शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

शहरातील दोनशेहून अधिक विहिरी गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:46 IST

अहमदनगर : एकेकाळी शहरातील दिल्लीगेट, माळीवाडा नालेगाव भागात अडीचशेहून अधिक विहिरी होत्या. दुष्काळात या विहिरीतूनच नगरकरांना पिण्याचे पाणी ...

अहमदनगर : एकेकाळी शहरातील दिल्लीगेट, माळीवाडा नालेगाव भागात अडीचशेहून अधिक विहिरी होत्या. दुष्काळात या विहिरीतूनच नगरकरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत होते. परंतु, काळानुसार शहरातील नागरी शहरातील नागरी वस्ती वाढली आणि दोनशेहून अधिक विहिरी गायब झाल्या आहेत.

नगर शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. शहरातील दिल्लीगेट ते माळीवाडा, नालेगाव, नवीपेठ, गुजरगल्ली आदी भागात २७० विहिरी होत्या. सन १९५२ मधील दुष्काळात या विहिरींचा वापर केला गेला. नागरिक सायकलवरून पिण्याच्या पाण्याची वाहतूक करत होते. तसेच १९७२ च्या दुष्काळातही विहिरी उपलब्ध होत्या. बाळाजीबुवा विहिरीत सहा बैलांची मोट चालत होती. नागरिक सायकलवरून पिण्याचे पाणी घेऊन जात होते. पुरातन विहिरींमुळे दुष्काळातही नगरकरांना पाणी उपलब्ध झाले. परंतु, काळानुसार बदल होऊन पाणी योजना आली. पाणी योजनेद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध झाले. त्यामुळे विहिरींचा वापर कमी झाला.

....

गणेश विसर्जनासाठी चार विहिरींचे संवर्धन

गणेश विसर्जनासाठी महापालिकेकडून नालेगाव येथील बाळाजीबुवा, यशोदानगर, केडगाव आणि औरंगाबाद रोडवरील विहिरींची दरवर्षी स्वच्छता केली जाते. इतर वेळी कचरा, गवत आदींनी विहिरी भरलेल्या असतात. याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे.

....

२७० विहिरींची नाेंद

शहरातील जुन्या २७० विहिरींची शासन दप्तरी नोंद आहे. यापैकी चारच विहिरी अस्तित्वात आहेत. या विहिरींचा वापर गणेश विसर्जनासाठी केला जात असून, त्या बंदिस्त करण्यात आलेल्या आहेत.

....

शहरातील दिल्लीगेट, माळीवाडा, नालेगाव आदी भागांत २७० विहिरी होत्या. या विहिरींची शासन दप्तरी नोंद आहे. प्रत्यक्षात मात्र दोनशेहून अधिक विहिरी गायब आहेत. याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झालेले आहे.

- शशिकांत चंगेडे, ज्येष्ठ माहिती अधिकारी कार्यकर्ते

...

सूचना डमी क्रमांक- १११२

..

सूचना फोटो: ०१ महापालिका नावाने आहे.