शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

नगर-मनमाड महामार्ग अडविला

By admin | Updated: April 28, 2016 23:13 IST

अस्तगाव / राहाता : निळवंडे कृती समितीच्या वतीने नगर-मनमाड महामार्गावर पिंप्री निर्मळ (ता़ राहाता) येथे दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़

अस्तगाव / राहाता : निळवंडे धरणाच्या कालव्यांचे रखडलेले काम मार्गी लागावे, या मागणीसाठी निळवंडे कृती समितीच्या वतीने नगर-मनमाड महामार्गावर पिंप्री निर्मळ (ता़ राहाता) येथे दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ शेकडो महिला-पुरुषांनी रस्त्यावर उतरुन कालव्यांच्या कामांना निधीची मागणी केली तर अनेक शेतकऱ्यांनी रस्त्यावरच मुंडण करुन सरकारचा निषेध केला़निळवंडे धरणाच्या पाण्यावर नगरपंचायत, नगरपालिका, जादा लोकसंख्या असलेली गावे, धार्मिक स्थळे यांचे आरक्षण नसावे, निळवंडे धरणाचा जुना ठेकेदार बदलून नवा ठेकेदार नेमण्यात यावा, निळवंडे धरणाच्या कालव्याची कामे एका वर्षात पूर्ण करावीत, शासनाने लवकरात लवकर सुधारित प्रशासकीय मान्यता मंजूर करुन केंद्र सरकारची मदत मिळवण्यासाठी स्टेट फायनान्स क्लियरंस केंद्र सरकारकडे पाठवावे, या पाण्यावर कोणतेही आरक्षण टाकू नये, अशा विविध मागण्या आंदोलकांनी केल्या़ शेकडो महिलांनी पाण्याचे रिकामे हंडे घेऊन महामार्ग अडविला़ गुरुवारी नऊ वाजता सुरु केलेला हा रास्ता रोको सुमारे दोन तास चालला़ सरकारच्या निष्क्रीयतेच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत महामार्गावरच अनेक शेतकऱ्यांनी सामूहिक मुंडण केले़ त्यामुळे काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला. नगर-मनमाड महामार्गावर शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़राहात्याचे तहसीलदार सुभाष दळवी, जलसंपदा विभागाचे अभियंता मोरे यांनी आंदोलकांचे म्हणणे समजून घेत निवेदन स्वीकारले़ आंदोलनात खासदार सदाशिव लोखंडे, समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वर्पे, नानासाहेब शेळके, कार्याध्यक्ष गंगाधर गमे, संस्थापक नानासाहेब शेळके, सचिव उत्तमराव घोरपडे, उपाध्यक्ष रमेश शिंदे, उज्वलाताई शेळके, डॉ़ एकनाथ गोंदकर, प्राजक्त तनपुरे, दत्ता भालेराव, भाऊसाहेब शिंदे, जयंत गायकवाड, भाऊसाहेब थोरात, सोमनाथ दरंदले आदी उपस्थित होते़(वार्ताहर)लाभक्षेत्रातील शेतीला निळवंडेचे पाणी मिळेपर्यंत निळवंडेच्या पाण्याला हात लावू देणार नाही़-ज्ञानेश्वर वर्पे,अध्यक्ष, निळवंडे कृती समितीप्रवरा परिसरात २२ दिवसाला रोटेशन मिळते तर शेजारील शिर्डी व गणेश परिसरात १२० दिवसाला रोटेशन मिळते. आमच्यावर इतका मोठा अन्याय का? चाळीस वर्षापासून निळवंडेच्या नावावर आमदारकी, खासदारकी व मंत्रिपदे भोगणाऱ्यांनी कोणते प्रश्न सोडवले? -गंगाधर गमे,कार्याध्यक्ष, निळवंडे कृती समिती