शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वर्षानुवर्षांच्या अनेकांच्या मनसबदाऱ्या धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:52 IST

अहमदनगर : गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून गावातील सत्ता आपल्या ताब्यात ठेवणाऱ्या नगर तालुक्यातील अनेक प्रस्थापितांच्या समोर प्रथमच कडवे ...

अहमदनगर : गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून गावातील सत्ता आपल्या ताब्यात ठेवणाऱ्या नगर तालुक्यातील अनेक प्रस्थापितांच्या समोर प्रथमच कडवे आव्हान उभे राहिले आहे. आपली सत्ता शाबूत ठेवण्यासाठी त्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. वर्षानुवर्षांची गावातील त्यांची मनसबदारी प्रथमच धोक्यात आली आहे.

नगर तालुक्यातील बुर्हाणनगर येथे माजी राज्यमंत्री शिवाजी कर्डिले यांची गेल्या ३० वर्षांपासून एकहाती सत्ता आहे. मात्र, प्रथमच त्यांच्या सत्तेला गावात मोठे आव्हान उभे राहिले आहे. विशेष म्हणजे, त्यांचे पुतणे रोहिदास कर्डिले यांनीच त्यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. हिवरेबाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांच्या समोरही गेल्या ३० वर्षांपासूनच्या सत्तेला आव्हान मिळाले आहे. पवार यांच्या अधिपत्याखालीच आतापर्यंत या गावात बिनविरोधची परंपरा होती. आता गावातील काहींनी त्यांचे वर्चस्व झुगारत आघाडी तयार केली आहे.

माजी खासदार व दिवंगत ज्येष्ठ नेते दादा पाटील शेळके यांच्या खारेकर्जुने गावात आता जि.प.चे उपाध्यक्ष प्रताप शेळके व युवा नेते अंकुश शेळके हे राजकीय वारसा चालवीत आहेत. गेल्या ६५ वर्षांपासून या गावात शेळके यांच्या ताब्यात सत्ता आहे. त्याला मागील वर्षी ब्रेक मिळाला. यावर्षीही या गावात शेळके यांना सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. टाकळी काझी येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बन्सीभाऊ म्हस्के व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के यांच्या ताब्यात गेल्या ४५ वर्षांपासून गावाची एकहाती सत्ता आहे. आता त्यांच्या गावात शिवसनेने कडवे आव्हान उभे केले आहे. या ठिकाणी म्हस्के परिवाराची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गुंडेगाव येथे माजी सभापती बाळासाहेब हराळ यांच्या ताब्यात गेल्या २० वर्षांपासून गावाची सत्ता आहे. गावाची सत्ता पुन्हा आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी त्यानाही मोठा संघर्ष करावा लागत आहे.

निंबळक येथे गेल्या १५ वर्षांपासून लामखडे गटाकडे सत्तेच्या चाव्या आहेत. त्यापूर्वी या गावाची सत्ता कोतकर गटाच्या ताब्यात होती. या वर्षीही लामखडे आणि कोतकर गटात मोठी चुरस होत आहे. माजी सभापती रामदास भोर यांचे भोरवाडी गावात गेल्या २० वर्षांपसून वर्चस्व आहे. या निवडणुकीत त्यांच्याही विरोधात मोठे आव्हान उभे राहिले आहे. जेऊर गावाची सत्ता गेल्या १५ वर्षांपासून कर्डिले गटाच्या ताब्यात आहे. ही सत्ता अबाधित राहावी, यासाठी कर्डिले यांनी जोर लावला आहे. मात्र, तेथे महाविकास आघाडीने मोठी चुरस तयार केली आहे.