शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमन बंब खरेदीबाबत मनपा बेफिकीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:17 IST

अहमदनगर : कोणात्याही कारणाने आग लागल्यास ती तत्काळ नियंत्रणात आणण्यासाठी यंत्रणा सज्ज असावी लागते. तशी खबरदारीही घेतली जाते. अहमदनगर ...

अहमदनगर : कोणात्याही कारणाने आग लागल्यास ती तत्काळ नियंत्रणात आणण्यासाठी यंत्रणा सज्ज असावी लागते. तशी खबरदारीही घेतली जाते. अहमदनगर महापालिका मात्र याबाबत बेफिकीर असल्याचेच समोर आले आहे. महापालिकेकडे दोनच अग्निशमनबंब आहेत. तेही जुने झाले आहेत. नवीन वाहनांचा प्रस्तावही धूळखात पडून आहे. आगीची मोठी घटना घडल्यानंतरच महापालिकेला जाग येणार का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

शहर व परिसरात लागलेली आग तत्काळ नियंत्रणात आणता यावी, यासाठी महापालिकेत स्वतंत्र अग्निशमन विभाग कार्यरत आहे. अग्निशमनबंब वेळेवेत पोहोचावा, यासाठी सावेडी व केडगाव, अशा दोन्ही ठिकाणी स्वतंत्र उपकेंद्र सुरू करण्यात आलेली आहेत. परंतु आग नियंत्रणात आणण्यासाठी लागणारे अग्निशमनबंब तिथे उपलब्ध नसतात. केवळ अग्निशमन केंद्र उभी करून आग नियंत्रणात आणता येते, असाच काहीसा समज महापालिकेतील पदाधिकाऱ्यांचा झालेला दिसतो.

महापालिकेच्या अग्निशमन विभागात दोन अग्निशमनबंब उपलब्ध आहेत. ते सन २००८मध्ये खरेदी केले गेले आहेत. एकूण कराच्या २ टक्के अग्निशमन कर लागू करून हा निधी अग्निशमन विभागाच्या बळकटीकरणासाठी वापरावा, असा प्रस्ताव या विभागाने २००९मध्ये दिला होता. मात्र, तो फेटाळण्यात आला. त्यामुळे या विभागासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध होऊ शकलेला नाही. अकरा वर्षे उलटूनही हा कर नगरकरांना लागू केला नाही. कर लागू न झाल्याने नागरिकांची बचत झाली. मात्र, अग्निशमन विभागाच्या बळकटीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला गेला नाही. सावेडी कचरा डेपोला गतवर्षी आग लागली होती. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी राहुरी व कोपरगाव नगरपालिकांचे अग्निशमन बंब मागविण्यात आले होते. शहर व परिसरात आग लागल्यास इतर ठिकाणांहून बंब बोलवावे लागतात. हे या घटनेवरून समोर आलेले आहे. तसेच आग लागल्यास महापालिकेचे अग्निशमन बंब वेळेवर पोहोचत नाहीत, अशी नगरसेवकांचीच तक्रार आहे. असे असताना अग्निशमनबंब खरेदी करण्यास विरोध का, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. अग्निशमनबंब खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना या विभागाला केल्या गेल्या. पण जिल्हा नियोजन समितीत अशी वाहने खरेदी करण्यासाठी तरतूदच नाही. त्यामुळे नवीन बंब खरेदीचा प्रस्ताव जवळपास बारगळला आहे.

...

अपुऱ्या मनुष्यबळामुळे यंत्रणा गाफील

महापालिकेच्या अग्निशमन विभागात सध्या १८ कर्मचारी कार्यरत आहेत. पुरेसे मनुष्यबळ नसल्याने केडगावातील उपकेंद्र अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. सावेडी उपनगरात स्वतंत्र केंद्र आहे. पण, तिथे अग्निशमन बंब नसतो. दोन्ही बंब माळीवाड्यातील मुख्यालयात उभे असतात. या परिसरात वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यात रस्ते अरुंद असल्याने बंब वेळेवेर पोहोचत नाहीत. मनुष्यबळही अपुरे असल्याने त्याचा परिणाम थेट सेवा पुरविण्यावर होत असून, याकडेही महापालिकेचे दर्लक्ष होत आहे.

........