शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

राष्ट्रीय महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 18:14 IST

तालुक्यातील करंजी ते मिडसांगवी दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ चे काम गेल्या तीन वर्षापासून रखडल्यामुळे महामार्गावरून प्रवास करणा-या प्रवाशांना वारंवार अपघाताला सामोरे जावे लागत आहेत

हरिहर गर्जेपाथर्डी : तालुक्यातील करंजी ते मिडसांगवी दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ चे काम गेल्या तीन वर्षापासून रखडल्यामुळे महामार्गावरून प्रवास करणा-या प्रवाशांना वारंवार अपघाताला सामोरे जावे लागत आहेत. या महामार्गावरील अपघातामध्ये आजपर्यत गेल्या तीन वर्षात १२० प्रवाश्यानी जीव गमवावा असून १३५ प्रवाश्याना कायमचे अपंगत्व आले आहे. तीन वर्षापासून रखडलेल्या महामार्गामुळे करंजी घाट ते मिडसांगवी दरम्यान दररोज एक अपघात होत आहे. पाथर्डी तालुक्यात महामार्गावर २०१६ मध्ये ३९ मृत्यू झाले तर ३५ जणांना अपंगत्व आले. २०१७ मध्ये ३५ मृत्यू झाले तर ४२ जणांना अपंगत्व स्वीकारावे लागले. २०१८ मध्ये ४० मृत्यू तर ६० जणांना अपंगत्व आले. तीन वर्षात ११४ जणांना जीव गमवावा लागला. तर १३७ व्यक्तींना अपंगत्व आले. शहरातून बांधण्यात येणा-या गटारीचे काम अर्धवट असल्याने सांडपाणी महामार्गावरून वाहल्याने मोठमोठे खड्डे पडून अपघातात भर पडली. तीन वर्ष उलटूनही काम अर्धवट असल्याने ५५ कि.मीच्या महामार्गावर प्रचंड धुळीचे साम्राज्य पसरून प्रवासी व नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. महामार्गाच्या लगतच्या शेतीचे नुकसान होत आहे. काम सुरु असतांना रात्रीच्या वेळी दिसेल अशी रेफलिक्टर पट्टी, फलक, खांब उभे करणे आवश्यक असताना काहीही उपाय योजना करण्यात आली नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी खड्डे न दिसल्यामुळे अपघात होत आहेत. अनेक दिवसापासून आणून टाकलेली खडी व माती यामुळे अनेक वाहने थेट खोदलेल्या खड्यात पडून अपघात होत आहेत.रस्त्याच्या खराब कामामुळे होणा-या अपघातास मुंबई उच्च न्यायालयाच्या निवाड्याप्रमाणे राष्ट़्रीय महामार्ग अ‍ॅथोरिटी जबाबदार असल्याने त्यांच्यावर दिवाणी व फौजदारी कारवाई व्हायला पाहीजे. - अ‍ॅड.बाळासाहेब बोडखे

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर