शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

जिल्हाभरातील आठवडे बाजार बंद

By admin | Updated: June 4, 2017 15:50 IST

पारनेर तालुक्यातील पारनेर, अळकुटी, वनकुटे येथील आठवडेबाजार शेतकऱ्यांनी स्वंयस्फुर्तीने बंद ठेवले़

अहमदनगर : शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी जिल्हाभरातील रविवारचे आठवडे बाजार बंद ठेवण्यात आले़ पारनेर तालुक्यातील पारनेर, अळकुटी, वनकुटे येथील आठवडेबाजार शेतकऱ्यांनी स्वंयस्फुर्तीने बंद ठेवले़राज्यात सुरू असलेल्या शेतकरी संपामध्ये पारनेरमध्ये रविवारीही उत्स्फुर्तपणे शेतकरी सहभागी झाले होते़ रविवारी पारनेर शहरातील आठवडे बाजारात शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी आणलाच नाही़ यामुळे बाजारात सकाळपासूनच शुकशुकाट होता़ पारनेर शहर व परिसरातील ग्राहक भाजीपाला आणण्यासाठी आले होते़ मात्र त्यांना रिकाम्या पिशव्या घेऊन परतावे लागले. शेतकऱ्यांनी उत्स्फुर्तपणे बाजार बंद केल्यानंतर बाहेरीला व्यापाऱ्यांनी शेतमाला व्यतिरिक्त इतर वस्तु विक्रीसाठी आणल्या होत्या़ मात्र, शेतकऱ्यांचाच माल विक्रीला नाही, त्यामुळे व्यापाऱ्यांनाही माल विकू दिला जाणार नाही, असा पावित्रा योगेश मते, बाळासाहेब मते, दिपक नाईक, महेंद्र मगर, धीरज महांडुळे, दादा शेटे, मंदार नाईक, रायभान औटी, मंगेश कानडे, बाबासाहेब चेडे, संदीप कावरे आदींनी घेतला़ त्यामुळे व्यापाऱ्यांनीही आणलेला माल परत नेला़संपामुळे कोरडगाव, खरवंडीतील बाजार बंदशेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा दर्शविण्यासाठी पाथर्डी तालुक्याच्या पूर्वभागातील कोरडगाव व खरवंडीकासार येथील आठवडे बाजार तसेच दुध संकलन केंद्र बंद ठेवण्यात आले. बाजारपेठांमध्ये फळे, भाजीपाल्यांची आवक बंद झाली आहे. कोरडगाव येथे डायनामिक्स, रिलायन्स, प्रभात तसेच तालुका दुधसंघाचे संकलन केंद्र असुन येथे दर दिवशी सुमारे चार हजार लिटर दुधाचे परिसरातून संकलन होते. याची दुध व्यवसायावर मोठी आर्थिक उलाढाल अवलंबुन आहे. सदर संकलन केंद्र बंद असल्याने आर्थिक उलाढाल ठप्प झाली. कोरडगाव येथील शेतकऱ्यांनी दुध रस्त्यावर ओतून शासनाचा निषेध केला. राष्ट्रीय महामार्गावर खरवंडी ही महत्वाची बाजारपेठ आहे. येथील बाजार बंद असल्याने सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले. शेतकरी भाजीपाला जनावरांना चारा म्हणून देत आहे. दुधापासुन दुग्धजन्य पदार्थ बनविले जात आहेत.विसापूर येथील आठवडे बाजार बंद संपाबाबत विसापर परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. संप मागे न घेता संपाला पाठींबा चालू ठेवण्यासाठी विसापूर येथील आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला. प्रत्येक रविवारी विसापूर येथे आठवडे बाजार भरत असतो. रविवारी नेहमीप्रमाणे आठवडे बाजारात व्यापाऱ्यांनी माल विक्रीसाठी आणला होता़ मात्र, शेतकरी संप असल्याचे कळताच व्यापाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला़ सरकारने जयाजी सुर्यवंशी यांना हाताशी धरुन शेतकऱ्यांचा संप मोडीत काढण्याचा प्रयत्न केला़ शेतकऱ्यांना सरकारची भुमिका मान्य नसल्याने सोमवारी महाराष्ट्र बंदला पाठींबा देण्यासाठी कोळगाव व विसापूर परिसरातील गावांमध्ये व्यवहार बंद राहणार आहेत.