शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
4
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
5
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
6
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
7
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
8
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
9
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
10
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
11
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
12
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
13
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
14
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
15
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
16
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
17
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
18
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
19
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
20
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं

नगरसेवक नातेवाईकांच्या अतिक्रमणाला मनपाचे अभय

By admin | Updated: May 18, 2016 23:55 IST

अहमदनगर : नगररचना विभागाने जे मार्किंग केले, ते राजकीय दबावाखाली केल्याने नगरसेवकांच्या नातेवाईकांची घरे अतिक्रमणात असूनही तशीच ठेवण्यात आली.

अहमदनगर : नगररचना विभागाने जे मार्किंग केले, ते राजकीय दबावाखाली केल्याने नगरसेवकांच्या नातेवाईकांची घरे अतिक्रमणात असूनही तशीच ठेवण्यात आली. सामान्यांची घरे पाडण्यापूर्वी त्यांची घरे अगोदर पाडा, मग आम्ही स्वत:हून अतिक्रमण काढतो, असे सांगत नागरिकांनी महापालिकेच्या अतिक्रमण मोहिमेला विरोध केला. बुधवारी अतिक्रमणविरोधी पथकाने फकिरवाडा ते दर्गादायरा रस्त्यात अतिक्रमण केलेल्या सात घरांच्या संरक्षक भिंती पाडल्या. आयुक्तांनीही कायदेशीर बाबी तपासून समान न्याय देण्याऐवजी कारवाईत दुजाभाव केल्याचा आरोप नागरिकांनी केला. नगरोत्थान योजनेतून फकिरवाडा ते दर्गादायरा रस्त्यासाठी निधी मंजूर आहे. मात्र, अतिक्रमणामुळे रस्त्याचे काम तीन वर्षांपासून रखडले आहे. जुन्या लेआऊटमध्ये रस्ता ९ मीटर तर नवीन डीपीमध्ये तो १२ मीटर आहे. तीन दिवसांपूर्वीच नगररचना विभागाने रस्त्याचे मोजमाप करून अतिक्रमणाचे मार्किंग केले. मात्र, हे मार्किंग करत असताना नगरसेवकांच्या नातेवाईकांची घरे सोडून दिली. ज्या ठिकाणी ९ मीटरपेक्षा अधिक रस्ता मोकळा आहे, तेथे अतिक्रमण दाखविले तर जेथे ९ मीटरपेक्षा कमी आहे, तेथील अतिक्रमण दाखविले नाही. अतिक्रमणविरोधी पथकाचे प्रमुख सुरेश इथापे यांच्या नेतृत्वाखाली पथक अतिक्रमण काढण्यासाठी बुधवारी सकाळीच पोहोचले. नगररचना विभागाच्या या दुजाभावामुळे फकिरवाडा परिसरातील नागरिक संतप्त झाले. त्यांनी अतिक्रमण काढण्यास विरोध दर्शविला. माजी नगरसेवक संजय गाडे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला. वस्तुस्थिती समोर असल्याने अधिकारी निरुत्तर झाले. नगररचना विभागाचे अधिकारी तर तिकडे फिरकलेच नाही. तरीही नागरिकांचा विरोध मोडून काढत पथकाने सात घरांच्या संरक्षक भिंती तोडल्या. आयुक्तांची भूमिका संशयास्पदनगररचना विभागाने चुकीचे मार्किंग केल्याचा प्रकार अतिक्रमण विभागाने आयुक्त दिलीप गावडे यांच्या निदर्शनास आणून दिला. तसे केले तर नागरिकांचा रोष पत्कारावा लागेल, असे निदर्शनास आणून देखील आयुक्त गावडेंनी नगररचना विभागाचे समर्थन करत अतिक्रमणांना अभय देण्याचे धोरण स्वीकारले. बुधवारी नागरिकांचा विरोध झाल्यानंतर नगररचना विभाग व आयुक्त फकिरवाड्याकडे फिरकलेदेखील नाही. आयुक्त गावडे हे नगरमध्ये नव्यानेच रुजू झाले आहेत. कोणा अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवण्यापेक्षा त्यांनी वस्तुस्थिती घ्यावी, असे मत माजी नगरसेवक संजय गाडे यांनी व्यक्त केले. अतिक्रमणात दुजाभाव होत असेल तर कारवाई होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.