शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नगरचे पाणी पळविले : राधाकृष्ण विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 11:26 IST

पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे प्रस्थापित नेतृत्व नगर जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळू द्यायला तयार नाही.

अहमदनगर : पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे प्रस्थापित नेतृत्व नगर जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळू द्यायला तयार नाही. आज हेच नेते कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, पारनेर तालुक्याबद्दल बेगडी प्रेम दाखवितात. कुकडीचे हक्काचे पाणी नगर जिल्ह्याला मिळावे यासाठी आपण पक्षविरहित लढा देणार असून त्यासाठी कोणतीही किंमत मोजण्याची तयारी आहे, असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला दिला आहे.विखे यांनी याबाबत रविवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपली भूमिका मांडली. त्यांनी म्हटले आहे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रस्थापित नेतृत्वानेच कुकडी प्रकल्पाखाली येणाऱ्या शेतकऱ्यांना हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवले आहे. राजकारणासाठी जिल्ह्यातील पाणी प्रश्नाचा त्यांनी सोयीने वापर केला. पाण्यावर त्यांनी अतिक्रमणच केले आहे.कुकडी समूहातील ३० टीएमसी पाण्यापैकी कुकडी डाव्या कालव्याद्वारे नगर जिल्ह्याला १५ तर सोलापूर जिल्ह्याला पाच टीएमसी पाणी मिळणे अपेक्षित आहे. मात्र नगरच्या वाट्याचे हे पाणी मिळत नाही. पुणे जिल्ह्यातील नेते हे पाणी मिळू देत नाहीत. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील शेती उदध्वस्त होत आहे. लोकनेते बाळासाहेब विखे पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करुन या भागाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.कुकडी प्रकल्पाच्या सर्व कालव्यांचे आवर्तन समान पध्दतीने होणे अपेक्षित आहे. परंतु नगर जिल्ह्याला पाणी येणाºया डाव्या कालव्यास कमी पाणी दिले जाते. इतर कालवे पुणे जिल्ह्यात असल्याने त्यांना जास्त पाणी दिले जाते. शिवाय धरणातील पाणी थेट नद्यांना सोडून कोल्हापूर पध्दतीचे बंधारे बेकायदेशीरपणे भरुन घेतले जातात. साठविलेले पाणी नदीत सोडण्याची प्रकल्प अहवालात तरतूद नसतानाही ते कसे सोडले जाते?पुण्याच्या नेत्यांच्या दबावामुळे नगर जिल्ह्यातील कोणतेही नेते आज या हक्काच्या पाणी प्रश्नावर बोलायला तयार नाहीत. नगरला हक्काचे पाणी मिळणे, हा मुद्दा सत्तेच्या राजकारणापेक्षा व्यापक आणि नगरकरांच्या जीविताशी जोडलेला आहे. प्रत्येक हंगामानंतर डाव्या कालव्यात नगर जिल्ह्यातील शेतीसाठी पाणीही शिल्लक ठेवले जात नाही. उरलेले तुटपुंजे पाणी केवळ पिण्यासाठी दिले जात असल्याचे दाखवून बोळवण केली जात असतानाही या नेत्यांच्या ताटाखालचे मांजर होऊन बसलेले जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते याबाबत शब्दसुध्दा काढत नाहीत. नगर जिल्ह्याला पोलीस बंदोबस्तात पाणी आणावे लागते. ही परिस्थिती नेमकी कुणाच्या आदेशामुळे निर्माण होते हे आता लपून राहिलेले नाही. जिल्ह्यावर हा एकप्रकारे अन्यायच असल्याचे त्यांनी म्हटले आहे.कुकडी डावा कालवा व घोड कालवा हे प्रश्न प्रलंबित असताना कर्जत, जामखेड,श्रीगोंदा, पारनेर भागात आम्ही खूप सेवा करत आहोत हे भासविण्याचा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा प्रयत्न आहे.कृष्णा खो-यांतर्गत असलेल्या पाथर्डी तालुक्यालाही ही मंडळी पाणी मिळू देत नाहीत. त्यामुळेच विविध कारणाने जिल्ह्यात येऊन पाणी प्रश्नांवर भाष्य करणा-या नेत्यांची कृती हे बेगडी प्रेम दर्शवते. या प्रश्नाकडे आपण पक्षीय राजकारणापलीकडे पाहतो. ही स्वाभिमानाची लढाई आहे. पक्षभेद विसरुन या पाण्यासाठी एकत्रित येण्याची गरज आहे.माझ्या राजकीय भवितव्याची कोणतीही तमा न बाळगता बाळासाहेब विखे यांनी सुरु केलेली ही पाण्याची लढाई मी पुढे नेणार आहे. पाण्याअभावी नगर जिल्हा उदध्वस्त करणा-यांना धडा शिकवू असा इशारा त्यांनी दिला.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar-pcअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019