शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

मोदींनी कळसूबाई शिखरावरून महाराष्ट्र दर्शन घ्यावे

By admin | Updated: October 7, 2014 23:50 IST

श्रीगोंदा : शरद पवारांच्या स्वाभिमानी नेतृत्वाखाली महाराष्ट्र गुजरात पेक्षा आघाडीवर आहे.

श्रीगोंदा : शरद पवारांच्या स्वाभिमानी नेतृत्वाखाली महाराष्ट्र गुजरात पेक्षा आघाडीवर आहे. भाजपावाल्यांनी खोटी जाहिरातबाजी करून महाराष्ट्राची बदनामे केली आहे. मोदींनी भाषणबाजी करण्यापेक्षा कळसूबाई शिखरावरून महाराष्ट्राच्या विकासाचे दर्शन घ्यावे, असा टोला राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यानी मारला आहे.राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल जगताप यांच्या प्रचारार्थ बेलवंडीयेथे आयोजित सभेस भुजबळांनी आपल्या शैलीत भाजपावर चौफेर हल्ला चढविला. अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे होते.भुजबळ पुढे म्हणाले की शरद पवारांनी देशातील शेतकऱ्यांचे ७० हजार कोटीचे कर्ज माफ केले. मात्र ‘अच्छे दिन’ चे स्वप्न दाखविणाऱ्या मोदी सरकारने कांदा निर्यातबंद केली. डाळिंबाचे भाव कमी केले. दूध व्यवसायाची वाट लावली.कै. गोपीनाथ मुंडें मुळे भाजपाला बहुजनाचा चेहरा होता, गडकरी, फडणवीस, जावडेकर, गोयल यांच्यामुळे भाजपाचा शेठजी भटजीचा चेहरा पुढे आला. शाहू, फुले, आंबेडकरांच्या मातीतून जातीवादी प्रवृत्तीला मूठमाती देण्याची गरज आहे.गुजरातला महाराष्ट्राने सयाजीराव गायकवाड सारखा राजा दिला. त्यामुळे मोदीच्या विचाराची गरज नसून शरद पवार हे महाराष्ट्राचे समर्थ नेते आहेत. मुंबई मोरारजी देसाईच्या घशातून एकदा काढली आहे, पुन्हा मोदीकडे देण्याची चूक महाराष्ट्रातील जनता करणार नाही. यावेळी कमल सावंत, प्रा. तुकाराम दरेकर, हरिदास शिर्के, भरत नहाटा, अनिल ठवाळ यांची भाषणे झाली. यावेळी प्रकाश शेंडगे, शिवाजीराव नागवडे, राजेंद्र नागवडे, कैलास पाचपुते, संध्या जगताप, मंगला कौठाळे, गयाबाई सुपेकर उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)