शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

राज्यात १0 मोठय़ा शहरांमध्ये होणार ‘महानगर ब्लड बँक’

By admin | Updated: June 14, 2014 23:37 IST

नाशिक, अहमदनगर, जळगाव, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, परभणी, पुणे, सातारा, ठाणे या मोठय़ा शहरांचा समावेश आहे.

अकोला : रक्तदान म्हणजे सर्व श्रेष्ठ दान! रक्तदान केल्याने कित्येक जणांचा जीव वाचविला जाऊ शकतो. या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला तेव्हा येतो जेव्हा कुणी आपली व्यक्ती रक्ताअभावी जीवन आणि मृत्यूच्या दारात संघर्ष करीत असते. खडबडून झोपेतून जागे होऊन आपण त्या व्यक्तीचा जीव वाचविण्यासाठी रक्त मिळविण्यासाठी प्रयत्न करू लागतो. दुर्घटनेमुळे किंवा आजारपणाने आपल्यापैकी कुणीही या परिस्थितीचा बळी ठरू शकतो. याच कारणास्तव मुंबईच्या धर्तीवर राज्यातील १0 मोठय़ा शहरांमध्ये ह्यमहानगर ब्लड बँकह्ण तयार करण्यात येत आहे. याचा लाभ त्या शहरांजवळील लहान गावांनादेखील घेता येणार आहे. राज्यात शासकीय स्वास्थ्य विभागाव्यतिरिक्त इतर सेवाभावी संस्थादेखील रक्त संकलनाचे काम करतात. यामुळेच कदाचित रक्त संकलन करण्यात देशात महाराष्ट्राचा पहिल्या क्रमांक लागतो. वर्ष १९९७ मध्ये २.५ लाख रक्त शिबिरांच्या माध्यमातून राज्यात ३ लाख ६0 हजार युनिट रक्त साठा संकलित करण्यात आला होता. याचप्रकारे प्रशासन व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून राज्यात २0१३ मध्ये १४ लाख ७५ हजार युनिट रक्त संकलित करण्यात आले होते. यातील २२ हजार युनिट रक्तसाठा शिबिरांच्या माध्यमातून संकलित करण्यात आला होता. प्रशासनाच्या व स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या प्रयत्नामुळेच महाराष्ट्राचे नाव आणखी उंच शिखरावर पोहोचल्याचे यावरून सिद्ध होते. राज्यातील रक्ताची आवश्यकता लक्षात घेऊन मुंबईत ह्यमहानगर ब्लड बँकह्ण निर्माण करण्यात आली आहे. या महाबँकेतून वर्ष २0१४ मध्ये १ लाख युनिट रक्ताचे वितरण करण्यात आले आहे. राज्यातील इतर शहरांची रक्ताची आवश्यकता लक्षात घेऊन राज्य रक्त संकलन परिषद मुंबईच्या वतीने लवकरच १0 मोठय़ा शहरांमध्ये महानगर ब्लड बँक निर्माण करण्यात येणार आहे. यात नाशिक, अहमदनगर, जळगाव, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, परभणी, पुणे, सातारा, ठाणे या मोठय़ा शहरांचा समावेश आहे. राज्यात सध्या ३00 ब्लड बँकांच्या माध्यमातून रक्त संकलन केले जाते. त्यासाठी २२0 रक्त घटक केंद्र कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील रक्ताची गरज पूर्ण करण्यासाठी राज्यात १५0 ठिकाणी स्टोअरेज सेंटर्स कार्यरत आहेत. ह्यब्लड ऑन कॉलह्ण ही संकल्पना साकार करण्यासाठी प्रारंभ करण्यात आलेल्या ह्यजीवन अमृत सेवाह्णसाठी १0४ क्रमांक डायल करून रक्त प्राप्त करता येते. ७ जानेवारीपासून प्रारंभ करण्यात आलेल्या या सेवेचा आजतागायत ७ हजार नागरिकांनी लाभ घेतला आहे. यात ५ हजार लोकांना रक्त वितरित करण्यात आले, तर २ हजार लोकांनी रक्त आरक्षित करून ठेवले आहे. रक्त संकलन अधिकारी व अन्य अधिकार्‍यांना प्रशिक्षण देण्यासाठी देशातील पहिले प्रशिक्षण केंद्र मुंबईतील खारघरमध्ये सुरू करण्याची योजनादेखील रक्त संकलन परिषद मुंबईने आखली आहे.

** रक्तदान करण्यात महिला पिछाडीवर

आज प्रत्येक क्षेत्रात पुढे असलेला महिला वर्ग रक्तदान करण्यात पुरुषांपेक्षा पिछाडीवर आहे. इच्छा असूनदेखील त्या रक्तदान करू शकत नाहीत. रक्तदान करणार्‍या महिलांची आकडेवारी नाहीच्या बरोबरच आहे. असे नाही की, स्त्रीवर्ग रक्तदानाप्रती जागरूक नाहीत; पण प्रकृती स्वास्थ्याच्या तक्रारींमुळे इच्छा असूनदेखील त्यांना रक्तदान करता येत नसल्याची वास्तविक स्थिती आहे. अशक्त प्रकृतीमुळे महिलांच्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण १२ ग्रॅमपेक्षाही कमी राहते. परिणामी वजनदेखील कमी भरते. एक कारण असेही आहे की, सडपातळ बांधा ठेवण्यासठी डायटिंग करण्यामुळेदेखील अनेक महिला सकस आहारापासून वंचित राहतात. परिणामी रक्तदान करण्यासाठी आलेल्या अशा महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण व वजन कमी अढळते. रक्तदान करण्यासाठी स्त्रीचे वजन ४५ किलो, तर वय १८ ते ६0 च्या दरम्यात असणे गरजेचे आहे.