शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
2
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
3
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
4
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
5
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
6
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
7
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
8
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
9
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
10
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
11
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
12
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
13
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
14
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
15
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
16
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
17
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
18
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
19
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
20
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

 दिवसागणिक वाढताहेत मानसिक रुग्ण; कंपन्याही नाकारतात विमा संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 16:23 IST

साहेबराव नरसाळे /  अहमदनगर : मानसिक रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, जिल्हा रुग्णालयात रोज सुमारे ६० ते ७० रुग्ण ...

साहेबराव नरसाळे / अहमदनगर : मानसिक रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, जिल्हा रुग्णालयात रोज सुमारे ६० ते ७० रुग्ण उपचारासाठी येतात. तर खासगी दवाखान्यांमध्ये हा आकडा शेकड्यात असल्याचे सांगण्यात येते. मानसिक आजारांवरील महागड्या उपचारांवर लाखो रुपये खर्च होत आहेत. मात्र, आरोग्य विमा कंपन्यांनी मानसिक आजाराला विमा संरक्षण नाकारले आहे.मानसिक आजारांचे रुग्ण वाढत आहेत. मानसिक आजारांवरील उपचारपद्धती ही दीर्घ काळाची असते. त्यामुळे त्यावरील खर्चही सामान्य कुटुंबांच्या आवाक्याबाहेर जातात. मानसिक आजारांमध्ये नैराश्य व चिंतारोग हे प्रामुख्याने आढळून येतात.  कॅन्सर, मधुमेह, रक्तदाब असे आजार असलेल्या रुग्णांमध्ये नैराश्याचे प्रमाण अधिक आढळून येते. स्किझोफ्रेनिया, बायपोलर, ओसीडी या विकारांनी ग्रस्त रुग्णांची संख्याही वाढत आहे. स्किझोफ्रेनिया रुग्णांमध्ये संशयी वृत्ती वाढीस लागते. बाळंतीण महिलांच्या मनात सातत्याने भीती दाटून येते. यामुळे काही प्रसंगात असे रुग्ण अगदी टोकाची पावले उचलतात. एखाद्यावर हल्ला करणे, जीव घेणे असे प्रकार घडतात. तर काही रुग्ण घराबाहेर पडायला घाबरतात. यातून मानसिक प्रकृती अधिक ढासळते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. बायपोलर या आजारात रुग्ण काही आठवडे किंवा महिने नैराश्यात तर काही आठवडे किंवा महिने संबंधित रुग्ण हर्षवायू झाल्यासारखा वावरतो. त्याच्या मनात अचाट कल्पना येत राहतात आणि काहीतरी तो अद्भूत असल्यासारखे बरळतो. सध्या नैराशातून होणा-या आत्महत्या हा सरकार व सर्वांपुढील मोठा गहन प्रश्न आहे. सतत आत्महत्येचे विचार मनात घोळत असणारे अनेक रुग्णही डॉक्टरांकडे उपचारासाठी येत आहेत. या उपचारांवरील इलेक्ट्रोकन्वल्सिव्ह थेरपी म्हणजे शॉक ट्रिटमेंट हा उपचार प्रभावी मानला जातो. तसेच रिपिटेटिव्ह ट्रान्सक्रॅनिअल मॅग्नेटिक (आरटीएमएस), थीटा बर्स्ट असे विविध उपचार आहेत. काही उपचार प्रदीर्घ काळ घ्यावे लागतात. मात्र, हे सर्व उपचार खर्चिक आहेत. अनेक रुग्णांना आर्थिक चिंतेमुळे मानसिक आजार जडलेले असतात. त्याशिवाय उपचारांवरील खर्चही परवडणारा नसतो. त्यामुळे अनेकदा उपचार टाळले जातात. त्यामुळे मानसिक आजारांना आरोग्य विम्याचे संरक्षण मिळणे गरजेचे आहे. मात्र, आरोग्य विमा कंपन्या कोणत्याच पॅकेजमध्ये मानसिक आजारांचा समावेश करीत नाहीत. मानसिक आजारात ‘इंटरनेट’ची भर सध्या इंटरनेट प्रत्येकाच्या हातात आले आहे. या इंटरनेटच्या अतिवापरामुळेही मानसिक रुग्णांमध्ये वाढ होत आहे. इंटरनेटवरील विविध अ‍ॅप्लीकेशन, त्यातून वाढलेले नैराश्य आणि त्वरित उपचार न घेतल्यामुळे वाढणारी हिंसक प्रवृत्ती ही सध्या सर्वांपुढील गंभीर समस्या आहे. 

विभक्त कुटुंबपद्धती, बेरोजगारी, व्यसनाधिनता, कौटुंबिक हिंसा, स्त्रियांचे समाजातील दुय्यम स्थान, आर्थिक चिंता अशा अनेक कारणांमुळे मानसिक आजार बळावत आहेत, अशी माहिती मानसोपचार तज्ज्ञ डॉ़. अशोक कराळे यांनी दिली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरhospitalहॉस्पिटल