शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
2
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
3
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
4
"तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
5
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
6
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
7
Operation Sindoor Live Updates: 'पाकिस्तानला मेसेज मिळालाय, आता थेट तुमच्या मुख्यालयावरच हल्ला करू'
8
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
9
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
10
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
11
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
12
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
13
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
14
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
15
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
16
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
17
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
18
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
19
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
20
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती

विभाग नियंत्रकांची माहिती दिशाभूल करणारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:15 IST

अहमदनगर : नगर एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांत आर्थिक घोटाळा व अनियमितताप्रकरणी चौकशीत जबाबदारी निश्चत केल्याने आकसापोटी नगरचे एसटीचे विभाग ...

अहमदनगर : नगर एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांत आर्थिक घोटाळा व अनियमितताप्रकरणी चौकशीत जबाबदारी निश्चत केल्याने आकसापोटी नगरचे एसटीचे विभाग नियंत्रक विजय गिते यांनी आपली तक्रार केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमोल घोलप यांनी नाशिक माहिती आयुक्तांकडे केली आहे.

घोलप यांनी तक्रारीत म्हटले आहे की, एसटीच्या नगर विभागीय कार्यालयात विभाग नियंत्रक विजय गिते यांनी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करताना अनियमितता केली. याबाबत आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. शिवाय याप्रकरणी विधानसभेत तारांकित प्रश्नही उपस्थित झाला होता. याची दखल घेत एसटीच्या वरिष्ठ सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यांनी नगरमध्ये येत गिते यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची चौकशी केली. तसेच गैरप्रकाराच्या अनुषंगाने जाबजबाब घेतले. यात चौकशी अधिकाऱ्यांनी गिते यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना जबाबदार धरले आहे, असे असतानाही गिते यांनी आपली तक्रार माहिती आयुक्तांकडे करून आपण विनाकारण माहिती मागवून त्रास देत असल्याचे म्हटले आहे. मुळात या प्रकरणात आपण केलेल्या पाठपुराव्यामुळे गिते अडचणीत आले असल्याने त्यांनी आकसापोटी ही तक्रार केली. त्यामुळे आपण तक्रारीची शहानिशा करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी घोलप यांनी केली आहे.

----------

पाचजणांविरोधात जनहित याचिका

नगरमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांत झालेल्या अनियमिततेची चौकशी करण्यासाठी एसटीच्या वरिष्ठ सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यांनी नगरमध्ये येत गिते यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची चौकशी केली. त्यात चार ते पाचजणांवर जबाबदारी निश्चित करून आपला अहवाल फेब्रवारी २०२१ मध्ये मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी यांना पाठवला आहे. परंतु तीन ते चार महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्याप काहीच कारवाई न झाल्याने अमोल घोलप यांनी नुकतीच औरंगाबाद खंडपिठात गिते यांच्यासह पाचजणांविरोधात जनहित याचिका दाखल केली आहे.

------------

आपण माहिती अधिकारात मागितलेल्या माहितीमुळे व पाठपुराव्यामुळे नगर विभागीय कार्यालयातील एसटी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांतील अनियमितता चव्हाट्यावर आली. त्याच्या आकसापोटी विभाग नियंत्रकांनी आपण वारंवार माहिती विचारून त्रास देतो, अशी तक्रार माहिती आयुक्तांकडे केली. परंतु त्यात तथ्य नाही. एखाद्या माहितीबद्दल समाधान झाले नाही तर पुन्हा माहिती मागवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे.

- अमोल घोलप, सामाजिक कार्यकर्ते