शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

शिर्डीचे विश्वस्त मंडळ नियुक्त करण्याच्या हालचाली

By admin | Updated: April 15, 2016 00:33 IST

अहमदनगर : शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ तीन महिन्यात नियुक्त करण्याचे शपथपत्र राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दिले आहे. ही मुदत गुरुवारी संपली.

अहमदनगर : शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ तीन महिन्यात नियुक्त करण्याचे शपथपत्र राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दिले आहे. ही मुदत गुरुवारी संपली. न्यायालयाच्या अवमानाची कारवाई होण्याची भीती असल्याने विश्वस्त मंडळ नियुक्तीच्या हालचाली सुरु असल्याचे सरकारमधील सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ २०१२ मध्ये एका जनहित याचिकेमुळे राज्य सरकारने बरखास्त केले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने नियुक्त केलेली समिती सध्या संस्थानचा कारभार पाहत आहे. यामध्ये जिल्हा न्यायाधीश, जिल्हाधिकारी, संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा समावेश आहे. या त्रिसदस्यीय समितीवर निर्णय घेताना बंधने असल्याने अनेक निर्णय अडून पडले आहेत. साईबाबांच्या महासमाधी शताब्दी महोत्सवाची विविध कामे करण्यासाठी प्रकल्प सल्लागार नियुक्त करण्यासाठी संस्थानने न्यायालयात परवानगी मागितली आहे. या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी तीन महिन्यात व्यवस्थापन समिती नियुक्त करण्याची प्रक्रिया केली जाईल, असे शासनाकडून १४ जानेवारी रोजी न्यायालयात सांगण्यात आले होते. ही मुदत संपली आहे. या आठवड्यात सरकारने नियुक्त्या न केल्यास न्यायालयाकडून सरकारवर ताशेरे ओढले जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला असता हा धोरणात्मक निर्णय असल्याने याबाबत मुख्यमंत्र्यांच्या पातळीवरच निर्णय होईल असे सांगण्यात आले. यापूर्वी २००४ ते २०१२ अशी सलग नऊ वर्षे माजी आमदार व विखे समर्थक जयंत ससाणे हे या संस्थानचे अध्यक्ष होते. २०१२ साली तत्कालीन काँग्रेस सरकारने विश्वस्त मंडळात राजकारण्यांचाच भरणा केल्याने या नियुक्त्यांना आव्हान देण्यात आले होते. त्यामुळे नियुक्त्या रद्द कराव्या लागल्या. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणाच्या नियुक्त्या करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ........................ कदम, कोल्हे यांची नावे चर्चेत जिल्'ातील भाजपचे माजी आमदार व संघाचे निष्ठावंत कार्यकर्ते चंद्रशेखर कदम यांचे नाव संस्थानच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. याशिवाय आमदार स्रेहलता कोल्हे यांचेही नाव चर्चेत आहे. अनेक इच्छुकांनी आपली वर्णी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेतल्याचे समजते. ................ विखे यांचेही निवडीकडे लक्ष शिर्डी संस्थान हे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांच्या मतदारसंघात येते. त्यामुळे संस्थानवर कोणाची निवड होते, याकडे विखे यांचेही विशेष लक्ष आहे. संस्थानवरील नियुक्त्या लांबणे हे विखे यांच्यासाठी सोयीचे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.