शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

बाजार समित्या कडकडीत बंद

By admin | Updated: July 4, 2016 23:51 IST

अहमदनगर : शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमनातून वगळण्याच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांनी सोमवारी कडकडीत बंद पुकारला़

अहमदनगर : शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमनातून वगळण्याच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांनी सोमवारी कडकडीत बंद पुकारला़ दरम्यान हमालांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून संताप व्यक्त केला़ त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज दिवसभर ठप्प होते़ सरकारने हा निर्णय मागे न घेतल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन हाती घेण्याचा इशारा हमाल व व्यापारी असोसिएशनने दिला आहे़कृषी उत्पन्न बाजार समिती नियमनातून फळे, भाजीपाला, कांदा बटाटे आदी शेतमाल वगळण्याचा निर्णय युती सरकारने घेतला आहे़ सरकारच्या या निर्णयाचे पडसाद सोमवारी नगरमध्ये उमटले़ नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याचा नियमित लिलाव होत असतो़ हा लिलाव सोमवारी झाला नाही़ दुकाने बंद ठेवून नगर व नेप्ती येथील व्यापाऱ्यांनी सरकारच्या निर्णयाचा निषेध केला़ दरम्यान जिल्हा हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले यांच्या नेतृत्वाखाली दुपारी बारा वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला़ कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमाल पंचायत भवन येथून हा मोर्चा निघाला होता़ मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर त्याचे सभेत रुपांतर झाले़ सुमारे दोनशेहून अधिक हमाल मोर्चात सहभागी होते़ सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता़ या धोरणावर घुले यांच्यासह सर्वांनी यावेळी सडकून टीका केली़जिल्हाभरातून शेतकरी माल विक्रीसाठी नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झाले होते़ मात्र व्यापाऱ्यांची दुकाने बंद होती़ त्यामुळे माल परत घरी घेवून जाणे शेतकऱ्यांना शक्य नव्हते़ बाजार समितीच्या बाहेर काहींनी पथारी टाकून भाजीपाल्याची विक्री केली़ आघाडी सरकारच्या काळातही हा निर्णय झाला होता़ मात्र हमाल व व्यापाऱ्यांनी त्यास विरोध केला़ त्यामुळे हा निर्णय सरकारने मागे घेतला़ पण, युती सरकारने पुन्हा याबाबत आदेश जारी केला आहे़ त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील हजारो हमालांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे़ सरकारने उत्पादन आधारित शेतीमालाला भाव जाहीर करावा़पण, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमनातून भाजीपाल्यासह आदी शेतमाल वगळू नये़ तसे झाल्यास बाजार समित्यांचे अस्तित्व धोक्यात येईल़ परिणामी शेतकऱ्यांना त्यांचा माल कवडीमोल भावात विकावा लागेल़ त्याचबरोबर ही संपूर्ण व्यवस्था नष्ट होऊन अनेक प्रश्न निर्माण होतील़ सरकारने हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी यावेळी निवेदनाव्दारे करण्यात आली़ नगरसह जिल्ह्यातील बाजार समित्या दिवसभर बंद होत्या़ (प्रतिनिधी)नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्यासह शेतमालाचे लिलाव करणारी १२५ दुकाने आहेत़ या दुकानांत दररोज अंदाजे एक ते दीड कोटींची उलाढाल होती़ बंदमुळे ही उलाढाल झाली नाही़ त्याचबरोबर नेप्ती येथील बाजार समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होते़ तिथे अंदाजे सहा ते सात कोटींची उलाढाल होत असते़ नेप्ती येथील बाजार समितीदेखील बंद होती़सरकारने हा चुकीचा निर्णय घेतला आहे़ त्यामुळे हमालांवर उपासमारीची वेळ येणार असून, सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव जाहीर करावा़ पण, हा निर्णय घेऊ नये, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन हमाल पंचायतीच्या वतीने हाती घेण्यात येणार आहे़ -अविनाश घुले, अध्यक्ष, जिल्हा हमाल पंचायतव्यापारी ५ ते ६ रुपये आडत घेतो़ पण, त्याबदल्यात शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य भाव मिळतो़ परंतु, सरकारने ही आडत बंद करावी, यासाठी हा आटापिटा चालविला आहे़ सरकारला शेतकऱ्यांची एवढीच काळजी असेल, तर खते व बियाणे सवलतीच्या दरात द्यावीत़ सरकारने कृषी उत्पन्न बाजार समित्या उदध्वस्त करण्याचा कुटील डाव आखला असून, त्याविरोधात बेमुदत बंद पुकारण्यात येणार आहे़-संतोष सूर्यवंशी, अध्यक्ष, व्यापारी असोसिएशन