शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

महापौरांनी पाठविले ऊर्जामंत्र्याना पत्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 19:40 IST

शहरातील पाणी उपसा केंद्राचे भारनियमन त्वरित बंद करण्यासाठी महापौर सुरेखा कदम यांनी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र पाठविले आहे.

ठळक मुद्देपाणी उपसा केंद्रांचे भारनियमन रद्द करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : शहरातील पाणी उपसा केंद्राचे भारनियमन त्वरित बंद करण्यासाठी महापौर सुरेखा कदम यांनी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र पाठविले आहे. यामध्ये भारनियमनामुळे ऐन सणासुदीत शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून अत्यावश्यक सेवेतील विशेष बाब म्हणून विद्युतपुरवठा सुरळित करण्याच्या सूचना यंत्रणेला करण्याची मागणी बावनकुळे यांच्याकडे महापौर कदम यांनी केली आहे. 

अहमदनगर महापालिकेच्या वतीने वसंतटेकडी येथून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. या ठिकाणाहून ग्रामीण भागासाठी टँकरही भरले जातात. शहरात पाणी वितरणासाठी वसंतटेकडी येथे मोटारीव्दारे पाणीवाटपासाठी उंच टाक्या भरल्या जातात. त्यानंतर पाण्याचे वितरण केले जाते. मात्र गेल्या १० ते १२ दिवसांपासून या भागाचा विजपुरवठा खंडीत होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा वितरणाच्या टाक्या पूर्ण क्षमतेने भरत नाहीत. परिणामी शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. आगरकर मळा, बाळाजी बुवा संपवेल, लालटाकी येथील वितरण केंद्राचांही विद्युत पुरवठा खंडीत केला जात आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. ऐन सणासुदीत तीव्र पाणीटंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. ही परिस्थिती विचारात घेऊन पाणीपुरवठा केंद्र वसंतटेकडी, आगरकर मळा संपवेल, सिध्दार्थनगर उंच टाकी, बाळाजी बुवा संपवेल या ठिकाणी भारनियमन करु नये, याबाबत आपण विशेष लक्ष्य घालून विद्युत पुरवठा सुरळित ठेवण्याचे आदेश महावितरणला द्यावेत, असेही महापौर सुरेखा कदम यांनी पत्रात म्हटले आहे.