शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
2
Air India Plane Crash in Ahmedabad : पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
3
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
4
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
5
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
6
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
7
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
8
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
9
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
10
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
11
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
12
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
13
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
14
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
15
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
16
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
17
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
18
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
19
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
20
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...

नगरचा गणेशोत्सव डीजेमुक्तीकडे

By admin | Updated: August 10, 2014 23:29 IST

अहमदनगर : गणेशोत्सवात आणि विसर्जन मिरवणुकीतही डीजे न लावता पारंपरिक वाद्ये वाजविण्याबाबत शहरातील १३ पैकी ११ मंडळांनी तयारी दर्शविली आहे.

अहमदनगर : गणेशोत्सवात आणि विसर्जन मिरवणुकीतही डीजे न लावता पारंपरिक वाद्ये वाजविण्याबाबत शहरातील १३ पैकी ११ मंडळांनी तयारी दर्शविली आहे. मात्र पहिल्या ११ मंडळांनी डीजेमुक्त उत्सव साजरा करण्याबाबत प्रतिज्ञापत्र तयार केले आहे. शिवसेनेच्या मंडळाने प्रतिज्ञापत्र देण्यास नकार दर्शविला आहे. मानाच्या मंडळांनी डीजे न लावण्याचा निर्णय घेतल्याने नगरचा उत्सव यंदा डीजेमुक्त होण्याची शक्यता आहे.डीजे लावल्याने शारीरिक, मानसिक होणारा त्रास, त्याचे परिणाम, ध्वनिप्रदूषणाचे दुष्परिणाम याबाबत तज्ज्ञ, पोलीस आणि सामाजिक कार्यकर्ते जागर करीत आहेत. मात्र त्यापासून गणेश मंडळे बोध घेत नसल्याने दरवर्षी डीजे दणदणाट दरवर्षीपेक्षा जास्त होतो. तसेच मंडळांमध्ये डीजे वाजवून तरुणांची गर्दी जमविण्याची स्पर्धा होते. कपिलेश्वर मंडळाचे अध्यक्ष कैलास गिरवले यांनी गेल्या दोन वर्षांपासून डीजेमुक्तीसाठी पुढाकार घेत आहेत. त्यांच्या मंडळाने गतवर्षी पारंपरिक वाद्ये वाजविण्यावर भर दिला होता.शहरात पूर्वी मानाचे १५ मंडळे होती. त्यापैकी स्पंदन आणि आझाद ही मंडळे मिरवणुकीतून बाद करण्यात आली. राहिलेल्या तेरा मंडळांपैकी ११ मंडळांनी डीजे न लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी गिरवले यांच्या पुढाकाराने ११ मंडळांनी प्रतिज्ञापत्रावर सह्या केल्या आहेत. संभाजी कदम यांच्या बंधुंचे समझौता तरुण मंडळ आणि शेवटचे असलेले शिवसेना मंडळ यांनी मात्र प्रतिज्ञापत्रावर सही करण्यास नकार दिल्याचे समजते. त्यामुळे डीजेमुक्तीला शिवसेनेचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.(प्रतिनिधी)कोतवाली पोलीस ठाण्यात झालेल्या बैठकीनंतर बारा मंडळांनी डीजे न लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यापैकी शिवसेनेची दोन मंडळे वगळता सर्व ११ मंडळांनी डीजे न लावण्याबाबतच्या प्रतिज्ञापत्रावर सह्या केल्या आहेत. सामान्य लोकांच्या आरोग्याचा विचार न करता डीजे लावून तरुणांची गर्दी जमवायची, यासाठी डीजे लावण्याचा शिवसेनेचा आटापिटा आहे. लोकांच्या आरोग्याचा विचार करूनच डीजे बंद करण्याचा निर्णय आहे. कपिलेश्वर मंडळ दोन वर्षांपासून डीजे वाजवित नाही. या उपक्रमाला सर्वांचेच सहकार्य अपेक्षित आहे.-कैलास गिरवले, कपिलेश्वर गणेश मंडळध्वनी प्रदूषणाचे परिणाम घातक आहेत. माणसाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. डीजेच्या आवाजामुळे हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू येणे, कर्णबधिरता येणे आदी प्रकारचे आजार जडतात. याशिवाय तरुणांची व्यसनाधिनता वाढीसही डीजेमुळे प्रोत्साहन मिळते. त्यासाठी यंदाचा गणेशोत्सव डीजेमुक्त व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याला शहरातील मंडळे चांगला प्रतिसाद देत आहेत, ही चांगली बाब आहे.-वाय.डी. पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारीआज निर्णयसर्वच मंडळांच्या प्रमुखांची रविवारी रात्री साडेनऊ वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. सोमवारी सकाळी सामुहिकपणे डीजे न लावण्याचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.याबाबत पोलीस प्रमुखांनाही मंडळाचे पदाधिकारी भेटून निवेदन देणार असल्याचे समजते. याबाबत कैलास गिरवले यांनीही दुजोरा दिला.डीजे न लावण्याचा निर्णय त्यांच्या मंडळांनी वैयक्तिकपणे घेतला आहे. याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. प्रत्येक मंडळाने काय देखावे साजरे करायचे, मिरवणुकीत डीजेबाबतचा निर्णय मंडळांचा वैयक्तिक आहे. -संभाजी कदम, शिवसेना शहर प्रमुख