शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जाला राष्ट्रीयकृत बॅँकांचा ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 11:35 IST

खरीप हंगामातील पीक कर्जवाटपात राष्ट्रीयकृत बॅँकांनी शेतकऱ्यांना ठेंगा दाखविला आहे. त्यांनी उद्दिष्टापैकी अवघे ७.३२ टक्के कर्ज वितरण केले आहे.

गोरख देवकरअहमदनगर : खरीप हंगामातील पीक कर्जवाटपात राष्ट्रीयकृत  बॅँकांनी शेतकऱ्यांना ठेंगा दाखविला आहे. त्यांनी उद्दिष्टापैकी अवघे ७.३२ टक्के कर्ज वितरण केले आहे. त्या तुलनेत जिल्हा सहकारी बॅँकेने कर्ज वितरणात आघाडी घेतली आहे. त्यांनी उद्दिष्टाच्या ३७.७१ टक्के कर्जवाटप केले आहे. गतवर्षीच्या दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीयकृत  बॅँकांनी पीक कर्जवाटपात हात आखडता घेऊन एकप्रकारे शेतकऱ्यांची अडवणूकच केली आहे.शेतक-यांना खरीप, रब्बी हंगामातील पिके घेण्यासाठी पैसे उपलब्ध व्हावेत, यासाठी शासनाने पीक कर्ज योजना सुरू केली. यामध्ये शेतक-यांना बिनव्याजी कर्ज दिले जाते. ते कर्ज शेतक-यांनी ३१ मार्चपूर्वी भरणे अपेक्षित असते. शेतक-यांना कर्ज वितरण करण्यास बॅँका फारशा उत्सुक नसतात. त्यामुळे शासनाने सर्वच बॅँकांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरवून दिले जाते. बॅँकाना उद्दिष्टाएवढे किंवा त्यापेक्षा जास्त पीक कर्ज वितरण करणे बंधनकारक करण्यात आले. परंतु, बॅँकांचे पीक कर्ज वितरणाकडे फारसे लक्ष नसते. असेच आकडेवारीवरून दिसून येते.खरीपपूर्व मशागतीची कामे संपलेली आहेत. शेतक-यांना मशागत, बियाणे, खते खरेदीसाठी पैशांची आवश्यकता असते. त्यासाठी शेतक-यांना जून महिन्यापूर्वीच पैसे मिळणे गरजेचे असते. शासनानेही बॅँकांनी १ एप्रिलपासूनच शेतक-यांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज वितरण करावे, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे जूनपूर्वी किमान ५० टक्के तरी कर्ज वितरण होणे आवश्यक आहे. मात्र जिल्ह्यातील बॅँकांनी अवघे २१ टक्के कर्ज वितरण केले आहे.जिल्ह्यातील बॅँकांना ३ हजार १८१ कोटी ३० लाख रूपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. त्यांनी केवळ ६६७ कोटी ७८ लाख १३ हजार रूपयांचे कर्ज वितरण केले आहे. जिल्हा सहकारी बॅँकेला १ हजार ३९७ कोटी ९२ लाख रूपयांचे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी त्यांनी ८० हजार १९१ शेतक-यांना ५२७ कोटी १४ लाख ३६ हजार रूपयांचे कर्जवाटप केले. त्यांनी ३७.७१ टक्क्यापर्यंत उद्दिष्ट गाठले. या उलट स्थिती राष्ट्रीयकृत बॅँकांमध्ये आहे. राष्ट्रीयकृत बॅँकांना १ हजार ४७० कोटी ३७ लाख रूपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. त्यांनी १०७ कोटी ५६ लाख ५२ हजार रूपयांचे कर्जवाटप केले. त्यांनी अवघे ७.३२ टक्केच उद्दिष्ट साध्य केले आहे.खासगी बॅँकांना २७८ कोटी ८५ लाख रूपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट होते. त्यांनी १३.७१ टक्के म्हणजेच ३८ कोटी २२ लाख ६४ हजार रूपये कर्जवाटप केले. राष्ट्रीयकृत बॅँकापेक्षा खासगी बॅँकांची कर्जवाटपाची सरासरी अधिक आहे.ग्रामीण बॅँकांना ३४ कोटी १६ लाख रूपयांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी त्यांनी अवघे ८४ कोटी ६१ हजार रूपयांचे कर्ज वाटप केले. त्यांची टक्केवारी अवघी २.४८ टक्के इतकी आहे.वाढत्या थकित कर्जामुळे बँकांच्या अडचणी..शासन ठराविक वर्षानंतर कर्जमाफी देते. त्यामुळे काही शेतकरी कर्ज घेतल्यानंतर कर्जमाफी मिळेल या आशेवर कर्जाची रक्कम पुन्हा भरत नाहीत. पर्यायाने बॅँकांचा एनपीए वाढतो. जुने कर्ज न भरल्याने त्या शेतक-यांना नवे कर्जही मिळत नाही.३१ मार्चपूर्वी रक्कम न भरल्याने संबंधित शेतक-याला कर्जावरील व्याजही भरावे लागते. अनेक शेतकरी पाठपुरावा करूनही कर्ज परत करत नाहीत, अशी माहिती राष्ट्रीयकृत बॅँक अधिका-यांनी दिली.३१ मार्चपूर्वी पीककर्ज भरल्यास त्यावरील व्याज पूर्णपणे माफ होते. त्यामुळे वेळीच कर्ज भरल्यास ते पैसे बिनव्याजी वापरायला मिळतात. त्यामुळे तरी कर्ज घेण्यासाठी शेतकºयांच्या रांगा लागायला हव्या होत्या. मात्र तसे होत नाही.पीक कर्जासाठी राष्ट्रीयकृत बॅँकांच्या कागदपत्रांची पूर्तता करतानाच शेतकरी बेजार होतात.बॅँकांच्या किचकट प्रक्रियेनेच शेतकरी हताश होतात. शिवाय बॅँकांमध्ये पाठपुराव्यासाठी अनेकदा हेलपाटेही मारावे लागतात. त्याऐवजी जिल्हा बॅँक, पतसंस्थांमध्ये मिळणारे कर्ज सोयीचे असते, असे शेतकºयांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर