शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

दिल्लीतील आंदोलनासाठी राष्ट्रीय समन्वय समिती जाहीर - अण्णा हजारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 20:20 IST

सशक्त लोकपाल, शेतक-यांना न्याय या मुद्यांवर शहीद दिनापासून (२३ मार्च) नवी दिल्ली येथे सुरू होणा-या आंदोलनासाठी राष्ट्रीय समन्वय समिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शनिवारी जाहीर केली.

राळेगणसिद्धी : सशक्त लोकपाल, शेतक-यांना न्याय या मुद्यांवर शहीद दिनापासून (२३ मार्च) नवी दिल्ली येथे सुरू होणा-या आंदोलनासाठी राष्ट्रीय समन्वय समिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शनिवारी जाहीर केली. पहिल्या टप्प्यात २० सदस्यांचा कोअर कमिटीत समावेश करण्यात आला आहे. येत्या २५ फेब्रुवारी रोजी समितीची बैठक दिल्लीत होणार असल्याचे हजारे यांनी सांगितले.कोअर कमिटीत अक्षय कुमार (उडिशा), कमांडर यशवंत प्रकाश (राजस्थान), कर्नल दिनेश नैन (दिल्ली), मनिंद्र जैन (दिल्ली), विक्रम टापरवाडा (राजस्थान), दशरथ कुमार (राजस्थान), करनवीर थमन (पंजाब), प्रवीण भारतीय (उत्तर प्रदेश), सुनील फौजी (उत्तर प्रदेश), गौरवकांत शर्मा (उत्तर प्रदेश), डॉ. राकेश रफिक (उत्तर प्रदेश), पी.एन. कल्की (उत्तर प्रदेश), सुशील भट्ट (उत्तराखंड), भोपाल सिंग चौधरी (उत्तराखंड), नवीन जयहिंद (हरियाणा), शिवाजी खेडकर (महाराष्ट्र), कल्पना इनामदार (महाराष्ट्र), राम नाईक (कर्नाटक), सेरफी फ्लॅगो (अरुणाचल), सुनील लाल (उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे.अण्णा हजारे म्हणाले, मोदी सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात सक्षम लोकपाल लागू करण्याविषयी लेखी आश्वासन दिले होते. सत्तेवर आल्यानंतर त्याचे पालन तर झाले नाहीच. उलट लोकपाल, लोकायुक्त कायदा कमजोर केला. अशा परिस्थितीत भ्रष्टाचार रोखण्यासाठी सक्षम लोकपाल लागू करण्यासाठी पुन्हा एकदा आंदोलनाची वेळ आलेली आहे. शेतक-यांच्या शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नाही. केवळ शेतीवर अवलंबून असलेल्या ६० वर्षांवरील शेतक-यांना महिना पाच हजार रुपये पेन्शन मिळावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी, यासाठी सत्याग्रहाची गरज आहे, असे ते म्हणाले.

आंदोलनाच्या निधीत पारदर्शकता

कोअर कमिटीशिवाय जनआंदोलन कार्यकर्त्यांनाही प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर व चौकशीअंती ओळखपत्र दिले जाईल. आंदोलनासाठी देणग्या आॅनलाईनने बँक खात्यात स्वीकारून त्याची रीतसर पावती देण्यात येईल. भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन संस्थेच्या परवानगीशिवाय कोणी निधी संकलन करण्यास परवानगी नाही. आंदोलनाच्या आवश्यकतेनुसार निधी खर्च करून त्यातील प्रत्येक रुपयाचे लेखापरीक्षण करण्यात येणार आहे.

ज्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाच्या तिकिटावर निवडणूक न लढवता केवळ समाज आणि देशाच्या हितासाठी जीवन समर्पित करण्याचे प्रतिज्ञापत्र करून दिलेले आहे, अशा कार्यकर्त्यांच्या कार्याची माहिती घेऊन विश्वसनीय अशा कार्यकर्त्यांची कोअर कमिटीमध्ये निवड करण्यात आलेली आहे.-अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेAhmednagarअहमदनगरParnerपारनेर