दोन-तीन पर्याय समोर आहेत. समजा उद्या आघाडी टिकली नाही, तर ऐनवेळी गडबड नको म्हणून तयारीचा एक भाग म्हणून याकडे बघत आहोत. मतदारसंघातील परिस्थितीचा अभ्यासही यानिमित्ताने होईल. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांनीही कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा चैतन्य आणण्याकडे लक्ष वेधले. ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, एकूच राज्यातील स्थितीचा अभ्यास केला जात आहे. पक्षश्रेष्ठी शरद पवार यांनी लोकसभेत ज्याच्या जागा जास्त त्याला विधानसभेत अधिक जागा, या काँग्रेसच्याच फॉर्म्यूल्याकडे लक्ष वेधले आहे. त्यामुळे विधानसभेसाठी जिल्ह्यात अधिक मतदारसंघ कोणते घ्यावेत, याबाबतही चाचपणी केली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एकीकडे काँग्रेस कोमात अडकलेली असताना राष्ट्रवादी जास्त जागांवर दावा ठोकून आक्रमक राजकारणाची आखणी करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. (प्रतिनिधी)तयारीत कार्यकर्ता महत्वाचा!आगामी निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा उत्साह आणावा लागणार आहे. त्यासाठी त्यांच्याशी संवाद महत्वाचा ठरेल. पक्षश्रेष्ठींनी चाचपणीच्या सूचना दिलेल्या आहेत. लोकसभेत ज्याच्या जागा जास्त त्यांना विधानसभेत अधिक जागा, हा फॉर्म्यूला पडताळून पाहिला जाणार आहे. मुंबईतील बैठकीतही हा विषय चर्चेत राहिला. त्यातून कार्यकर्त्यांना संधी मिळेल. पक्षासाठी ते महत्त्वाचे ठरेल. -शंकरराव गडाख, आमदार.