शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

सीईओंच्या इशाऱ्याने ५० टक्केहून अधिक कर्मचाऱ्यांची बदल्यातून माघार

By चंद्रकांत शेळके | Updated: May 10, 2023 21:51 IST

अहमदनगर : जिल्हा परिषद बदल्यांमध्ये सवलत घेण्यासाठी सादर केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र बोगस आढळले तर थेट बडतर्फीची कारवाई करण्याचा इशारा ...

अहमदनगर : जिल्हा परिषद बदल्यांमध्ये सवलत घेण्यासाठी सादर केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र बोगस आढळले तर थेट बडतर्फीची कारवाई करण्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिल्यानंतर कारवाईच्या भीतीने दोन दिवसांत ५० टक्क्याहून अधिक कर्मचाऱ्यांनी माघार घेत बदली घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे अनेकांनी बोगस प्रमाणपत्र दिले होते, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान, येरेकर यांच्या या क्रांतिकारक निर्णयाचे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमधून स्वागत होत आहे. 

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी बदल्यांमध्ये सवलत मिळण्यासाठी जी वैद्यकीय प्रमाणपत्रे जोडली आहेत, त्याची संबंधित कर्मचाऱ्यांनी १५ दिवसांत वैद्यकीय मंडळाकडून पडताळणी करून आणावी. तोपर्यंत बदल्यांचे आदेश तात्पुरते राहतील, असा पारदर्शी निर्णय जिल्हा परिषद बदल्यांमध्ये सीईओ आशिष येरेकर यांनी घेतला आहे. त्यामुळे बनावट प्रमाणपत्र सादर करणारे कर्मचारी धास्तावले असून त्यांनी गेल्या दोन दिवसांत बदल्यांमधून माघार घेतली आहे. विनंती बदलीसाठी आधी कागदपत्रे सादर केली, परंतु सीईओंच्या इशाऱ्यानंतर बदलीस नकार देणाऱ्यांचे हे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

बदलीसाठी सादर केलेले प्रमाणपत्र खोटे आढळले, तर थेट बडतर्फीची कारवाई होईल. त्यामुळे ज्यांनी असे प्रकार केले असतील, त्यांनी आताच ते कबूल करून बदली सवलतीचा हक्क सोडावा. हीच अखेरची संधी आहे, असा इशारा येरेकर प्रत्येक विभागाची बदली प्रक्रिया सुरू होण्याआधी देत आहेत. त्यामुळे बदल्यांतून माघार घेणाऱ्यांचे प्रमाण रोजच वाढत आहे. याचाच अर्थ बदल्यांसाठी मोठ्या प्रमाणात बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र सादर झाले आहेत. ‘लोकमत’ने प्रारंभीपासून अशी बोगसगिरी झाली असल्याची शक्यता वर्तवली होती. त्यामुळे ‘लोकमत’च्या वृत्तावरही यानिमित्ताने शिक्कामोर्तब झाले आहे. येरेकर यांच्या निर्णयाचे स्वागत बदल्यांमधील वैद्यकीय प्रमाणपत्र त्रयस्थ यंत्रणेकडून पडताळणी करण्याचा सीईओ येरेकर यांनी घेतलेला निर्णय क्रांतीकारक आहे. त्यांच्या या निर्णयामुळे केवळ बोगसगिरीच उघड झालेली नाही, तर प्रामाणिक कर्मचाऱ्यांनाही न्याय मिळाला आहे, असे म्हणत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर