शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
3
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
4
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
5
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
6
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
7
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
8
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
9
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
10
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल
11
Ashadhi Ekadashi Vrat 2025: आषाढी एकादशीला 'अशी' करा विधिवत पूजा; जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त!
12
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
13
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
14
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
15
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
16
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
17
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
18
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
19
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
20
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर

 दिवसागणिक वाढताहेत मानसिक रुग्ण; कंपन्याही नाकारतात विमा संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 16:23 IST

साहेबराव नरसाळे /  अहमदनगर : मानसिक रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, जिल्हा रुग्णालयात रोज सुमारे ६० ते ७० रुग्ण ...

साहेबराव नरसाळे / अहमदनगर : मानसिक रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, जिल्हा रुग्णालयात रोज सुमारे ६० ते ७० रुग्ण उपचारासाठी येतात. तर खासगी दवाखान्यांमध्ये हा आकडा शेकड्यात असल्याचे सांगण्यात येते. मानसिक आजारांवरील महागड्या उपचारांवर लाखो रुपये खर्च होत आहेत. मात्र, आरोग्य विमा कंपन्यांनी मानसिक आजाराला विमा संरक्षण नाकारले आहे.मानसिक आजारांचे रुग्ण वाढत आहेत. मानसिक आजारांवरील उपचारपद्धती ही दीर्घ काळाची असते. त्यामुळे त्यावरील खर्चही सामान्य कुटुंबांच्या आवाक्याबाहेर जातात. मानसिक आजारांमध्ये नैराश्य व चिंतारोग हे प्रामुख्याने आढळून येतात.  कॅन्सर, मधुमेह, रक्तदाब असे आजार असलेल्या रुग्णांमध्ये नैराश्याचे प्रमाण अधिक आढळून येते. स्किझोफ्रेनिया, बायपोलर, ओसीडी या विकारांनी ग्रस्त रुग्णांची संख्याही वाढत आहे. स्किझोफ्रेनिया रुग्णांमध्ये संशयी वृत्ती वाढीस लागते. बाळंतीण महिलांच्या मनात सातत्याने भीती दाटून येते. यामुळे काही प्रसंगात असे रुग्ण अगदी टोकाची पावले उचलतात. एखाद्यावर हल्ला करणे, जीव घेणे असे प्रकार घडतात. तर काही रुग्ण घराबाहेर पडायला घाबरतात. यातून मानसिक प्रकृती अधिक ढासळते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. बायपोलर या आजारात रुग्ण काही आठवडे किंवा महिने नैराश्यात तर काही आठवडे किंवा महिने संबंधित रुग्ण हर्षवायू झाल्यासारखा वावरतो. त्याच्या मनात अचाट कल्पना येत राहतात आणि काहीतरी तो अद्भूत असल्यासारखे बरळतो. सध्या नैराशातून होणा-या आत्महत्या हा सरकार व सर्वांपुढील मोठा गहन प्रश्न आहे. सतत आत्महत्येचे विचार मनात घोळत असणारे अनेक रुग्णही डॉक्टरांकडे उपचारासाठी येत आहेत. या उपचारांवरील इलेक्ट्रोकन्वल्सिव्ह थेरपी म्हणजे शॉक ट्रिटमेंट हा उपचार प्रभावी मानला जातो. तसेच रिपिटेटिव्ह ट्रान्सक्रॅनिअल मॅग्नेटिक (आरटीएमएस), थीटा बर्स्ट असे विविध उपचार आहेत. काही उपचार प्रदीर्घ काळ घ्यावे लागतात. मात्र, हे सर्व उपचार खर्चिक आहेत. अनेक रुग्णांना आर्थिक चिंतेमुळे मानसिक आजार जडलेले असतात. त्याशिवाय उपचारांवरील खर्चही परवडणारा नसतो. त्यामुळे अनेकदा उपचार टाळले जातात. त्यामुळे मानसिक आजारांना आरोग्य विम्याचे संरक्षण मिळणे गरजेचे आहे. मात्र, आरोग्य विमा कंपन्या कोणत्याच पॅकेजमध्ये मानसिक आजारांचा समावेश करीत नाहीत. मानसिक आजारात ‘इंटरनेट’ची भर सध्या इंटरनेट प्रत्येकाच्या हातात आले आहे. या इंटरनेटच्या अतिवापरामुळेही मानसिक रुग्णांमध्ये वाढ होत आहे. इंटरनेटवरील विविध अ‍ॅप्लीकेशन, त्यातून वाढलेले नैराश्य आणि त्वरित उपचार न घेतल्यामुळे वाढणारी हिंसक प्रवृत्ती ही सध्या सर्वांपुढील गंभीर समस्या आहे. 

विभक्त कुटुंबपद्धती, बेरोजगारी, व्यसनाधिनता, कौटुंबिक हिंसा, स्त्रियांचे समाजातील दुय्यम स्थान, आर्थिक चिंता अशा अनेक कारणांमुळे मानसिक आजार बळावत आहेत, अशी माहिती मानसोपचार तज्ज्ञ डॉ़. अशोक कराळे यांनी दिली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरhospitalहॉस्पिटल