शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे दररोज पाच कोटींहून अधिक नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:21 IST

श्रीरामपूर : जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय मंगळवारी घेतल्यामुळे हंगामी पिके घेणाऱ्या भाजीपाला उत्पादक ...

श्रीरामपूर : जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय मंगळवारी घेतल्यामुळे हंगामी पिके घेणाऱ्या भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयापूर्वीच स्थानिक प्रशासनाने अनेक ठिकाणी बाजार समित्यांचे व्यवहार बंद केले होते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे दररोज पाच कोटी रुपयांहून अधिक नुकसान होत आहे.

हंगामी पिके असलेली टरबूज, टोमॅटो, वांगी, मिरची व कांदा यांना जास्त फटका बसणार आहे. काही शेतमाल शेतातच फेकून देण्याची वेळ आली आहे. गुंठेवारी क्षेत्रात उत्पादित होणारी मेथी, शेपू, कोथिंबीर, पालक यांचीही हातावर विक्री करावी लागत आहे. उन्हाळ्यात याच काळात भाजीपाला पिकांना चांगले दर मिळतात; मात्र सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाऊनचा फटका बसला आहे. ही सर्व नाशवंत पिके असल्यामुळे त्यांची साठवणूकही करता येत नाही.

कधी बाजार समितीचे व्यवहार ठप्प, कधी शहरे लॉकडाऊन तर कधी ग्रामपंचायतींनी पुकारलेला बंद यामुळे भाजीपाला विकायचा तरी कुठे? असा शेतकऱ्यांपुढे प्रश्न आहे. प्रत्येक बाजार समितीत दररोज होणारी ३० ते ४० लाख रुपयांची सरासरी उलाढाल थांबली आहे.

-----

मिरचीची तोडणी बंद

श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथील शेतकरी विलास कदम यांनी एक एकर क्षेत्रावरील मिरचीची तोडणी बंद केल्याची माहिती दिली. या काळात किलोमागे ५० ते ६० रुपये दर मिळणे अपेक्षित होते; मात्र आता कुठेही मोठा खरेदीदार नसल्याने घरी जागेवरच ग्राहकांना किरकोळ विक्री करतो अशी कैफियत सांगितली.

-----

वांगी शेतातच फेकली

संगमनेर तालुक्यातील कनोली येथील शेतकरी संदीप वर्पे यांनी वांगी शेतातच तोडून फेकून देत असल्याचे सांगितले. वांग्याचा सर्वात मोठा बाजार असलेली नाशिक बाजार समिती बंद आहे. त्यामुळे केवळ झाडावरील मालाची काढणी करून ते फेकून देत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. टोमॅटोच्या २० किलो क्रेटचे दर अवघे १२० रुपयांवर आले आहेत असे वर्पे म्हणाले.

----

टरबूज ४ रुपये किलो

एरवी १० ते १२ रुपये किलो दराने विक्री होणारे टरबूज शेतकऱ्यांनी सध्या ग्राहकांअभावी घरातच ढीग मारून ठेवले आहेत. अनेक ठिकाणी महामार्गांवर ट्रॅक्टरमधून विक्रीचा प्रयत्न करून पाहिला. मात्र लॉकडाऊनमुळे तो प्रयोगही फसला.

----

ग्राहकांना मात्र चढे दर

लॉकडाऊन व बाजार समित्यांच्या बंदमुळे काही व्यापारी शेतकऱ्यांकडून पडलेल्या दरात मालाची खरेदी करतात. मात्र ग्राहकांना चढ्या दरांतच भाजीपाला उपलब्ध होत आहे. शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही आर्थिक झळ बसली आहे.

----

जिल्हाधिकारी यांनी बाजार समितीचे व्यवहार बंद केले असले तरी सायंकाळी जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी बैठकीचे आयोजन केले आहे. किमान भाजीपाल्याचे व्यवहार सुरू ठेवण्यासाठी नव्याने मागणी केली जाणार आहे.

- अभय भिसे, सचिव, बाजार समिती, नगर