शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
3
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
4
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
5
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
6
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
7
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
8
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
9
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
10
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
11
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
12
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
13
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
14
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
15
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
16
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
17
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
18
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
19
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
20
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?

नगर तालुका बाजार समिती, जिल्हा परिषदेसाठी हालचाली

By admin | Updated: July 13, 2016 00:31 IST

योगेश गुंड , नगर तालुका येत्या दोन महिन्यात होत असलेल्या नगर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आता तालुक्यातील राजकारण तापत असून

योगेश गुंड , नगर तालुकायेत्या दोन महिन्यात होत असलेल्या नगर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आता तालुक्यातील राजकारण तापत असून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी तालुक्यात मोर्चे बांधणीला वेग आला आहे. आ.शिवाजी कर्डिले यांच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी दादा पाटील शेळके यांना पुन्हा कुरुक्षेत्रात उतरवले जात असून त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय (भाजप सोडून) महाआघाडी स्थापन करण्यासाठी तालुक्यात राजकीय हालचाली वेगवान झाल्याने २० जुलै रोजी शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या नगर बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत सप्टेंबरमध्ये संपत आहे. यामुळे एक-दोन महिन्यात नगर बाजार समितीचे बिगुल वाजणार आहे. सध्या समितीवर आ.कर्डिले व माजी सभापती भानुदास कोतकर यांच्या गटाची एकहाती सत्ता आहे. तालुक्याचे ज्येष्ठ नेते दादा पाटील शेळके यांनी बाजार समितीचा कायापालट केला, त्यानंतर आ.कर्डिले यांनी शेतकरी भवन, नेप्ती बाजार समिती निर्माण करून शेळके यांच्या कार्याला शह दिला. मागील वेळी कर्डिले-कोतकर यांच्या विरोधात शिवसेना, दादा पाटील तसेच राष्ट्रवादीने मोठे आव्हान उभे करूनही या सर्वपक्षीय आघाडीचे तालुक्यात पानिपत झाले. मात्र निवडणुकीच्या तोंडावर कोतकर यांना खून प्रकरणात अटक झाली. यानंतर बाजार समितीच्या कारभाराला उतरती कळा आली. कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत करणे ही बाजार समितीला मुश्कील झाले. बाजार समितीकडे सर्वांचे दुर्लक्ष झाल्याने हजारो शेतकऱ्यांची कामधेनू असणारी ही समिती राजकारणाचा व संचालकांना चरण्याचा अड्डा बनली.दरम्यान, आता बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. मागील वेळी सत्ताधारी म्हणजे कर्डिले-कोतकर यांच्या विरोधात सेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी असो राज्यातील अनोखी राजकीय आघाडी घडून आली. त्यास अपयश आले. आता यावेळीही पुन्हा अशा आघाडीसाठी मोर्चेबांधणी सुरु झाली असून आता कर्डिले यांच्यासोबत निवडणुकीचे सर्व सूत्र हलवणारे कोतकर नसल्याने कर्डिले एकाकी आहेत. याच संधीचा फायदा घेण्यासाठी कर्डिले यांचे विरोधक दादा पाटील शेळके यांना तालुक्याच्या महाभारतासाठी कुरुक्षेत्रावर पाठवण्याचा डाव खेळत आहेत. यात शिवसेना कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आघाडीवर असल्याने पुन्हा मागील प्रमाणे कर्डिले विरोधकांना एकत्र करून त्यांच्या राजकीय वर्चस्वाला शह देण्याचा यामागे हेतू असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, यासाठी शेळके यांनी २० जुलै रोजी त्यांच्या कार्यालयात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे. कर्डिले यांच्याविरोधात बाजार समितीची निवडणूक लढवण्यासाठी चर्चा करून निर्णय घेण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना धाडले आहे. सत्ताधारी विरोधात परिवर्तन मंडळ स्थापन करण्यावर यात शिक्कामोर्तब होणार आहे.