शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
5
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
8
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
9
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
10
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
11
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
12
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
13
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
14
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
15
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
16
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
17
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
18
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
19
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
20
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!

रस्त्यावरून आमदार-महापौर आमने-सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 22:17 IST

अहमदनगर : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील रस्त्याच्या कामावरून आमदार संग्राम जगताप आणि महापौर सुरेखा कदम यांच्यात जुंपली आहे. राजकीय द्वेषापायी महापौरांनी आठ महिने रस्त्याचा प्रस्ताव महासभेच्या विषय पत्रिकेवर घेतला नसल्याचा आरोप आ. जगताप यांनी केला. तर विकास कामात अडथळे आणणारेच आंदोलने करीत आहेत. ४० कोटीचा गाजावाजा करणाºयांना महत्त्वाचा रस्ता करता आला नाही, हे दुर्दैव असल्याची टीका महापौरांनी आमदारांवर केली आहे.

अहमदनगर : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील रस्त्याच्या कामावरून आमदार संग्राम जगताप आणि महापौर सुरेखा कदम यांच्यात जुंपली आहे. राजकीय द्वेषापायी महापौरांनी आठ महिने रस्त्याचा प्रस्ताव महासभेच्या विषय पत्रिकेवर घेतला नसल्याचा आरोप आ. जगताप यांनी केला. तर विकास कामात अडथळे आणणारेच आंदोलने करीत आहेत. ४० कोटीचा गाजावाजा करणाºयांना महत्त्वाचा रस्ता करता आला नाही, हे दुर्दैव असल्याची टीका महापौरांनी आमदारांवर केली आहे.जिल्हाधिकारी कार्यालय ते स्टेट बँक चौक ते चांदणी चौक ते नगर कॉलेज रस्त्याचे डांबरीकरण, मजबुतीकरण, रुंदीकरण आणि जलनिस्सारण व्यवस्था याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या बांधकाम विभागाने तयार करून नगरसचिवांकडे दिला होता. मात्र या प्रस्तावावर आठ महिन्यांपासून कोणतीही कार्यवाही झाली नाही. या रस्त्यासाठी निधी नसल्याने सदरचा रस्ता जिल्हा नियोजनमधून करण्याबाबतचे पत्र आ. संग्राम जगताप यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविले. त्यांनी सदरच्या प्रस्तावाला महासभेची मंजुरी घेऊन प्रस्ताव पुन्हा सादर करण्याबाबत दोनवेळा महापालिकेला पत्रव्यवहार केला. मात्र महापौरांनी जाणीवपूर्वक त्याची दखल घेतली नसल्याचा आरोप करीत आ. संग्राम जगताप यांनी गुरुवारचे आंदोलन निश्चित केले होते. मात्र त्यापूर्वीच बुधवारी रात्री महापौरांनी सभेची तारीख निश्चित करून रस्त्याचा विषय मंजुरीसाठी घेतला. मात्र कोणतीही लेखी माहिती प्राप्त नसल्याने पूर्व नियोजनाप्रमाणे आंदोलन केल्याचे आ. जगताप यांनी सांगत महापालिकेच्या आवारात आंदोलन केले. यावेळी त्यांनी सत्ताधाºयांवर सडकून टीका केली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या भाषणांनी परिसर दणाणला.