शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

‘कुकडी’ समितीची १ जुलैला बैठक

By admin | Updated: June 28, 2014 01:12 IST

श्रीगोंदा : चार आमदारांच्या मागणीनुसार १ जुलै रोजी कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक बोलविण्यात आली आहे. कोण कशासाठी रस्त्यावर बसणार आहेत हे मला माहीत नाही.

श्रीगोंदा : चार आमदारांच्या मागणीनुसार १ जुलै रोजी कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक बोलविण्यात आली आहे. कोण कशासाठी रस्त्यावर बसणार आहेत हे मला माहीत नाही. ज्यांना गावातला सरपंच होता आले नाही, त्यांनी दुसऱ्यांना वेडे समजू नये, अशा शब्दात आ. बबनराव पापचुते यांनी घनश्याम शेलार यांचे नाव न घेता टीका केली़पाचपुते म्हणाले, ३०-३५ वर्षात घोड कुकडीच्या पाण्यासाठी आंदोलने केली़ संघर्ष केला़ सकारात्मक भूमिका मांडली़ दुष्काळी तालुक्याचे चित्र बदलले़ तालुक्याचे वाळवंट केले असते तर सहा वेळा जनतेने आमदार केले असते का? काहींना स्वत:च्या गावचे सरपंच म्हणून लोकांनी स्वीकारले नाही, यावर त्यांनी प्रथम आत्मचिंतन करावे, असा सल्लाही पाचपुते यांनी दिला़ते म्हणाले, भीमा नदीला कायम पाणी असते. भीमेच्या खोऱ्यात लवकर चांगला पाऊस होतो़ त्यामुळे या नदीवरील बंधाऱ्याच्या फळ्या लवकर काढल्या जातात. घोड नदीवरील परिस्थिती वेगळी आहे. पाऊस पडण्याची खात्री नसते़ त्यामुळे अनेकदा स्थानिक शेतकरी फळ्या काढण्यास विरोध करतात, ही वस्तुस्थिती आहे. पिंपळगाव जोगे धरणातील डेडस्टॉकमधून २ टीएमसी पाणी सोडले तर कुकडीचे पिण्यासाठी आवर्तन देता येऊ शकते का, त्या दृष्टिकोनातून प्रयत्न चालू आहे. घोड नदीवरील बंधाऱ्यात पाणी नसल्याबाबत कार्यकारी अभियंत्याने सांगितले आहे, असेही पाचपुते यांनी सांगितले.(तालुका प्रतिनिधी)काहींना माझी अ‍ॅलर्जीकुकडी घोड पाटपाणी समितीने घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीस मी लोकप्रतिनिधी नात्याने उपस्थित राहिलो. माझे मत मांडले. सर्वांचे ऐकून घेतले आणि पिण्यासाठी आवर्तन सोडण्यावर सामूहिक लढा उभारण्याचा निर्णय झाला. यामध्ये कसले राजकारण! परंतु काहींना माझी अ‍ॅलर्जी आहे यापुढेही परमेश्वराने त्यांना अशीच बुद्धी देवो, असा टोमणा बबनराव पाचपुते यांनी शेलार यांना मारला.कुकडीच्या पाण्यासाठी रास्तारोको करणारचश्रीगोंदा : तेवीस जून रोजी केलेल्या धरणे आंदोलनास चांगला प्रतिसाद मिळाला. ३० जूनच्या रास्तारोको आंदोलनाची तीव्रता कमी करण्यासाठी आ. बबनराव पाचपुते यांनी १ जुलै रोजी कुकडी कालवा सल्लागार समिती बैठक बोलावली आहे़ मात्र, रास्तारोको आंदोलन करणारच, अशी माहिती राष्ट्रवादी काँगे्रसचे माजी जिल्हाध्यक्ष घनशाम शेलार यांनी दिली.कुकडी व घोड धरणातील पाणी साठा पिण्यासाठी राखीव करण्यात आला आहे. मग कुकडी धरणाच्या उजव्या कालव्यातून सध्या आवर्तन कसे चालू आहे. दि. २९ च्या बैठकीत मी अधिकाऱ्यांना ४५ मिनिटे डोक्यावर उभे केले असे, आ. पाचपुते सांगतात ! या बैठकीतून शेतकऱ्यांना काय फायदा मिळाला, घोड नदीवरील बंधाऱ्याच्या फळ्या निघाल्या का? घोड नदीवरील बंधाऱ्यात पाणी नाही असे कार्यकारी अभियंता यादवराव खताळ यांनी सांगितले आहे. यावर शेलार म्हणाले की, बंधाऱ्यातील पाण्याची खरी आकडेवारी सांगितली जात नाही. घोड नदीवरील बंधाऱ्यातील पाणी सोडले तर घोड लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो.सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित नसल्याचे सांगताना शेलार म्हणाले, लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे कुकडी व घोडचा पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमुळे बैठकीतून काय निष्पन्न झाले? फक्त लोकप्रतिनिधीचे भाषण ऐकून घ्यावे लागले, असा टोला शेलारांनी मारला. यावेळी सतीश जामदार, सादिक जामदार, बापू सिदनकर, संतोष रायकर, रवि भोसले आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)