शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुका मुदतीतच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:25 IST

डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत मुदत संपणाऱ्या सर्वच नगरपंचायती व नगरपालिकांची निवडणूक मुदतीत घेण्याचा निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने ...

डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत मुदत संपणाऱ्या सर्वच नगरपंचायती व नगरपालिकांची निवडणूक मुदतीत घेण्याचा निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अंतिम प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम वेळेत पूर्ण करण्याचा यामागे उद्देश दिसून येतो, अशी माहिती प्रभारी नगरपालिका प्रशासन अधिकारी गणेश शिंदे यांनी ‘लोकमत’ला दिली.

जिल्ह्यातील श्रीरामपूर, राहता, कोपरगाव, संगमनेर, राहुरी, पाथर्डी या नगरपालिकांची मुदत डिसेंबरअखेर संपत आहे. पारनेर, जामखेड, कर्जत, शेवगाव या नगरपंचायतींची मुदत यापूर्वीच संपलेली आहे.

मागील निवडणुकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना कार्यरत होती. आता मात्र प्रथमच एक सदस्यीय प्रभाग रचना तयार केली जाणार आहे. त्यामुळे निवडणुकांमधील राजकीय डावपेच यावेळी बदलणार आहेत.

निवडणुकांच्या प्रभाग रचनेसाठी २०११ ची जनगणना ग्राह्य धरली जाणार आहे. त्याच बरोबर मागील निवडणुकीनंतर नगरपालिकेच्या हद्दीत झालेले बदल व विकास कामामुळे झालेले भौगोलिक बदल आराखडा तयार करताना विचारात घेतले जातील. २३ ऑगस्टपासून आराखड्याची कार्यवाही सुरू केली जाणार आहे. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेची परिपूर्ण माहिती असलेले अधिकारी, संगणक तज्ञ व इतर आवश्यक कर्मचाऱ्यांची मुख्याधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली जाणार आहे. कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता प्रभाग रचना करावी असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. जिल्हाधिकारी स्वतः प्रभाग रचनेस मान्यता देणार आहेत.

----------

जिल्ह्यातील काही नगरपंचायतींची मुदत संपून पाच ते सात महिने झाले आहेत. डिसेंबरअखेर मुदत संपणाऱ्या नगरपालिकांची प्रभाग रचना पूर्ण व्हायला हवी होती. आताचा घोषित झालेला कार्यक्रम दीड महिना उशिरा होतो आहे.

गणेश शिंदे, प्रभारी, नगरपालिका प्रशासनाधिकारी, नगर.

---------