शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
4
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
5
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
6
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
7
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
8
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
9
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
10
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
11
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
12
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
13
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
14
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
15
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
16
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
17
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
18
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
19
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
20
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?

राष्ट्रवादीचा आक्रमक मूड!

By admin | Updated: June 8, 2014 00:34 IST

अहमदनगर: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ‘शांत’ झालेली राष्ट्रवादी पुन्हा एकदा आक्रमणाच्या मूडमध्ये आहे.

अहमदनगर: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ‘शांत’ झालेली राष्ट्रवादी पुन्हा एकदा आक्रमणाच्या मूडमध्ये आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने थेट कार्यकर्त्यांपर्यंत जाऊन त्यांच्यात ‘चैतन्य’ आणण्याची रणनिती आखली जात आहे. काल मुंबईत शरद पवार यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीनंतर यापुढे स्वबळावर की आघाडी, याची चाचपणी घेतली जाणार आहे. नगर जिल्ह्यात विधानसभेचे सत्र संपल्यावर तालुकावार बैठका होतील. दरम्यान, जिल्ह्यातही अधिक जागांवर दावा ठोकण्याची तयारी राष्ट्रवादीकडून केली जात आहे.लोकसभा निवडणुकीनंतर आघाडी कमालीची धास्तावली आहे. राष्ट्रवादीने मात्र हे आव्हान भेदण्यासाठी तयारी सुरु केली आहे. काल मुंबईत बैठक झाली. या बैठकीत आगामी निवडणुकीत काय रणनिती असावी, यावर चर्चा झाली. स्वबळ की आघाडी हा प्रश्नही समोर आला. त्याप्रमाणे कार्यकर्त्यांना योग्य दिशा द्यावी लागेल, यावरही मंथन झाले. नगर जिल्ह्यातही पक्ष पुन्हा लक्ष केंद्रीत करणार आहे. त्यासाठी आगामी निवडणुकीची चाचपणी म्हणून जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते यांच्याशी थेट संवाद साधला जाणार आहे. तालुकावार बैठका घेवून पक्षश्रेष्ठींना अहवाल दिला जाणार आहे, ‘लोकमत’शी बोलताना पक्ष निरीक्षक अंकुश काकडे याबाबत म्हणाले, सध्या विधानसभेचे सत्र सुरु आहे. पालकमंत्री मधुकरराव पिचड व्यस्त आहेत. सत्र संपताच तालुकावार बैठका होतील. त्यात आगामी निवडणुकीसाठीच्या पर्यायांवर चर्चा होईल. दोन-तीन पर्याय समोर आहेत. समजा उद्या आघाडी टिकली नाही, तर ऐनवेळी गडबड नको म्हणून तयारीचा एक भाग म्हणून याकडे बघत आहोत. मतदारसंघातील परिस्थितीचा अभ्यासही यानिमित्ताने होईल. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांनीही कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा चैतन्य आणण्याकडे लक्ष वेधले. ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, एकूच राज्यातील स्थितीचा अभ्यास केला जात आहे. पक्षश्रेष्ठी शरद पवार यांनी लोकसभेत ज्याच्या जागा जास्त त्याला विधानसभेत अधिक जागा, या काँग्रेसच्याच फॉर्म्यूल्याकडे लक्ष वेधले आहे. त्यामुळे विधानसभेसाठी जिल्ह्यात अधिक मतदारसंघ कोणते घ्यावेत, याबाबतही चाचपणी केली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एकीकडे काँग्रेस कोमात अडकलेली असताना राष्ट्रवादी जास्त जागांवर दावा ठोकून आक्रमक राजकारणाची आखणी करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. (प्रतिनिधी)तयारीत कार्यकर्ता महत्वाचा!आगामी निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा उत्साह आणावा लागणार आहे. त्यासाठी त्यांच्याशी संवाद महत्वाचा ठरेल. पक्षश्रेष्ठींनी चाचपणीच्या सूचना दिलेल्या आहेत. लोकसभेत ज्याच्या जागा जास्त त्यांना विधानसभेत अधिक जागा, हा फॉर्म्यूला पडताळून पाहिला जाणार आहे. मुंबईतील बैठकीतही हा विषय चर्चेत राहिला. त्यातून कार्यकर्त्यांना संधी मिळेल. पक्षासाठी ते महत्त्वाचे ठरेल. -शंकरराव गडाख, आमदार.