शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

प्रत्येक तालुक्यात शिवाजी महाराजांचे स्मारक; विखे पाटील यांची माहिती

By शिवाजी पवार | Updated: March 10, 2024 14:06 IST

श्रीरामपुरातून सुरवात, पुतळ्याचा प्रश्न मार्गी लागला

शिवाजी पवार 

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : शहरात गेल्या ४० वर्षांपासून रखडलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा विषय मार्गी लागला. भाजपचे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारे सरकार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात महाराजांचे स्मारक उभारणार आहे. त्याची सुरवात श्रीरामपुरातून झाली, अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.   

येथील आझाद मैदानावर अतुल्य सेवा सन्मान पुरस्कारांचे वितरण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, तालुकाध्यक्ष दीपक पटारे, समन्वयक नितीन दिनकर, शिवाजीराव कपाळे, अविनाश कुदळे, केतन खोरे, सुरज सूर्यवंशी, रामपाल पांडे, प्रसन्न धुमाळ, मारुती बिंगले यावेळी उपस्थित होते.

विखे पाटील म्हणाले, जिल्ह्यातील तरुणांना रोजगार देण्यासाठी कौशल्य विकास संस्था उभारण्यात येणार आहे. नगर, राहाता व श्रीरामपूर येथे या संस्था सुरू करू. मागील आठवड्यात नगर दक्षिणमध्ये कौशल्य विकास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तेथे २५ हजार बेरोजगार तरुण आले होते. त्यातील ७ हजार तरुणांना तेथे रोजगार देता आला. कौशल्य विकासातून उद्याच्या पिढीला समृद्ध करणे हे आपले कर्तव्य आहे. सबका साथ सबका विश्वास या भाजपच्या नार्यामुळे लोकांचा विश्वास वाढला आहे. तळागाळातील जनतेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य पोहोचविण्याचा आपला प्रयत्न आहे. देश पातळीवर गोसेवा आयोगाची स्थापना झाली. राज्यामध्ये आपण त्या खात्याचा मंत्री झाल्यानंतर राज्य गोसेवा आयोगाची स्थापना केली. त्या माध्यमातून गोशाळा निर्माण करण्याचा उद्देश आहे.

शहराची वाढती लोकसंख्या गृहित धरून पुढील २५ वर्षांचा विचार करून १७८ कोटी रुपयांची पाणी योजना मंजूर करून दिली. योजनेचे काम लवकरच सुरू होणार आहे, असे विखे पाटील म्हणाले.