शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

वर्षानुवर्षांच्या अनेकांच्या मनसबदाऱ्या धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:52 IST

अहमदनगर : गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून गावातील सत्ता आपल्या ताब्यात ठेवणाऱ्या नगर तालुक्यातील अनेक प्रस्थापितांच्या समोर प्रथमच कडवे ...

अहमदनगर : गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून गावातील सत्ता आपल्या ताब्यात ठेवणाऱ्या नगर तालुक्यातील अनेक प्रस्थापितांच्या समोर प्रथमच कडवे आव्हान उभे राहिले आहे. आपली सत्ता शाबूत ठेवण्यासाठी त्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. वर्षानुवर्षांची गावातील त्यांची मनसबदारी प्रथमच धोक्यात आली आहे.

नगर तालुक्यातील बुर्हाणनगर येथे माजी राज्यमंत्री शिवाजी कर्डिले यांची गेल्या ३० वर्षांपासून एकहाती सत्ता आहे. मात्र, प्रथमच त्यांच्या सत्तेला गावात मोठे आव्हान उभे राहिले आहे. विशेष म्हणजे, त्यांचे पुतणे रोहिदास कर्डिले यांनीच त्यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. हिवरेबाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांच्या समोरही गेल्या ३० वर्षांपासूनच्या सत्तेला आव्हान मिळाले आहे. पवार यांच्या अधिपत्याखालीच आतापर्यंत या गावात बिनविरोधची परंपरा होती. आता गावातील काहींनी त्यांचे वर्चस्व झुगारत आघाडी तयार केली आहे.

माजी खासदार व दिवंगत ज्येष्ठ नेते दादा पाटील शेळके यांच्या खारेकर्जुने गावात आता जि.प.चे उपाध्यक्ष प्रताप शेळके व युवा नेते अंकुश शेळके हे राजकीय वारसा चालवीत आहेत. गेल्या ६५ वर्षांपासून या गावात शेळके यांच्या ताब्यात सत्ता आहे. त्याला मागील वर्षी ब्रेक मिळाला. यावर्षीही या गावात शेळके यांना सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. टाकळी काझी येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बन्सीभाऊ म्हस्के व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के यांच्या ताब्यात गेल्या ४५ वर्षांपासून गावाची एकहाती सत्ता आहे. आता त्यांच्या गावात शिवसनेने कडवे आव्हान उभे केले आहे. या ठिकाणी म्हस्के परिवाराची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गुंडेगाव येथे माजी सभापती बाळासाहेब हराळ यांच्या ताब्यात गेल्या २० वर्षांपासून गावाची सत्ता आहे. गावाची सत्ता पुन्हा आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी त्यानाही मोठा संघर्ष करावा लागत आहे.

निंबळक येथे गेल्या १५ वर्षांपासून लामखडे गटाकडे सत्तेच्या चाव्या आहेत. त्यापूर्वी या गावाची सत्ता कोतकर गटाच्या ताब्यात होती. या वर्षीही लामखडे आणि कोतकर गटात मोठी चुरस होत आहे. माजी सभापती रामदास भोर यांचे भोरवाडी गावात गेल्या २० वर्षांपसून वर्चस्व आहे. या निवडणुकीत त्यांच्याही विरोधात मोठे आव्हान उभे राहिले आहे. जेऊर गावाची सत्ता गेल्या १५ वर्षांपासून कर्डिले गटाच्या ताब्यात आहे. ही सत्ता अबाधित राहावी, यासाठी कर्डिले यांनी जोर लावला आहे. मात्र, तेथे महाविकास आघाडीने मोठी चुरस तयार केली आहे.