शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

महापालिकेला हवेत ५५ कोटी!

By admin | Updated: June 1, 2014 00:23 IST

अहमदनगर : शहरात विविध विकास योजना राबविण्यासाठी शासनाने निधी दिला आहे. मात्र त्यात हिस्सा भरण्यासाठी महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाही.

अहमदनगर : शहरात विविध विकास योजना राबविण्यासाठी शासनाने निधी दिला आहे. मात्र त्यात हिस्सा भरण्यासाठी महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाही. योजनांचा हिस्सा भरण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने ५४ कोटी ६० लाख रुपयांची तरतूद करावी अशी मागणी महापौर संग्राम जगताप यांनी पालकमंत्री मधुकर पिचड यांच्याकडे केली आहे. मुळा धरणावरील पाणी पुरवठा योजनेसाठी ३३ केव्ही नवीन विद्युत वाहिनी टाकण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी महावितरण कंपनीने ५कोटी ९४ लाख रुपये खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले आहे. पिंपळगाव माळवी तलावातील गाळ काढून तलाव पुर्न:जिवीत करण्यासाठी महापालिकेला २ कोटी ५ लाख खर्च लागणार आहे. कोपरगाव-नगर रस्ता चौपदरीकरणामध्ये अहमदनगर शहर पाणी पुरवठा योजनेची बाधीत होत असलेली पाईपलाईन स्थलांतर करण्याऐवजी नव्याने टाकण्याचा प्रस्ताव जगताप यांनी मांडला. त्यासाठी २० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्याची तरतूद जिल्हा नियोजन समितीत करावी अशी मागणी जगताप यांनी केली. नगर शहरात भुयारी गटार योजना राबविण्यासाठी केंद्र शासनाने २६६ कोटी रुपये मंजूर केले आहेत. हा निधी लवकरच महापालिकेकडे वर्ग होईल. त्यात महापालिकेला दहा टक्के प्रमाणे २६ कोटी रुपयांचा हिस्सा भरावयाचा आहे. तथापी महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता ही रक्कम भरणे अशक्य आहे. शहरात या विकासाच्या योजना पूर्ण झाल्या तर शहराची समस्या सुटणार आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती हलाख्याची असल्याने जिल्हा नियोजन समितीकडून ५४ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मिळावा अशी मागणी महापौर संग्राम जगताप यांनी केली आहे. (प्रतिनिधी)