शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

औषधी वनस्पती निरोगी जीवनाचा मार्ग दाखवतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:22 IST

राहुरी : निसर्गामध्ये हजारो प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत. त्यांची ओळख करून त्यांच्या सहवासात गेल्यास सुखी, समृद्धी आनंदी जीवन ...

राहुरी : निसर्गामध्ये हजारो प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत. त्यांची ओळख करून त्यांच्या सहवासात गेल्यास सुखी, समृद्धी आनंदी जीवन जगण्याची कला सापडते. त्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने धावपळीच्या युगात औषधी वनस्पतीच्या सहवासात राहणे गरजेचे असल्याचे मत निसर्ग उपचारतज्ज्ञ सुभाष जाधव यांनी व्यक्त केले.

राहुरी तालुका पतंजली योग समितीच्या वतीने राहुरी येथील ट्राय फार्ममध्ये ‘औषधी वनस्पतीची ओळख’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुभाष जाधव म्हणाले, निसर्गामध्ये अनेक रोग बरे करण्याची ताकद आहे. मात्र, अलीकडच्या काळात मनुष्य निसर्गापासून दूर गेला आहे. त्यामुळे जीवनात दुःख वाट्याला आले आहे. अशा परिस्थितीत निसर्गत: असलेल्या विविध वनस्पतींचा उपयोग मनुष्यासाठी केला पाहिजे. पूर्वीपासून निरोगी जीवनासाठी औषधी वनस्पतीचा उपयोग झाला आहे. औषधी वनस्पतीच्या सहवासातून अनेक वनस्पतींची ओळख होते. यातूनच सुखी जीवन मिळते. त्या दृष्टिकोनातून औषधी वनस्पतींची माहिती करून घेणे गरजेचे आहे. या क्षेत्रात भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर वनस्पती उपलब्ध आहेत. त्याचा लाभ सर्वांनी घेतला पाहिजे, असे मत सुभाष जाधव यांनी व्यक्त केले.

यावेळी ट्राय फार्ममध्ये असलेल्या विविध औषधी वनस्पतींची माहिती उपस्थितांना शिवार फेरीमार्फत देण्यात आली. ट्राय फार्मचे संचालक भाऊसाहेब येवले यांनी स्वागत केले. अर्चना झिने यांनी आभार मानले.