शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रीही माझे फोन टाळतात

By admin | Updated: August 3, 2014 01:09 IST

अहमदनगर : मी आयुष्यातले ५३ वर्षे राजकारणात घातले. सर्व पदे उपभोगले. आता कुठलीच राजकीय अपेक्षा राहिली नाही.

अहमदनगर : मी आयुष्यातले ५३ वर्षे राजकारणात घातले. सर्व पदे उपभोगले. आता कुठलीच राजकीय अपेक्षा राहिली नाही. पण नगर तालुक्यात इतकी भयावह दुष्काळजन्य स्थिती असताना त्यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यातील तिनही मंत्र्यांना रोज फोन करतो, पण ते साधा माझा फोनही घेत नाहीत. आता जाऊन त्यांचे पाय धरणार असे उद्विग्न व भावनाविवश प्रतिक्रिया चार वेळा आमदार व दोनदा खासदार राहिलेल्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दादा पाटील शेळके यांनी दिली.अमृत महोत्सवी वर्षाच्या उंबरठ्यावर आलेल्या शेळके यांनी नगर तालुक्यातील निवडक पत्रकारांशी वार्तालाप केला. ते म्हणाले, गेल्या चार वर्षांपासून नगर तालुक्यात सातत्याने दुष्काळ पडतो. अकोले तालुका सोडला तर जिल्ह्यात सर्वत्र अशीच दुष्काळजन्य परिस्थिती आहे. तालुक्यातील सर्व पाझर तलाव, नाला बंडींग कोरडे आहेत. पाण्याचे उद्भव ही कोरडेठाक पडलेत. जनावरांना खायला आता चारा राहिला नाही. हे जिल्ह्यातील तिनही मंत्र्यांना दिसत नाही का? असा सवाल करून ते म्हणाले की, शेतकरी मेल्यावर हे त्यांच्याकडे लक्ष देणार आहेत का? बाबुर्डी घुमटच्या ग्रामस्थांनी पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी जागा दिली. त्याचा प्रस्ताव सहा महिन्यांपासून धूळखात पडून आहे. जिल्ह्यातील मंत्र्यांना फोन केला तर साधा माझा फोनही घेत नाहीत. ५३ वर्षे राजकारणात घालून हे माझ्या वाट्याला येत असेल तर सर्वसामान्यांची स्थिती कशी असेल? जनावरांच्या छावण्या, चारा डेपो तातडीने सुरू करण्यासाठी मी आता मुंबईत जाऊन मंत्र्यांचे पाय धरणार आहे. यावेळी शेळके यांचे संपतराव म्हस्के, बाळासाहेब हराळ, किसनराव लोटके, ज्ञानदेव दळवी, मामा भालसिंग, मथुजी आंधळे, सुधीर भद्रे, भगवान बेरड, बाबासाहेब गुंजाळ उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘गरज सरो वैद्य मरो’नगर तालुक्याच्या एकीची हाक आता फक्त निवडणुकांसाठी दिली जात आहे. मात्र ‘त्यांच्या’ सोयीचे असले की एकी, काम झाले तर बेकी, अशी गरजेपुरती नगर तालुक्याची एकी मान्य नसल्याचे शेळके यांनी स्पष्ट केले.