शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या प्रश्नावर मात करणा-या  गावांवर चित्रपट : भाऊराव क-हाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 20:28 IST

लोकमत सरपंच अ‍ॅवार्ड पुरस्कारामुळे भन्नाट कामे करणारी गावे समजली. पाण्याच्या संकटावर मात करून जलसंधारणात उत्तम कामगिरी करणाऱ्या गावांची प्रेरणादायी कथा आगामी चित्रपटांद्वारे मांडणार आहे.

अहमदनगर : लोकमत सरपंच अ‍ॅवार्ड पुरस्कारामुळे भन्नाट कामे करणारी गावे समजली. पाण्याच्या संकटावर मात करून जलसंधारणात उत्तम कामगिरी करणाऱ्या गावांची प्रेरणादायी कथा आगामी चित्रपटांद्वारे मांडणार आहे. चित्रपट तयार करण्यासाठी अशा गावांचा सहभागी घेऊ, अशी घोषणा चित्रपट लेखक-दिग्दर्शक भाऊराव क-हाडे यांनी केली.लोकमत सरपंच अर्वार्ड पुरस्कारांचे नगर येथे बुधवारी एका शानदार कार्यक्रमात वितरण झाले. या कार्यक्रमात क-हाडे यांची प्रकट मुलाखत झाली. यावेळी क-हाडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमास आदर्श गाव हिवरेबाजारचे सरपंच तथा राज्य आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल गिते, हवामानतज्ज्ञ प्रा. डॉ. बी. एन. शिंदे, सीएसआरडी या संस्थेचे संचालक डॉ. सुरेश पटारे, नगर पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. वसंत गारुडकर, कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोक ढगे आदी उपस्थित होते.या वेळी लोकमत अहमदनगर आवृत्तीचे प्रमुख सुधीर लंके यांनी ‘ख्वाडा’ आणि ‘बबन’ या चित्रपटाचे दिग्दर्शक क-हाडे यांची मुलाखत घेतली. क-हाडे म्हणाले, धवल क्रांती, हरित क्रांती, औद्योगिक क्रांती झाली तरी गावे सुधारली नाहीत. हीच मध्यवर्ती कल्पना घेऊन ख्वाडा, बबन हे चित्रपट काढले. विकासाला आड येणारे ग्रामीण राजकारण चित्रपटातून मांडले. माणूस उभा करण्यासाठी गावाने प्रयत्न करावेत, ही भावना चित्रपटामागे होती. ग्रामपंचायत निवडणुकीत लढलो, मात्र जिंकलो नसलो तरी अनुभव मिळाला. सरपंचांना पंतप्रधानाइतकाच अधिकार आहे. सरपंचांनी चांगल्या विचाराने कामे केली तर देश सुधारण्यास वेळ लागणार नाही.यावेळी पोपटराव पवार म्हणाले, वाळू ही आंतरराष्टीय समस्या आहे. वाळू वाचवून अनेक गावांनी उत्तम काम केले आहे. वाळूच्या प्रश्नावर ‘लोकमत’ने चांगली मांडणी केली आहे. व्यसनाधिनतेमुळे गावात असुरक्षिततेची भावना आहे. गावे पाणीदार होतील, स्वच्छही होतील, मात्र ती संस्कारक्षम करण्याची गरज आहे. सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल गिते म्हणाले, सरपंचांमधून एक आमदार झाला पाहिजे, असा कायदा तयार व्हावा. सरपंचांना मानधन मिळावे, यासाठी सरपंच परिषद शासनस्तरावर लढा देणार आहोत. प्रा. बी. एन. शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांनी त्यांच्या निम्म्या शेतीवर झाडे लावली तर जागेवरच पाऊस येईल. कमी जागेत पाझर तलाव तयार करण्याचा आराखडाही शिंदे यांनी मांडला.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर