शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

वर्षानुवर्षांच्या अनेकांच्या मनसबदाऱ्या धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:52 IST

अहमदनगर : गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून गावातील सत्ता आपल्या ताब्यात ठेवणाऱ्या नगर तालुक्यातील अनेक प्रस्थापितांच्या समोर प्रथमच कडवे ...

अहमदनगर : गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून गावातील सत्ता आपल्या ताब्यात ठेवणाऱ्या नगर तालुक्यातील अनेक प्रस्थापितांच्या समोर प्रथमच कडवे आव्हान उभे राहिले आहे. आपली सत्ता शाबूत ठेवण्यासाठी त्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. वर्षानुवर्षांची गावातील त्यांची मनसबदारी प्रथमच धोक्यात आली आहे.

नगर तालुक्यातील बुर्हाणनगर येथे माजी राज्यमंत्री शिवाजी कर्डिले यांची गेल्या ३० वर्षांपासून एकहाती सत्ता आहे. मात्र, प्रथमच त्यांच्या सत्तेला गावात मोठे आव्हान उभे राहिले आहे. विशेष म्हणजे, त्यांचे पुतणे रोहिदास कर्डिले यांनीच त्यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. हिवरेबाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांच्या समोरही गेल्या ३० वर्षांपासूनच्या सत्तेला आव्हान मिळाले आहे. पवार यांच्या अधिपत्याखालीच आतापर्यंत या गावात बिनविरोधची परंपरा होती. आता गावातील काहींनी त्यांचे वर्चस्व झुगारत आघाडी तयार केली आहे.

माजी खासदार व दिवंगत ज्येष्ठ नेते दादा पाटील शेळके यांच्या खारेकर्जुने गावात आता जि.प.चे उपाध्यक्ष प्रताप शेळके व युवा नेते अंकुश शेळके हे राजकीय वारसा चालवीत आहेत. गेल्या ६५ वर्षांपासून या गावात शेळके यांच्या ताब्यात सत्ता आहे. त्याला मागील वर्षी ब्रेक मिळाला. यावर्षीही या गावात शेळके यांना सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. टाकळी काझी येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बन्सीभाऊ म्हस्के व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के यांच्या ताब्यात गेल्या ४५ वर्षांपासून गावाची एकहाती सत्ता आहे. आता त्यांच्या गावात शिवसनेने कडवे आव्हान उभे केले आहे. या ठिकाणी म्हस्के परिवाराची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गुंडेगाव येथे माजी सभापती बाळासाहेब हराळ यांच्या ताब्यात गेल्या २० वर्षांपासून गावाची सत्ता आहे. गावाची सत्ता पुन्हा आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी त्यानाही मोठा संघर्ष करावा लागत आहे.

निंबळक येथे गेल्या १५ वर्षांपासून लामखडे गटाकडे सत्तेच्या चाव्या आहेत. त्यापूर्वी या गावाची सत्ता कोतकर गटाच्या ताब्यात होती. या वर्षीही लामखडे आणि कोतकर गटात मोठी चुरस होत आहे. माजी सभापती रामदास भोर यांचे भोरवाडी गावात गेल्या २० वर्षांपसून वर्चस्व आहे. या निवडणुकीत त्यांच्याही विरोधात मोठे आव्हान उभे राहिले आहे. जेऊर गावाची सत्ता गेल्या १५ वर्षांपासून कर्डिले गटाच्या ताब्यात आहे. ही सत्ता अबाधित राहावी, यासाठी कर्डिले यांनी जोर लावला आहे. मात्र, तेथे महाविकास आघाडीने मोठी चुरस तयार केली आहे.