शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
2
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
3
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
4
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
5
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
6
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड
7
Bigg Boss 19 Contestant List : 'बिग बॉस १९'मध्ये कोण जाणार? लिस्ट आली समोर, नावं वाचून थक्कच व्हाल
8
Video : युद्धाच्या १२ दिवसांनंतर इराणचा 'पॉवर शो', एका मिनिटात ११ मिसाईल डागून जगाला दिली 'ही' वॉर्निंग!
9
Dream11, एमपीएल, झूपीसह अनेक कंपन्यांकडून 'रियल मनी गेम्स' बंद; तुमच्या पैशांचं काय होणार?
10
२८ कोटी युझर्स, ९६०० कोटींचा महसूल; Dream 11 चा 'गेम' झाला, गेमिंग विधेयकानंतर बंद करण्याची तयारी?
11
बाई हा काय प्रकार? 'पुढचं पाऊल' फेम अभिनेत्रीचा प्रताप, नवऱ्याचं फक्त धड चेहरा गायब
12
मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?
13
तुमचा ITR रिफंड अडकला आहे? कधीपर्यंत मिळणार? प्राप्तीकर विभागाकडून मोठी अपडेट
14
Shravan Shukravar 2025: शेवटच्या श्रावण शुक्रवारनिमित्त देवीचे 'असे' करा कुंकुमार्चन; होईल शीघ्रकृपा!
15
१०००, २०००, ३०००, ४०००...स्मार्टफोनच्या विक्रीतून दुकानदार किती कमाई करतात? जाणून घ्या
16
माय-लेकीने मिळून घरच्या कर्त्या पुरुषाला संपवलं अन् पोलिसांसमोर रचला बनाव! कसा उघड झाला गुन्हा?
17
मराठी, इंग्रजी, गणितात किती मार्क, विश्वास नांगरे पाटलांची आठवीतील गुणपत्रिका बघितली का?
18
'माझ्या बॉयफ्रेंडशी लई गुलूगुलू बोलते' रागातून होमगार्ड महिलेची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला
19
'ट्रेडिंग गुरू' अवधूत साठे सेबीच्या रडारवर; कर्जतच्या क्लासवर मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?
20
"मी वेगळा रस्ता निवडतोय...", टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, घटस्फोट की आणखी काही?

मोदींनी ग्रामस्थांशी संवाद साधलाच नाही; नागरिकांचा अपेक्षा भंग

By admin | Updated: April 30, 2017 18:55 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ग्रामस्थांशी थेट संवाद साधणार असल्याच्या अपेक्षेने सर्व गाव व्हिडीओ कॉन्फरन्ससाठी हॉलमध्ये जमा झाला़

आॅनलाइन लोकमतपिंपळगाव माळवी (अहमदनगर), दि़ ३० - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ग्रामस्थांशी थेट संवाद साधणार असल्याच्या अपेक्षेने सर्व गाव व्हिडीओ कॉन्फरन्ससाठी हॉलमध्ये जमा झाला़ मात्र, मोदींनी गावकऱ्यांशी संवाद न साधता केवळ ‘मन की बात’ ऐकविल्यामुळे ग्रामस्थांचा अपेक्षा भंग झाला़पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात रविवारी (दि़ ३०) ते पिंपळगाव माळवी (ता़ नगर) ग्रामस्थांशी संवाद साधणार असल्याचे भाजपाच्यावतीने गावकऱ्यांना सांगण्यात आले होते़ प्रसिद्धी माध्यमांनाही खा़ दिलीप गांधी यांनी पंतप्रधान मोदी पिंपळगाव ग्रामस्थांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार असल्याचे कळविले होते़ या कार्यक्रमाची गावात जय्यत तयारी करण्यात आली होती़ जिल्हा परिषद शाळेमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सचा सेट उभा करण्यात आला होता़ सकाळी ११ वाजता पंतप्रधान मोदी संवाद साधणार असल्यामुळे गावकरी मोठ्या अपेक्षेने शाळेत दाखल झाले़ टीव्हीवरुन सकाळी ११ वाजता मोदींची ‘मन की बात’ कार्यक्रम सुरु झाला़ सर्व ग्रामस्थ टीव्हीसमोर कान देऊन मोदींची ‘मन की बात’ ऐकू लागले़ कार्यक्रम संपला तरी मोदींनी ग्रामस्थांशी संवाद साधलाच नाही़ त्यामुळे अपेक्षा भंग झालेल्या ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली़ त्यावेळी तेथे उपस्थित असलेले क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे माधव जायभाय, अविनाश गरुड यांनी उपस्थित काही ग्रामस्थांच्या कार्यक्रमाबाबत आणि सरकारच्या कामगिरीबाबत प्रतिक्रिया घेतल्या़ यावेळी पिंपळगाव माळवीचे सरपंच संतोष झिने, डोंगरगणचे सरपंच कैलास पटारे, ग्रामंपचायत सदस्य एकनाथ गुंड, विश्वनाथ गुंड, योगेश झिने, बापू बेरड, नानासाहेब झिने, भास्कर जाधव, अजित बोरा, डॉ़ महावीर बोरा आदी उपस्थित होते़ ़़़़़़़़़आम्ही शेतीतील काम बुडवून येथे आलो़ आमचा वेळ गेला़ मात्र, मोदींशी संवाद न झाल्याने नाराजीच पदरात पडली़-गोरख आढाव, ग्रामस्थ़़़़़़़़़़़़शेतमालाचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांना अतिशय वाईट दिवस आले आहेत़ मोदी आमच्याकडून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतील, असे वाटले होते़ पण त्यांनी आमच्याशी संवाद साधलाच नाही़-नानासाहेब झिने, ग्रामस्थ़़़़़़़़़़़उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली़ त्याप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, अशी विनंती आम्ही पंतप्रधानांना करणार होतो़ परंतु त्यांच्याशी आमचा संवाद झालाच नाही़-संदीप झिने, ग्रामस्थ