शहरं
Join us  
Trending Stories
1
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
2
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
3
मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
4
कॅनडात दोन आठवड्यात दोन भारतीयांची हत्या; कोण होते शिवांक अवस्थी आणि हिमांशी खुराणा?
5
Vijay Hazare Trophy: किंग कोहलीचं शतक हुकलं! पण 'फिफ्टी प्लस'च्या 'सिक्सर'सह पुन्हा दाखवला क्लास
6
BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार...
7
AI मुळे नोकरी गेली, खर्च भागवण्यासाठी कपल बनलं 'बंटी-बबली'; १५ लाखांच्या चोरीची पोलखोल
8
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
9
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
10
"माणूसकीचा विसर पडण्याच्या आत...", बांगलादेशमध्ये हिंदू युवकाची हत्या, जान्हवी कपूर संतापली
11
गणपती बाप्पा मोरया… २०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार? ‘या’ अंगारकी चतुर्थी खास!
12
करोडपती होण्याचे स्वप्न आता आवाक्यात! दरमहा इतक्या रुपयांची SIP; पाहा चक्रवाढ व्याजाची कमाल
13
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
14
कॅनडात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या, शिवांकला विद्यापीठ परिसरातच घातल्या गोळ्या
15
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
16
किडनी विक्रीतून रामकृष्णने घेतली २० एकर जमीन; फेसबुक ग्रुपद्वारे विणले अवयव तस्करीसाठी एजंटांचे जाळे
17
नव्या वर्षापासून UPI साठी लागू होणार नवा नियम; ई-कॉमर्स कंपन्यांच्या चलाखीवर बसणार चाबूक, प्रकरण काय?
18
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट
19
भारतातील युपीआय व्यवहारांत मोठी प्रादेशिक दरी; महाराष्ट्र अग्रस्थानी तर बिहार पिछाडीवर, कारण काय?
20
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कृषी राज्यमंत्र्यांमुळे कुकडीच्या कालव्यावर बसविले गेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:18 IST

कर्जत : कृषी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यामुळे कुकडीच्या मुख्य कालव्यावर गेट बसविण्यात आले. त्यामुळे कर्जत तालुक्यातील आंबिजळगाव व ...

कर्जत : कृषी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यामुळे कुकडीच्या मुख्य कालव्यावर गेट बसविण्यात आले. त्यामुळे कर्जत तालुक्यातील आंबिजळगाव व खातगाव या दोन गावांचा शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. याबद्दल कर्जत तालुका प्रहार संघटनेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.

आंबिजळगाव व खातगाव या दोन्ही गावांना कानवळा नदीतून वाहणाऱ्या पाण्याचा फायदा होतो. आंबिजळगावजवळून कुकडीचा मुख्य कालवा गेला आहे. परंतु, आळसुंदे येथून उगम पावत असलेल्या कानवळा नदीवर कुकडीचे पाणी सोडण्यासाठी गेट बसवावे, अशी आंबिजळगाव व खातगाव येथील शेतकऱ्यांची मागणी होती. हा प्रश्न प्रहार संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्षा विमल बिभीषण अनारसे, प्रहारचे कर्जत तालुकाध्यक्ष सुदाम निकत, सागर निकत यांनी कृषी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे मांडला. या प्रश्नात मंत्री बच्चू कडू यांनी लक्ष घालून मंजुरी मिळवून दिली. तीन लाख रुपये खर्च करून हे गेट कुकडी विभागाने एक वर्षापूर्वी बसविले. या गेटमधून कुकडीचे पाणी सुटले. ते जलयुक्त शिवार योजनेतून झालेल्या कामात मोठ्या प्रमाणावर साठले. यामुळे या भागातील पाण्याची पातळी वाढली म्हणून शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला.

गुरुवारी मंत्री बच्चू कडू हे आंबिजळगाव येथे आले होते. यावेळी प्रहार संघटनेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. यावेळी सुदाम निकत, सागर निकत, किशोर निकत, डॉ. राजेंद्र निकत आदी उपस्थित होते.

(फोटो ०७ बच्चू कडू)

आंबिजळगाव येथे मंत्री बच्चू कडू यांचे प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.