शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

वनजमिनीवर कसणाऱ्यांची नावे लागावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:19 IST

चुकीच्या पद्धतीने अपात्र केलेल्या वन दाव्यांच्या पुन्हा सुनावण्या घ्याव्यात, यासाठी राज्यपालांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी किसान सभेने केली होती. ...

चुकीच्या पद्धतीने अपात्र केलेल्या वन दाव्यांच्या पुन्हा सुनावण्या घ्याव्यात, यासाठी राज्यपालांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी किसान सभेने केली होती. राज्यपालांनी यानुसार अपात्र दावेदारांना संबंधित आयुक्तांकडे अपिल दाखल करण्याची संधी दिली होती. अहमदनगर जिल्ह्यात किसान सभेच्या पुढाकाराने यानुसार एक हजार एकशे पन्नास अपिले दाखल करण्यात आली होती. किसान सभेच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे या अपिलांची सुनावणी सुरू करण्यात आली आहे. आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या या सुनावण्यांच्या पहिल्या टप्प्यात सातेवाडी, कोथळे, पिंपरकणे, चिचोंडी या गावातील दाव्यांच्या सुनावण्या संपन्न झाल्या. सुनावणी घेताना कागदोपत्री पुराव्यांचा आग्रह न धरता कसत असलेल्या जमिनीचा प्रत्यक्ष ताबा व सभोवतालची वस्तुनिष्ठ भौतिक परिस्थिती यावरच दाव्याचा विचार करावा.

बिगर आदिवासींच्या वन दाव्यांबाबत तीन पिढ्यांचा जमीन कसण्याचा पुरावा नव्हे, तर तीन पिढ्यांचा रहिवासी पुरावा ग्राह्य धरून जमीन नावावर करावी अशी मागणी यावेळी किसान सभेच्या शिष्टमंडळाने अपील अधिकाऱ्यांकडे केली. अखिल भारतीय किसान सभेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले, जिल्हा सचिव नामदेव भांगरे, किसान सभेचे राजाराम गंभीरे, शिवराम लहामटे, गणपत मधे, एकनाथ मेंगाळ, अजित भांगरे उपस्थित होते.