शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

देशासाठी मृत्यू आला तर माझे भाग्य : अण्णा हजारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 15:51 IST

लोकपाल नियुक्त करण्याची केंद्र सरकारची इच्छा दिसत नाही. हा जनतेचा विश्सासघात आहे. हृदयविकाराने मृत्यु येण्यापेक्षा देश आणि समाजासाठी मृत्यु आला तर ते माझे भाग्य समजेन, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त करत

राळेगण सिद्धी : लोकपाल नियुक्त करण्याची केंद्र सरकारची इच्छा दिसत नाही. हा जनतेचा विश्सासघात आहे. हृदयविकाराने मृत्यु येण्यापेक्षा देश आणि समाजासाठी मृत्यु आला तर ते माझे भाग्य समजेन, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त करत लोकपाल, लोकायुक्ताच्या नियुक्ती करीत नसल्याच्या निषेधार्थ महात्मा गांधी पुण्यतिथी (दि. ३० जानेवारी २०१९) पासून राळेगण सिद्धी येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारला दिला आहे.पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांना याबाबतचे लेखी पत्र हजारे यांनी शनिवारी (दि. १) पाठविले. देशात वाढत चाललेल्या भ्रष्टाचाराला कंटाळून जनतेने सन २०११ मध्ये लोकपाल, लोकायुक्त कायद्याच्या मागणीसाठी करोडोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन केले होते. त्यानंतरही वेळोवेळी आंदोलनातून दि. १ जानेवारी २०१४ रोजी लोकपाल, लोकायुक्त कायदा अस्तित्वात आला. कायदा पास झाल्यानंतर देशातील जनतेला मोठी आशा निर्माण झाली होती की, आता देशात लोकपाल लोकायुक्तांची नियुक्ती होईल आणि देशातील भ्रष्टाचाराला आळा बसेल. परंतू या आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्र सरकार सत्तेवर आले. पण लोकपाल, लोकयुक्त नियुक्ती झाली नाही. त्यानंतर २३ मार्च २०१८ रोजी मी पुन्हा दिल्लीतील रामलीला मैदानावर उपोषण सुरू केले. उपोषण सुरू असताना २९ मार्च २०१८ रोजी पंतप्रधान कार्यालयाने मला लिखित आश्वासन दिले. आम्ही लवकरात लवकर लोकपाल लोकायुक्त नियुक्त करू असे लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले. लोकपाल नियुक्ती झाली नाही तर मी पुन्हा २ आॅक्टोबर २०१८ पासून राळेगणसिद्धी येथे उपोषण सुरू करीन. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी सांगितले की, लोकपाल नियुक्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. सरकारला आणखी काही वेळ द्या. त्यांच्या विनंतीनुसार मी गांधी जयंतीपासूनचे उपोषण स्थगीत केले होते. देशातील जनतेचा प्रश्न आहे. देशातील भ्रष्टाचाराला रोखण्याचा प्रश्न आहे. त्यामुळे, आश्वासनानुसार लोकपाल , लोकायुक्त नियुक्ती झाली नाही तर आपण महात्मा गांधी पुण्यतिथीपासून पुन्हा उपोषण आंदोलन करू, असा इशारा हजारे यांनी दिला आहे.नियुक्तीत टाळाटाळ...लोकपाल लोकायुक्त नियुक्तीसाठी केंद्र सरकारशी तब्बल तीस वेळा पत्रव्यवहार केला. परंतू पंतप्रधानांनी एकाही पत्राचे साधे उत्तरही दिले नाही. विरोधी पक्ष नेता नाही, ज्येष्ठ विधिज्ञ नाही अशी वेगवेगळी कारणे सांगत सरकार लोकपाल नियुक्ती टाळत राहिले. दरम्यानच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने लवकरात लवकर लोकपाल नियुक्त करण्याविषयी केंद्र सरकारला अनेकदा फटकारले. तरीही काही ना काही कारणे देत केंद्राने गेल्या साडेचार वर्षात लोकपाल नियुक्ती करण्याचे टाळल्याचे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरanna hazareअण्णा हजारे