शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभरातील आठवडे बाजार बंद

By admin | Updated: June 4, 2017 15:50 IST

पारनेर तालुक्यातील पारनेर, अळकुटी, वनकुटे येथील आठवडेबाजार शेतकऱ्यांनी स्वंयस्फुर्तीने बंद ठेवले़

अहमदनगर : शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी जिल्हाभरातील रविवारचे आठवडे बाजार बंद ठेवण्यात आले़ पारनेर तालुक्यातील पारनेर, अळकुटी, वनकुटे येथील आठवडेबाजार शेतकऱ्यांनी स्वंयस्फुर्तीने बंद ठेवले़राज्यात सुरू असलेल्या शेतकरी संपामध्ये पारनेरमध्ये रविवारीही उत्स्फुर्तपणे शेतकरी सहभागी झाले होते़ रविवारी पारनेर शहरातील आठवडे बाजारात शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी आणलाच नाही़ यामुळे बाजारात सकाळपासूनच शुकशुकाट होता़ पारनेर शहर व परिसरातील ग्राहक भाजीपाला आणण्यासाठी आले होते़ मात्र त्यांना रिकाम्या पिशव्या घेऊन परतावे लागले. शेतकऱ्यांनी उत्स्फुर्तपणे बाजार बंद केल्यानंतर बाहेरीला व्यापाऱ्यांनी शेतमाला व्यतिरिक्त इतर वस्तु विक्रीसाठी आणल्या होत्या़ मात्र, शेतकऱ्यांचाच माल विक्रीला नाही, त्यामुळे व्यापाऱ्यांनाही माल विकू दिला जाणार नाही, असा पावित्रा योगेश मते, बाळासाहेब मते, दिपक नाईक, महेंद्र मगर, धीरज महांडुळे, दादा शेटे, मंदार नाईक, रायभान औटी, मंगेश कानडे, बाबासाहेब चेडे, संदीप कावरे आदींनी घेतला़ त्यामुळे व्यापाऱ्यांनीही आणलेला माल परत नेला़संपामुळे कोरडगाव, खरवंडीतील बाजार बंदशेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा दर्शविण्यासाठी पाथर्डी तालुक्याच्या पूर्वभागातील कोरडगाव व खरवंडीकासार येथील आठवडे बाजार तसेच दुध संकलन केंद्र बंद ठेवण्यात आले. बाजारपेठांमध्ये फळे, भाजीपाल्यांची आवक बंद झाली आहे. कोरडगाव येथे डायनामिक्स, रिलायन्स, प्रभात तसेच तालुका दुधसंघाचे संकलन केंद्र असुन येथे दर दिवशी सुमारे चार हजार लिटर दुधाचे परिसरातून संकलन होते. याची दुध व्यवसायावर मोठी आर्थिक उलाढाल अवलंबुन आहे. सदर संकलन केंद्र बंद असल्याने आर्थिक उलाढाल ठप्प झाली. कोरडगाव येथील शेतकऱ्यांनी दुध रस्त्यावर ओतून शासनाचा निषेध केला. राष्ट्रीय महामार्गावर खरवंडी ही महत्वाची बाजारपेठ आहे. येथील बाजार बंद असल्याने सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले. शेतकरी भाजीपाला जनावरांना चारा म्हणून देत आहे. दुधापासुन दुग्धजन्य पदार्थ बनविले जात आहेत.विसापूर येथील आठवडे बाजार बंद संपाबाबत विसापर परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. संप मागे न घेता संपाला पाठींबा चालू ठेवण्यासाठी विसापूर येथील आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला. प्रत्येक रविवारी विसापूर येथे आठवडे बाजार भरत असतो. रविवारी नेहमीप्रमाणे आठवडे बाजारात व्यापाऱ्यांनी माल विक्रीसाठी आणला होता़ मात्र, शेतकरी संप असल्याचे कळताच व्यापाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला़ सरकारने जयाजी सुर्यवंशी यांना हाताशी धरुन शेतकऱ्यांचा संप मोडीत काढण्याचा प्रयत्न केला़ शेतकऱ्यांना सरकारची भुमिका मान्य नसल्याने सोमवारी महाराष्ट्र बंदला पाठींबा देण्यासाठी कोळगाव व विसापूर परिसरातील गावांमध्ये व्यवहार बंद राहणार आहेत.