शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

पाण्याच्या प्रश्नावर मात करणा-या  गावांवर चित्रपट : भाऊराव क-हाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 20:28 IST

लोकमत सरपंच अ‍ॅवार्ड पुरस्कारामुळे भन्नाट कामे करणारी गावे समजली. पाण्याच्या संकटावर मात करून जलसंधारणात उत्तम कामगिरी करणाऱ्या गावांची प्रेरणादायी कथा आगामी चित्रपटांद्वारे मांडणार आहे.

अहमदनगर : लोकमत सरपंच अ‍ॅवार्ड पुरस्कारामुळे भन्नाट कामे करणारी गावे समजली. पाण्याच्या संकटावर मात करून जलसंधारणात उत्तम कामगिरी करणाऱ्या गावांची प्रेरणादायी कथा आगामी चित्रपटांद्वारे मांडणार आहे. चित्रपट तयार करण्यासाठी अशा गावांचा सहभागी घेऊ, अशी घोषणा चित्रपट लेखक-दिग्दर्शक भाऊराव क-हाडे यांनी केली.लोकमत सरपंच अर्वार्ड पुरस्कारांचे नगर येथे बुधवारी एका शानदार कार्यक्रमात वितरण झाले. या कार्यक्रमात क-हाडे यांची प्रकट मुलाखत झाली. यावेळी क-हाडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमास आदर्श गाव हिवरेबाजारचे सरपंच तथा राज्य आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल गिते, हवामानतज्ज्ञ प्रा. डॉ. बी. एन. शिंदे, सीएसआरडी या संस्थेचे संचालक डॉ. सुरेश पटारे, नगर पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. वसंत गारुडकर, कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोक ढगे आदी उपस्थित होते.या वेळी लोकमत अहमदनगर आवृत्तीचे प्रमुख सुधीर लंके यांनी ‘ख्वाडा’ आणि ‘बबन’ या चित्रपटाचे दिग्दर्शक क-हाडे यांची मुलाखत घेतली. क-हाडे म्हणाले, धवल क्रांती, हरित क्रांती, औद्योगिक क्रांती झाली तरी गावे सुधारली नाहीत. हीच मध्यवर्ती कल्पना घेऊन ख्वाडा, बबन हे चित्रपट काढले. विकासाला आड येणारे ग्रामीण राजकारण चित्रपटातून मांडले. माणूस उभा करण्यासाठी गावाने प्रयत्न करावेत, ही भावना चित्रपटामागे होती. ग्रामपंचायत निवडणुकीत लढलो, मात्र जिंकलो नसलो तरी अनुभव मिळाला. सरपंचांना पंतप्रधानाइतकाच अधिकार आहे. सरपंचांनी चांगल्या विचाराने कामे केली तर देश सुधारण्यास वेळ लागणार नाही.यावेळी पोपटराव पवार म्हणाले, वाळू ही आंतरराष्टीय समस्या आहे. वाळू वाचवून अनेक गावांनी उत्तम काम केले आहे. वाळूच्या प्रश्नावर ‘लोकमत’ने चांगली मांडणी केली आहे. व्यसनाधिनतेमुळे गावात असुरक्षिततेची भावना आहे. गावे पाणीदार होतील, स्वच्छही होतील, मात्र ती संस्कारक्षम करण्याची गरज आहे. सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल गिते म्हणाले, सरपंचांमधून एक आमदार झाला पाहिजे, असा कायदा तयार व्हावा. सरपंचांना मानधन मिळावे, यासाठी सरपंच परिषद शासनस्तरावर लढा देणार आहोत. प्रा. बी. एन. शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांनी त्यांच्या निम्म्या शेतीवर झाडे लावली तर जागेवरच पाऊस येईल. कमी जागेत पाझर तलाव तयार करण्याचा आराखडाही शिंदे यांनी मांडला.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर