शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनी कळसूबाई शिखरावरून महाराष्ट्र दर्शन घ्यावे

By admin | Updated: October 7, 2014 23:50 IST

श्रीगोंदा : शरद पवारांच्या स्वाभिमानी नेतृत्वाखाली महाराष्ट्र गुजरात पेक्षा आघाडीवर आहे.

श्रीगोंदा : शरद पवारांच्या स्वाभिमानी नेतृत्वाखाली महाराष्ट्र गुजरात पेक्षा आघाडीवर आहे. भाजपावाल्यांनी खोटी जाहिरातबाजी करून महाराष्ट्राची बदनामे केली आहे. मोदींनी भाषणबाजी करण्यापेक्षा कळसूबाई शिखरावरून महाराष्ट्राच्या विकासाचे दर्शन घ्यावे, असा टोला राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यानी मारला आहे.राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल जगताप यांच्या प्रचारार्थ बेलवंडीयेथे आयोजित सभेस भुजबळांनी आपल्या शैलीत भाजपावर चौफेर हल्ला चढविला. अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे होते.भुजबळ पुढे म्हणाले की शरद पवारांनी देशातील शेतकऱ्यांचे ७० हजार कोटीचे कर्ज माफ केले. मात्र ‘अच्छे दिन’ चे स्वप्न दाखविणाऱ्या मोदी सरकारने कांदा निर्यातबंद केली. डाळिंबाचे भाव कमी केले. दूध व्यवसायाची वाट लावली.कै. गोपीनाथ मुंडें मुळे भाजपाला बहुजनाचा चेहरा होता, गडकरी, फडणवीस, जावडेकर, गोयल यांच्यामुळे भाजपाचा शेठजी भटजीचा चेहरा पुढे आला. शाहू, फुले, आंबेडकरांच्या मातीतून जातीवादी प्रवृत्तीला मूठमाती देण्याची गरज आहे.गुजरातला महाराष्ट्राने सयाजीराव गायकवाड सारखा राजा दिला. त्यामुळे मोदीच्या विचाराची गरज नसून शरद पवार हे महाराष्ट्राचे समर्थ नेते आहेत. मुंबई मोरारजी देसाईच्या घशातून एकदा काढली आहे, पुन्हा मोदीकडे देण्याची चूक महाराष्ट्रातील जनता करणार नाही. यावेळी कमल सावंत, प्रा. तुकाराम दरेकर, हरिदास शिर्के, भरत नहाटा, अनिल ठवाळ यांची भाषणे झाली. यावेळी प्रकाश शेंडगे, शिवाजीराव नागवडे, राजेंद्र नागवडे, कैलास पाचपुते, संध्या जगताप, मंगला कौठाळे, गयाबाई सुपेकर उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)