शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
3
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
4
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
5
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
6
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
7
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
8
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
9
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
10
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
11
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
12
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
13
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
14
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
15
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
16
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
17
‘लजावल इश्क’वरून पाकिस्तानात गदारोळ; यूझर्सनी हा शो ‘बायकॉट’ करण्याचं केलं आवाहन
18
दिल्लीत नवा आदेश! ‘दरवाजे उघडा, डोळे बंद ठेवा’; नोकरशाहीच्या वर्तुळाला थंडीत घाम फुटण्याची वेळ
19
व्हिसाचे संकट, संधीचा व्हिसा! भारत जगात नवे स्थान निर्माण करू शकतो, जर...
20
भारतीय विद्यार्थ्यांच्या अमेरिकन ड्रीमची नौका बुडणार की काय?

नगर-औरंगाबाद महामार्ग अडविला

By admin | Updated: April 23, 2016 23:40 IST

नेवासाफाटा : दुष्काळीस्थितीत शेतकऱ्यांना किमान पाच तास पाणी देण्याच्या मागणीसाठी नगर-औरंगाबाद महामार्गावर शनिवारी दुपारी १२ वाजता अन्नदाता शेतकरी संघटनेने रास्ता रोको केला़

नेवासाफाटा : दुष्काळीस्थितीत शेतकऱ्यांना किमान पाच तास पाणी देण्याच्या मागणीसाठी नगर-औरंगाबाद महामार्गावरील नेवासाफाटा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शनिवारी दुपारी १२ वाजता अन्नदाता शेतकरी संघटनेने रास्ता रोको केला़ आंदोलकांनी महामार्गावरच टायर जाळून सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली़ यामुळे वातावरणात काही काळ तणाव निर्माण झाला होता़अन्नदाता शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष जयाजीराव सुर्यवंशी यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले़ विधानसभेने कायदा करुन पाण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. त्याप्रमाणे पहिले पिण्यासाठी नंतर शेतीसाठी व त्यानंतर उद्योगासाठी पाणी द्यावे, असा कायदा सरकारने केला आहे़ मात्र, सरकारच हा कायदा मोडून शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवित आहे. कारखान्याचे पाणी बंद केले तर कर्मचाऱ्यांची उपासमार होईल, असा डांगोरा पिटवून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप सुर्यवंशी यांनी आंदोलकांसमोर बोलताना केला़ यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अंबादास कोरडे, तालुकाध्यक्ष गफ्फुर बागवान, बद्रीबापू बोळवे, किशोर दसपुते, माउली मुळे, बद्री पाचोटे, शिवाजी रोडे, गणेश झगरे, रामदास विघ्ने, दत्तात्रय कुलट, विजय जगधने यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत महामार्गावरच टायर पेटविले़ त्यामुळे वातावरणात काही काळ तणाव निर्माण झाला होता़ त्याचवेळी नेवाशाचे तहसीलदार नामदेव टिळेकर यांनी आंदोलकांशी चर्चा करुन आपल्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहचविण्याचे आश्वासन दिले़ त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले़मुळा पाटबंधारे विभागाचे राजेंद्र कांबळे, कामगार तलाठी सोपान गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते. बिट हवालदार शिंदे, पोलीस नाईक शिरसाठ, लबडे, ढाकणे, जोशी, वाहतूक शाखेचे गरड यांनी चोख बंदोबस्त ठेवला.(वार्ताहर)