शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

आमदार आदर्श गाव योजना कागदावरच

By admin | Updated: May 14, 2016 23:51 IST

अण्णा नवथर, अहमदनगर मतदारसंघातील किमान एक गाव दत्त घेऊन ते आदर्श बनविण्याची घोषणा सरकारने केली़ मात्र, सरकार योजनेबाबत उदासीन असून, वर्ष उलटूनही गावांचा विकास आराखडाच तयार होऊ शकला नाही़

अण्णा नवथर, अहमदनगरमतदारसंघातील किमान एक गाव दत्त घेऊन ते आदर्श बनविण्याची घोषणा सरकारने केली़ मात्र, सरकार योजनेबाबत उदासीन असून, वर्ष उलटूनही गावांचा विकास आराखडाच तयार होऊ शकला नाही़ विशेष म्हणजे याबाबत कोणत्याही मार्गदर्शक सूचना सरकारकडून न मिळाल्याने ही योजना कागदावरच असल्याचे चित्र आहे़सांसद आदर्शग्राम योजना केंद्र सरकारने सुरू केली़ त्याच धर्तीवर राज्य सरकारने आमदार आदर्श ग्राम योजनेची घोषणा केली़ तसे आदेश सरकारने जिल्हा प्रशासनास दिले़ गावे दत्तक घेण्यास विलंब झाल्याने आमदार टिकेचे धनी ठरले़ जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघातील आमदारांनी प्रत्येकाने एक गाव दत्तक घेतले़ दत्तक घेतलेल्या गावांतील कामांचा आराखडा तयार करणे, गावांना भेटी देऊन गावाची भौगोलिक परिस्थिती जाणून घेऊन तेथे कोणती कामे प्राधान्याने करता येतील, याचे नियोजन प्रशासनाकडून होणे अपेक्षित होते़ मात्र, तसे झाले नाही़ या गावांचे आराखडे तयार करण्यासाठी एकही बैठक प्रशासनाकडून घेतल्याचे ऐकीवात नाही़ त्यामुळे सरकारी उदासीनता आणि प्रशासन थंड, असेच काही आदर्श गाव योजनेचे झाले आहे़ आमदारांनी मात्र निवडलेल्या गावांना भेटी देऊन पायासुविधा निर्माण करणार असल्याचे जाहीर करून टाकले़ एवढेच नव्हे तर, यापुढे गावात एकही समस्या गावात राहणार नाही, असा संकल्प गावकऱ्यांसमक्ष केला़ मात्र, वर्ष उलटले तरी या गावांत भरीव अशी कामे झाली नाहीत़ त्यामुळे आमदारांना गावकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे़ स्थानिक निधीतून त्यांनी काही कामे केली़ पण, निधीअभावी कामांना मर्यादा येत आहेत़ सरकारकडून गाव आदर्श होईल, अशी अपेक्षा आमदारही बाळगून आहेत़ परंतु वर्ष उलटूनही सरकारदरबारी या योजनेबाबत काहीच हालचाली होताना दिसत नाहीत़ त्यामुळे निवडलेल्या गावांत आता आमदारही फिरकेनासे झाले आहेत़ गावात जावून गावकऱ्यांना सांगायचे काय, असा पेच त्यांच्याही समोर आहे़ केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना राबवून गावे आदर्श करण्याची ही संकल्पना आहे़ आमदार काय म्हणतात...सरकारकडून केवळ आदर्श गाव योजनेची घोषणा केली गेली़ मात्र, त्यासाठी नवीन निधी मिळाला नाही़ सरकारच्या ज्या योजना आहेत, त्यात त्रुटी असल्याने त्या निवडलेल्या गावात राबविणे अशक्य आहे़ त्यामुळे गावकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे़- वैभव पिचड, आमदारकेंद्र आणि राज्याच्या योजना निवडलेल्या गावात प्रभावीपणे राबविणे, ही या मागची संकल्पना आहे़ परंतु गावांच्या विकास कामांचा आराखडा अद्याप तयार झाला नाही़ आराखडा तयार करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे़- मोनिका राजळे, आमदारआमदारांनी ५० टक्के निधी खर्च केल्यानंतर सरकार तेवढाच निधी आदर्श गावासाठी उपलब्ध करून देणार होते़ परंतु याबाबत अद्याप कुठल्याही सूचना नसून, सरकारची ही योजना फसवी आहे़ - राहुल जगताप, आमदार