शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सीईओंच्या इशाऱ्याने ५० टक्केहून अधिक कर्मचाऱ्यांची बदल्यातून माघार

By चंद्रकांत शेळके | Updated: May 10, 2023 21:51 IST

अहमदनगर : जिल्हा परिषद बदल्यांमध्ये सवलत घेण्यासाठी सादर केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र बोगस आढळले तर थेट बडतर्फीची कारवाई करण्याचा इशारा ...

अहमदनगर : जिल्हा परिषद बदल्यांमध्ये सवलत घेण्यासाठी सादर केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र बोगस आढळले तर थेट बडतर्फीची कारवाई करण्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिल्यानंतर कारवाईच्या भीतीने दोन दिवसांत ५० टक्क्याहून अधिक कर्मचाऱ्यांनी माघार घेत बदली घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे अनेकांनी बोगस प्रमाणपत्र दिले होते, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान, येरेकर यांच्या या क्रांतिकारक निर्णयाचे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमधून स्वागत होत आहे. 

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी बदल्यांमध्ये सवलत मिळण्यासाठी जी वैद्यकीय प्रमाणपत्रे जोडली आहेत, त्याची संबंधित कर्मचाऱ्यांनी १५ दिवसांत वैद्यकीय मंडळाकडून पडताळणी करून आणावी. तोपर्यंत बदल्यांचे आदेश तात्पुरते राहतील, असा पारदर्शी निर्णय जिल्हा परिषद बदल्यांमध्ये सीईओ आशिष येरेकर यांनी घेतला आहे. त्यामुळे बनावट प्रमाणपत्र सादर करणारे कर्मचारी धास्तावले असून त्यांनी गेल्या दोन दिवसांत बदल्यांमधून माघार घेतली आहे. विनंती बदलीसाठी आधी कागदपत्रे सादर केली, परंतु सीईओंच्या इशाऱ्यानंतर बदलीस नकार देणाऱ्यांचे हे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

बदलीसाठी सादर केलेले प्रमाणपत्र खोटे आढळले, तर थेट बडतर्फीची कारवाई होईल. त्यामुळे ज्यांनी असे प्रकार केले असतील, त्यांनी आताच ते कबूल करून बदली सवलतीचा हक्क सोडावा. हीच अखेरची संधी आहे, असा इशारा येरेकर प्रत्येक विभागाची बदली प्रक्रिया सुरू होण्याआधी देत आहेत. त्यामुळे बदल्यांतून माघार घेणाऱ्यांचे प्रमाण रोजच वाढत आहे. याचाच अर्थ बदल्यांसाठी मोठ्या प्रमाणात बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र सादर झाले आहेत. ‘लोकमत’ने प्रारंभीपासून अशी बोगसगिरी झाली असल्याची शक्यता वर्तवली होती. त्यामुळे ‘लोकमत’च्या वृत्तावरही यानिमित्ताने शिक्कामोर्तब झाले आहे. येरेकर यांच्या निर्णयाचे स्वागत बदल्यांमधील वैद्यकीय प्रमाणपत्र त्रयस्थ यंत्रणेकडून पडताळणी करण्याचा सीईओ येरेकर यांनी घेतलेला निर्णय क्रांतीकारक आहे. त्यांच्या या निर्णयामुळे केवळ बोगसगिरीच उघड झालेली नाही, तर प्रामाणिक कर्मचाऱ्यांनाही न्याय मिळाला आहे, असे म्हणत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर