शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 18:14 IST

तालुक्यातील करंजी ते मिडसांगवी दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ चे काम गेल्या तीन वर्षापासून रखडल्यामुळे महामार्गावरून प्रवास करणा-या प्रवाशांना वारंवार अपघाताला सामोरे जावे लागत आहेत

हरिहर गर्जेपाथर्डी : तालुक्यातील करंजी ते मिडसांगवी दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ चे काम गेल्या तीन वर्षापासून रखडल्यामुळे महामार्गावरून प्रवास करणा-या प्रवाशांना वारंवार अपघाताला सामोरे जावे लागत आहेत. या महामार्गावरील अपघातामध्ये आजपर्यत गेल्या तीन वर्षात १२० प्रवाश्यानी जीव गमवावा असून १३५ प्रवाश्याना कायमचे अपंगत्व आले आहे. तीन वर्षापासून रखडलेल्या महामार्गामुळे करंजी घाट ते मिडसांगवी दरम्यान दररोज एक अपघात होत आहे. पाथर्डी तालुक्यात महामार्गावर २०१६ मध्ये ३९ मृत्यू झाले तर ३५ जणांना अपंगत्व आले. २०१७ मध्ये ३५ मृत्यू झाले तर ४२ जणांना अपंगत्व स्वीकारावे लागले. २०१८ मध्ये ४० मृत्यू तर ६० जणांना अपंगत्व आले. तीन वर्षात ११४ जणांना जीव गमवावा लागला. तर १३७ व्यक्तींना अपंगत्व आले. शहरातून बांधण्यात येणा-या गटारीचे काम अर्धवट असल्याने सांडपाणी महामार्गावरून वाहल्याने मोठमोठे खड्डे पडून अपघातात भर पडली. तीन वर्ष उलटूनही काम अर्धवट असल्याने ५५ कि.मीच्या महामार्गावर प्रचंड धुळीचे साम्राज्य पसरून प्रवासी व नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. महामार्गाच्या लगतच्या शेतीचे नुकसान होत आहे. काम सुरु असतांना रात्रीच्या वेळी दिसेल अशी रेफलिक्टर पट्टी, फलक, खांब उभे करणे आवश्यक असताना काहीही उपाय योजना करण्यात आली नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी खड्डे न दिसल्यामुळे अपघात होत आहेत. अनेक दिवसापासून आणून टाकलेली खडी व माती यामुळे अनेक वाहने थेट खोदलेल्या खड्यात पडून अपघात होत आहेत.रस्त्याच्या खराब कामामुळे होणा-या अपघातास मुंबई उच्च न्यायालयाच्या निवाड्याप्रमाणे राष्ट़्रीय महामार्ग अ‍ॅथोरिटी जबाबदार असल्याने त्यांच्यावर दिवाणी व फौजदारी कारवाई व्हायला पाहीजे. - अ‍ॅड.बाळासाहेब बोडखे

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर