शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

मंत्रीही माझे फोन टाळतात

By admin | Updated: August 3, 2014 01:09 IST

अहमदनगर : मी आयुष्यातले ५३ वर्षे राजकारणात घातले. सर्व पदे उपभोगले. आता कुठलीच राजकीय अपेक्षा राहिली नाही.

अहमदनगर : मी आयुष्यातले ५३ वर्षे राजकारणात घातले. सर्व पदे उपभोगले. आता कुठलीच राजकीय अपेक्षा राहिली नाही. पण नगर तालुक्यात इतकी भयावह दुष्काळजन्य स्थिती असताना त्यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यातील तिनही मंत्र्यांना रोज फोन करतो, पण ते साधा माझा फोनही घेत नाहीत. आता जाऊन त्यांचे पाय धरणार असे उद्विग्न व भावनाविवश प्रतिक्रिया चार वेळा आमदार व दोनदा खासदार राहिलेल्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दादा पाटील शेळके यांनी दिली.अमृत महोत्सवी वर्षाच्या उंबरठ्यावर आलेल्या शेळके यांनी नगर तालुक्यातील निवडक पत्रकारांशी वार्तालाप केला. ते म्हणाले, गेल्या चार वर्षांपासून नगर तालुक्यात सातत्याने दुष्काळ पडतो. अकोले तालुका सोडला तर जिल्ह्यात सर्वत्र अशीच दुष्काळजन्य परिस्थिती आहे. तालुक्यातील सर्व पाझर तलाव, नाला बंडींग कोरडे आहेत. पाण्याचे उद्भव ही कोरडेठाक पडलेत. जनावरांना खायला आता चारा राहिला नाही. हे जिल्ह्यातील तिनही मंत्र्यांना दिसत नाही का? असा सवाल करून ते म्हणाले की, शेतकरी मेल्यावर हे त्यांच्याकडे लक्ष देणार आहेत का? बाबुर्डी घुमटच्या ग्रामस्थांनी पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी जागा दिली. त्याचा प्रस्ताव सहा महिन्यांपासून धूळखात पडून आहे. जिल्ह्यातील मंत्र्यांना फोन केला तर साधा माझा फोनही घेत नाहीत. ५३ वर्षे राजकारणात घालून हे माझ्या वाट्याला येत असेल तर सर्वसामान्यांची स्थिती कशी असेल? जनावरांच्या छावण्या, चारा डेपो तातडीने सुरू करण्यासाठी मी आता मुंबईत जाऊन मंत्र्यांचे पाय धरणार आहे. यावेळी शेळके यांचे संपतराव म्हस्के, बाळासाहेब हराळ, किसनराव लोटके, ज्ञानदेव दळवी, मामा भालसिंग, मथुजी आंधळे, सुधीर भद्रे, भगवान बेरड, बाबासाहेब गुंजाळ उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘गरज सरो वैद्य मरो’नगर तालुक्याच्या एकीची हाक आता फक्त निवडणुकांसाठी दिली जात आहे. मात्र ‘त्यांच्या’ सोयीचे असले की एकी, काम झाले तर बेकी, अशी गरजेपुरती नगर तालुक्याची एकी मान्य नसल्याचे शेळके यांनी स्पष्ट केले.