शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
6
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
7
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
8
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
9
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
10
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
11
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
12
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
13
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
14
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
15
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
16
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
17
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
18
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
19
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
20
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई

राष्ट्रीय महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 18:14 IST

तालुक्यातील करंजी ते मिडसांगवी दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ चे काम गेल्या तीन वर्षापासून रखडल्यामुळे महामार्गावरून प्रवास करणा-या प्रवाशांना वारंवार अपघाताला सामोरे जावे लागत आहेत

हरिहर गर्जेपाथर्डी : तालुक्यातील करंजी ते मिडसांगवी दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ चे काम गेल्या तीन वर्षापासून रखडल्यामुळे महामार्गावरून प्रवास करणा-या प्रवाशांना वारंवार अपघाताला सामोरे जावे लागत आहेत. या महामार्गावरील अपघातामध्ये आजपर्यत गेल्या तीन वर्षात १२० प्रवाश्यानी जीव गमवावा असून १३५ प्रवाश्याना कायमचे अपंगत्व आले आहे. तीन वर्षापासून रखडलेल्या महामार्गामुळे करंजी घाट ते मिडसांगवी दरम्यान दररोज एक अपघात होत आहे. पाथर्डी तालुक्यात महामार्गावर २०१६ मध्ये ३९ मृत्यू झाले तर ३५ जणांना अपंगत्व आले. २०१७ मध्ये ३५ मृत्यू झाले तर ४२ जणांना अपंगत्व स्वीकारावे लागले. २०१८ मध्ये ४० मृत्यू तर ६० जणांना अपंगत्व आले. तीन वर्षात ११४ जणांना जीव गमवावा लागला. तर १३७ व्यक्तींना अपंगत्व आले. शहरातून बांधण्यात येणा-या गटारीचे काम अर्धवट असल्याने सांडपाणी महामार्गावरून वाहल्याने मोठमोठे खड्डे पडून अपघातात भर पडली. तीन वर्ष उलटूनही काम अर्धवट असल्याने ५५ कि.मीच्या महामार्गावर प्रचंड धुळीचे साम्राज्य पसरून प्रवासी व नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. महामार्गाच्या लगतच्या शेतीचे नुकसान होत आहे. काम सुरु असतांना रात्रीच्या वेळी दिसेल अशी रेफलिक्टर पट्टी, फलक, खांब उभे करणे आवश्यक असताना काहीही उपाय योजना करण्यात आली नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी खड्डे न दिसल्यामुळे अपघात होत आहेत. अनेक दिवसापासून आणून टाकलेली खडी व माती यामुळे अनेक वाहने थेट खोदलेल्या खड्यात पडून अपघात होत आहेत.रस्त्याच्या खराब कामामुळे होणा-या अपघातास मुंबई उच्च न्यायालयाच्या निवाड्याप्रमाणे राष्ट़्रीय महामार्ग अ‍ॅथोरिटी जबाबदार असल्याने त्यांच्यावर दिवाणी व फौजदारी कारवाई व्हायला पाहीजे. - अ‍ॅड.बाळासाहेब बोडखे

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर