शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नगरचे पाणी पळविले : राधाकृष्ण विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 11:26 IST

पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे प्रस्थापित नेतृत्व नगर जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळू द्यायला तयार नाही.

अहमदनगर : पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे प्रस्थापित नेतृत्व नगर जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळू द्यायला तयार नाही. आज हेच नेते कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, पारनेर तालुक्याबद्दल बेगडी प्रेम दाखवितात. कुकडीचे हक्काचे पाणी नगर जिल्ह्याला मिळावे यासाठी आपण पक्षविरहित लढा देणार असून त्यासाठी कोणतीही किंमत मोजण्याची तयारी आहे, असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला दिला आहे.विखे यांनी याबाबत रविवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपली भूमिका मांडली. त्यांनी म्हटले आहे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रस्थापित नेतृत्वानेच कुकडी प्रकल्पाखाली येणाऱ्या शेतकऱ्यांना हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवले आहे. राजकारणासाठी जिल्ह्यातील पाणी प्रश्नाचा त्यांनी सोयीने वापर केला. पाण्यावर त्यांनी अतिक्रमणच केले आहे.कुकडी समूहातील ३० टीएमसी पाण्यापैकी कुकडी डाव्या कालव्याद्वारे नगर जिल्ह्याला १५ तर सोलापूर जिल्ह्याला पाच टीएमसी पाणी मिळणे अपेक्षित आहे. मात्र नगरच्या वाट्याचे हे पाणी मिळत नाही. पुणे जिल्ह्यातील नेते हे पाणी मिळू देत नाहीत. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील शेती उदध्वस्त होत आहे. लोकनेते बाळासाहेब विखे पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करुन या भागाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.कुकडी प्रकल्पाच्या सर्व कालव्यांचे आवर्तन समान पध्दतीने होणे अपेक्षित आहे. परंतु नगर जिल्ह्याला पाणी येणाºया डाव्या कालव्यास कमी पाणी दिले जाते. इतर कालवे पुणे जिल्ह्यात असल्याने त्यांना जास्त पाणी दिले जाते. शिवाय धरणातील पाणी थेट नद्यांना सोडून कोल्हापूर पध्दतीचे बंधारे बेकायदेशीरपणे भरुन घेतले जातात. साठविलेले पाणी नदीत सोडण्याची प्रकल्प अहवालात तरतूद नसतानाही ते कसे सोडले जाते?पुण्याच्या नेत्यांच्या दबावामुळे नगर जिल्ह्यातील कोणतेही नेते आज या हक्काच्या पाणी प्रश्नावर बोलायला तयार नाहीत. नगरला हक्काचे पाणी मिळणे, हा मुद्दा सत्तेच्या राजकारणापेक्षा व्यापक आणि नगरकरांच्या जीविताशी जोडलेला आहे. प्रत्येक हंगामानंतर डाव्या कालव्यात नगर जिल्ह्यातील शेतीसाठी पाणीही शिल्लक ठेवले जात नाही. उरलेले तुटपुंजे पाणी केवळ पिण्यासाठी दिले जात असल्याचे दाखवून बोळवण केली जात असतानाही या नेत्यांच्या ताटाखालचे मांजर होऊन बसलेले जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते याबाबत शब्दसुध्दा काढत नाहीत. नगर जिल्ह्याला पोलीस बंदोबस्तात पाणी आणावे लागते. ही परिस्थिती नेमकी कुणाच्या आदेशामुळे निर्माण होते हे आता लपून राहिलेले नाही. जिल्ह्यावर हा एकप्रकारे अन्यायच असल्याचे त्यांनी म्हटले आहे.कुकडी डावा कालवा व घोड कालवा हे प्रश्न प्रलंबित असताना कर्जत, जामखेड,श्रीगोंदा, पारनेर भागात आम्ही खूप सेवा करत आहोत हे भासविण्याचा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा प्रयत्न आहे.कृष्णा खो-यांतर्गत असलेल्या पाथर्डी तालुक्यालाही ही मंडळी पाणी मिळू देत नाहीत. त्यामुळेच विविध कारणाने जिल्ह्यात येऊन पाणी प्रश्नांवर भाष्य करणा-या नेत्यांची कृती हे बेगडी प्रेम दर्शवते. या प्रश्नाकडे आपण पक्षीय राजकारणापलीकडे पाहतो. ही स्वाभिमानाची लढाई आहे. पक्षभेद विसरुन या पाण्यासाठी एकत्रित येण्याची गरज आहे.माझ्या राजकीय भवितव्याची कोणतीही तमा न बाळगता बाळासाहेब विखे यांनी सुरु केलेली ही पाण्याची लढाई मी पुढे नेणार आहे. पाण्याअभावी नगर जिल्हा उदध्वस्त करणा-यांना धडा शिकवू असा इशारा त्यांनी दिला.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar-pcअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019