शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
5
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
6
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
7
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
8
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
9
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
10
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
11
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
12
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
13
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
14
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
15
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
16
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
17
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
18
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
19
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
20
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ

ऊर्जा राज्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच महावितरणच्या जास्त तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:22 IST

केडगाव : नगर तालुक्यातील ग्रामीण भागात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. जीर्ण झालेल्या विद्युत वाहिन्या वारंवार नादुरुस्त होत असल्याने ...

केडगाव : नगर तालुक्यातील ग्रामीण भागात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. जीर्ण झालेल्या विद्युत वाहिन्या वारंवार नादुरुस्त होत असल्याने पुरेशा दाबाने वीज मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच महावितरणचे अधिकारी, कर्मचारीही वैतागले आहेत. ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मतदारसंघातील जेऊर परिसरातच शेतकऱ्यांच्या विजेच्या सर्वाधिक तक्रारी आहेत.

नगर तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये सध्या विजेचा लपंडाव सुरू आहे. तालुक्यात अनेक रोहित्र नादुरुस्त अवस्थेत आहेत. महावितरण कंपनीच्या कार्यालयाकडून रोहित्र तत्काळ बदलून मिळत नाहीत. तालुक्यातील बहुतेक विद्युत वाहिन्यांचे काम हे १९७० ते ८० च्या दशकात झालेले आहे. त्या विद्युत वाहिन्यांमध्ये सध्या मोठा झोळ पडलेला दिसतो. तसेच विद्युत वाहिन्यांचे खांबही अनेक ठिकाणी तिरपे झालेले आहेत. जुन्या विद्युत वाहिन्या असल्याने वारंवार काही ना काही बिघाड होत आहे. त्या दुरुस्त करण्यासाठी महावितरणचे कर्मचारीही वैतागले आहेत.

ग्रामीण भागात रोहित्र जळाले अथवा रोहित्रामध्ये काही बिघाड झाल्यास दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य शेतकरी वर्गणी करून आणत आहेत. महावितरण कंपनी बिल वसूल करते, मग दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांकडून पैसे का आकारले जातात, असा सवाल शेतकरी करीत आहेत. ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मतदारसंघातील जेऊर परिसरात विजेच्या प्रश्नावरून मागील आठवड्यात महावितरण विरोधात आंदोलनही झाले. मात्र त्यात अद्यापही सुधारणा झालेली नाही.

---

शेतीसाठी दिवसा ८ तास व रात्री १० तास वीज मिळते. मात्र त्यातही बहुतांशी वेळा अचानक वीज गायब होते. वीज गेली की कधी येईल ते सांगता येत नाही. दिवसातून चार-पाच वेळा वीज गायब होते. यामुळे शेतीला पाणी देण्यासाठी वीजपंप चलत नाहीत.

-अशोक कोकाटे,

ग्रामपंचायत सदस्य, चिंचोडी पाटील

-----

वाळकी व रुईचा भाग मिळून एकच फेज आहे. वाळकीतील आमराईवाडीत सिंगल फेज असल्याने अनेकवेळा दिवे उडतात. वीज जास्त काळ टिकत नाही. पूर्ण क्षमतेने रोहित्र चालत नाही. शेतीला पाणी देण्यास अडचणींचा सामना करावा लागतो. रुई व वाळकीसाठी स्वतंत्र फेज हवी.

-देवराम भालसिंग,

शेतकरी, वाळकी

----

जेऊर परिसरात विजेचा लपंडाव सुरू असून, शेतकरी वर्ग वैतागला आहे. कांदा लागवड सुरू असून, विजेअभावी मजुरांचा खोळंबा होत आहे. मजूर बसून राहत आहेत, तरी शेतकऱ्यांना त्यांची रोजंदारी द्यावीच लागते. काही शेतकरी डिझेल इंजिनच्या साहाय्याने कांदा लागवड करत आहेत. त्यामुळे डिझेलच्या खर्चामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. महावितरण कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे शेतकऱ्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष आहे.

-गोरक्षनाथ नानाभाऊ तोडमल,

शेतकरी, जेऊर

----

जुन्या विद्युत वाहिन्या दुरुस्तीचे काम चालू आहे. केडगाव लाईनवर भिस्तबाग व जेऊर दोन सबस्टेशन सुरू आहेत. त्यामुळे ओव्हरलोड होऊन जेऊर सेक्शनला समस्या वाढल्या आहेत. नगर तालुक्यात सर्वात जास्त थकबाकी जेऊर सेक्शनचीच आहे. वीज बिलमाफीसाठी योजना आणूनही शेतकऱ्यांनी लाभ घेतला नाही. कर्मचाऱ्यांच्या पगाराएवढेसुद्धा उत्पन्न मिळत नाही. सर्व नागरिकांनी थकबाकी भरून विद्युत वितरण कंपनीला सहकार्य करावे.

-किसन कोपनर,

उपकार्यकारी अभियंता, महावितरण