शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
4
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
5
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
6
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
7
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
8
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
9
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
10
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
11
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
12
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
13
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
14
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
15
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
16
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
17
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
18
घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’
19
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
20
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?

राज्यात १0 मोठय़ा शहरांमध्ये होणार ‘महानगर ब्लड बँक’

By admin | Updated: June 14, 2014 23:37 IST

नाशिक, अहमदनगर, जळगाव, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, परभणी, पुणे, सातारा, ठाणे या मोठय़ा शहरांचा समावेश आहे.

अकोला : रक्तदान म्हणजे सर्व श्रेष्ठ दान! रक्तदान केल्याने कित्येक जणांचा जीव वाचविला जाऊ शकतो. या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला तेव्हा येतो जेव्हा कुणी आपली व्यक्ती रक्ताअभावी जीवन आणि मृत्यूच्या दारात संघर्ष करीत असते. खडबडून झोपेतून जागे होऊन आपण त्या व्यक्तीचा जीव वाचविण्यासाठी रक्त मिळविण्यासाठी प्रयत्न करू लागतो. दुर्घटनेमुळे किंवा आजारपणाने आपल्यापैकी कुणीही या परिस्थितीचा बळी ठरू शकतो. याच कारणास्तव मुंबईच्या धर्तीवर राज्यातील १0 मोठय़ा शहरांमध्ये ह्यमहानगर ब्लड बँकह्ण तयार करण्यात येत आहे. याचा लाभ त्या शहरांजवळील लहान गावांनादेखील घेता येणार आहे. राज्यात शासकीय स्वास्थ्य विभागाव्यतिरिक्त इतर सेवाभावी संस्थादेखील रक्त संकलनाचे काम करतात. यामुळेच कदाचित रक्त संकलन करण्यात देशात महाराष्ट्राचा पहिल्या क्रमांक लागतो. वर्ष १९९७ मध्ये २.५ लाख रक्त शिबिरांच्या माध्यमातून राज्यात ३ लाख ६0 हजार युनिट रक्त साठा संकलित करण्यात आला होता. याचप्रकारे प्रशासन व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून राज्यात २0१३ मध्ये १४ लाख ७५ हजार युनिट रक्त संकलित करण्यात आले होते. यातील २२ हजार युनिट रक्तसाठा शिबिरांच्या माध्यमातून संकलित करण्यात आला होता. प्रशासनाच्या व स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या प्रयत्नामुळेच महाराष्ट्राचे नाव आणखी उंच शिखरावर पोहोचल्याचे यावरून सिद्ध होते. राज्यातील रक्ताची आवश्यकता लक्षात घेऊन मुंबईत ह्यमहानगर ब्लड बँकह्ण निर्माण करण्यात आली आहे. या महाबँकेतून वर्ष २0१४ मध्ये १ लाख युनिट रक्ताचे वितरण करण्यात आले आहे. राज्यातील इतर शहरांची रक्ताची आवश्यकता लक्षात घेऊन राज्य रक्त संकलन परिषद मुंबईच्या वतीने लवकरच १0 मोठय़ा शहरांमध्ये महानगर ब्लड बँक निर्माण करण्यात येणार आहे. यात नाशिक, अहमदनगर, जळगाव, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, परभणी, पुणे, सातारा, ठाणे या मोठय़ा शहरांचा समावेश आहे. राज्यात सध्या ३00 ब्लड बँकांच्या माध्यमातून रक्त संकलन केले जाते. त्यासाठी २२0 रक्त घटक केंद्र कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील रक्ताची गरज पूर्ण करण्यासाठी राज्यात १५0 ठिकाणी स्टोअरेज सेंटर्स कार्यरत आहेत. ह्यब्लड ऑन कॉलह्ण ही संकल्पना साकार करण्यासाठी प्रारंभ करण्यात आलेल्या ह्यजीवन अमृत सेवाह्णसाठी १0४ क्रमांक डायल करून रक्त प्राप्त करता येते. ७ जानेवारीपासून प्रारंभ करण्यात आलेल्या या सेवेचा आजतागायत ७ हजार नागरिकांनी लाभ घेतला आहे. यात ५ हजार लोकांना रक्त वितरित करण्यात आले, तर २ हजार लोकांनी रक्त आरक्षित करून ठेवले आहे. रक्त संकलन अधिकारी व अन्य अधिकार्‍यांना प्रशिक्षण देण्यासाठी देशातील पहिले प्रशिक्षण केंद्र मुंबईतील खारघरमध्ये सुरू करण्याची योजनादेखील रक्त संकलन परिषद मुंबईने आखली आहे.

** रक्तदान करण्यात महिला पिछाडीवर

आज प्रत्येक क्षेत्रात पुढे असलेला महिला वर्ग रक्तदान करण्यात पुरुषांपेक्षा पिछाडीवर आहे. इच्छा असूनदेखील त्या रक्तदान करू शकत नाहीत. रक्तदान करणार्‍या महिलांची आकडेवारी नाहीच्या बरोबरच आहे. असे नाही की, स्त्रीवर्ग रक्तदानाप्रती जागरूक नाहीत; पण प्रकृती स्वास्थ्याच्या तक्रारींमुळे इच्छा असूनदेखील त्यांना रक्तदान करता येत नसल्याची वास्तविक स्थिती आहे. अशक्त प्रकृतीमुळे महिलांच्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण १२ ग्रॅमपेक्षाही कमी राहते. परिणामी वजनदेखील कमी भरते. एक कारण असेही आहे की, सडपातळ बांधा ठेवण्यासठी डायटिंग करण्यामुळेदेखील अनेक महिला सकस आहारापासून वंचित राहतात. परिणामी रक्तदान करण्यासाठी आलेल्या अशा महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण व वजन कमी अढळते. रक्तदान करण्यासाठी स्त्रीचे वजन ४५ किलो, तर वय १८ ते ६0 च्या दरम्यात असणे गरजेचे आहे.