शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
2
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
3
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
4
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
5
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
6
ना रस्ता... ना बस, मोबाइलला तर रेंजही नाही; अखेर गावकऱ्यांनी बीडमधील वाडीच काढली विक्रीला!
7
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा
8
डोकं फिरलंया! फायटर जेट पाडून भारताने लावली पाकची वाट, तरी इशाक दार यांनी थोपटली त्यांच्या वायुदलाची पाठ
9
परेश रावल यांची 'हेरा फेरी ३' मधून एक्झिट! समोर आलं कारण; चाहत्यांची घोर निराशा
10
टीम कुक यांनी ट्रम्प यांचा सल्ला का धुडकावला? अ‍ॅपल अमेरिकेला स्थलांतरीत केल्यास काय होईल?
11
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
12
पाकला पाठिंबा देणं तुर्कस्तान आणि अझरबैजानच्या अंगलट! भारताने थेट वर्मावरच घातला घाव
13
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
14
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
15
नाशिक महापालिका निवडणूक: महायुतीत शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत, श्रीकांत शिंदे करणार दौरा
16
Gold Rates 16 May : काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
18
आमिरची विमानतळावर वाट बघत होती गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट, कारमध्ये येताच दोघांनी एकमेकांना...
19
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
20
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

नगरचा पारा ४१ अंशावर

By admin | Updated: April 15, 2016 23:20 IST

अहमदनगर : सातत्याने पडणारा दुष्काळ, खालावलेली भूजल पातळी, तहानलेली आणि भेगाळलेली जमीन, यामुळे यंदा एप्रिल महिन्यात सूर्य आग ओकायला लागला आहे.

अंगाची काहिली : थंड पेयांना मागणीअहमदनगर : सातत्याने पडणारा दुष्काळ, खालावलेली भूजल पातळी, तहानलेली आणि भेगाळलेली जमीन, यामुळे यंदा एप्रिल महिन्यात सूर्य आग ओकायला लागला आहे. परिणामी संपूर्ण नगर जिल्हा तापला असून, पारा ४१ अंशांवर पोहोचला आहे. मार्च महिन्यात ३५ अंशांपर्यंत राहिलेले तापमान एप्रिल महिन्यात चांगलेच वाढले असून, तीव्र उष्णतेने सर्वांनाच हैराण केले आहे़ उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिक शक्यतो सकाळीच कामे आटोपून घेत आहेत किंवा दुपारच्या उन्हाचा तडाखा टाळण्यासाठी सायंकाळी घराबाहेर पडत आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ३५ अंश सेल्सियस एवढे तापमान होते़ दुसऱ्या आठवड्यात पारा थेट ४१ अंशांपर्यंत जावून पोहोचला़ वाढत्या तापमानामुळे पाणी पातळी कमालीची घटली असून, नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू आहे़ शेतात सध्या कांदा पिकाची काढणी सुरू आहे़ उष्णतेच्या तीव्रतेमुळे काढलेला कांदा खराब होत असून, शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे़ वाढत्या उष्णतेमुळे शहरात दुपारी रस्त्यावरची वाहतूक रोडावली आहे़ उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिक दुपारी घरीच राहणे पसंत करत आहेत़ तर थंडपेयांच्या दुकानात नागरिकांची गर्दी वाढत आहे़ एप्रिलमध्ये ४१ अंशांवर पोहोचलेले तापमान मे महिन्यात आणखी वाढण्याची शक्यता असल्याने पाणी टंचाईचा प्रश्न आणखी बिकट होणार आहे़ (प्रतिनिधी)जिल्ह्यात उष्णतेची लाटएप्रिल महिन्यातील १५ दिवसांचा कालावधी लोटला असून, अजून १५ दिवस बाकी आहेत. चालू आठवड्यात जिल्ह्यातील ९ लाखांहून अधिक जनतेला सरकारी पाण्याच्या टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. उष्णतेची लाट अशीच कायम राहिल्यास हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.