शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मुगाला जीवदान ; तूर, सोयाबीनला हवा दमदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:18 IST

रूईछत्तीसी : मागील आठवड्यात पडणाऱ्या रिमझिम पावसाने रूईछत्तीसी (ता. नगर) मुगाला जीवदान मिळाले. मात्र खरीप हंगामातील तूर, सोयाबीन, उडीद ...

रूईछत्तीसी : मागील आठवड्यात पडणाऱ्या रिमझिम पावसाने रूईछत्तीसी (ता. नगर) मुगाला जीवदान मिळाले. मात्र खरीप हंगामातील तूर, सोयाबीन, उडीद या पिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

रोहिणी नक्षत्रात झालेल्या समाधानकारक पावसाने रूईछत्तीसी परिसरात खरीप पिके चांगली जोमाने आली आहेत. मूग, सोयाबीन, तूर, बाजरी अशा पिकांची पेरणी करण्यात आली. मागील वर्षी मकाचे उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणात घेण्यात आले होते. परंतु, त्यावर पडणारा रोग आणि फवारणीसाठी येणारा खर्च विचारात घेता शेतकऱ्यांना मका पीक परवडत नाही. त्यामुळे यंदा मकाचे उत्पन्न घटले आहे. शेतकऱ्यांनी यंदा मूग, उडीद व तूर या पिकांवर भर दिला आहे.

मूग ऐन जोमात असताना पावसाने दडी मारली होती. मात्र नंतर थोडाफार झालेल्या पावसाने दिलासा दिल्याने मुगाच्या पिकाला जीवदान मिळाले. मागील वर्षीही शेतकऱ्यांना मुगाचे विक्रमी उत्पन्न मिळाले होते. यंदाही बऱ्यापैकी उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. आता पुन्हा शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. झालेल्या पावसावर आता मुगाचे पीक शेतकऱ्यांच्या हातात येणार आहे.

---

तूर, उडीद, सोयाबीन या पिकांना पावसाची गरज भासू लागली आहे. या पिकांना जास्त दिवस लागत असल्याने पावसाची जास्त गरज असते. पाऊस येणे फार गरजेचे आहे. पाऊस आला नाही तर ही पिके मातीमोल होणार आहेत.

यंदा पाऊस मागील वर्षीपेक्षा कमीच आहे. शेतकऱ्यांचे संपूर्ण जीवन पावसावर अवलंबून असल्याने संपूर्ण पिकांसाठी पाऊस येणे गरजेचे आहे.

-मारूती जगदाळे,

शेतकरी, रूईछत्तीसी

----

दरवर्षीपेक्षा यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याचे जाणवते. परंतु, शेतकऱ्यांची कोरोनाच्या काळात खूप आर्थिक अडचण झाल्याने खरीप पिकाचे उत्पन्न शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावणार आहे. त्यासाठी पाऊस येणे गरजेचे आहे.

-संतोष साके,

कृषी सहायक, रूईछत्तीसी

----

२४ रूईछत्तीसी मूग

पावसाच्या लंपडाव नंतरही रूईछत्तीसी परिसरात बहरलेला मूग.