शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

माझा जिल्हा स्वच्छ जिल्हा, प्रकल्प राबविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2016 00:50 IST

अहमदनगर : संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून येत्या सोमवारपासून जिल्ह्यात माझा जिल्हा स्वच्छ जिल्हा,

अहमदनगर : संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून येत्या सोमवारपासून जिल्ह्यात माझा जिल्हा स्वच्छ जिल्हा, प्रकल्पास सुरुवात करण्यात येणार असल्याची घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंधारण व राजशिष्टाचारमंत्री राम शिंदे यांनी स्वातंत्र्यदिनी सोमवारी येथे केली़स्वातंत्र्यदिनानिमित्त येथील पोलीस कवायत मैदानावर राम शिंदे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले़ त्यावेळी ते बोलत होते़ खा़ दिलीप गांधी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा गुंड, उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, महापौर सुरेखा कदम, प्रभारी जिल्हाधिकारी भानुदास पालवे, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण आनंदकर आदी यावेळी उपस्थित होते़देशभर स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे़ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त स्वच्छ भारत महाभियान हाती घेण्यात आले आहे़ या अभियानांतर्गत स्वच्छ महाराष्ट्रासाठी १८ लाख गृहभेटी, हे राज्यव्यापी संपर्क अभियान येत्या २२ आॅगस्टपासून हाती घेण्यात येणार आहे़ या पार्श्वभूमीवर माझा जिल्हा स्वच्छ जिल्हा, हे अभियान हाती घेवून जिल्ह्यातील शौचालये नसणाऱ्या कुटुंबाना भेटी देवून शौचालय बांधण्यास प्रवृत्त केले जाणार आहे़ हा प्रकल्प जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार असून, सर्व शासकीय यंत्रणा अभियानात सहभागी होणार असल्याचे शिंदे यावेळी म्हणाले़ सरकारने नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत येत्या १ सप्टेंबरपासून राज्यभर महाअवयदान अभियानही हाती घेण्यात येणार आहे़ राज्यातील १२ हजारांहून अधिक रुग्ण अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत़ गरजू रुग्णांना अवयव उपलब्ध व्हावे, यासाठी ही महत्वाकांक्षी योजना हाती घेण्यात आली आह़े़ ही योजना जिल्हा, तालुकास्तरावर राबविण्यात येणार असून, अवयवाबाबत जनजागृती करण्याची गरज आहे़ सर्व शासकीय यंत्रणांकडून अभियानाचा प्रचार आणि प्रसार करण्यात येईल, असे शिंदे यांनी यावेळी सांगितले़(प्रतिनिधी)\जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यातील २७९ गावांत मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे करण्यात आली़ पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साठविणे शक्य झाले असून, एकूण ५६ हजार ५६८ टीसीएम पाणीसाठा विकेंद्रीत स्वरुपात उपलब्ध झाला आहे़ चालू अर्थिक वर्षात जलयुक्त अभियानासाठी २६४ गावांची निवड करण्यात आली आहे़ या गावांत जलसंधारणाची विविध कामे लोकसहभागातून करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले़ जलयुक्त शिवार अभियान राज्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून, या प्रकल्पामुळे पाणीपातळीतही वाढ होत आहे़