शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

महामार्गांची चाळण-२ / मनमाड महामार्ग बनला मरणमार्ग, दीड कोटी खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 11:51 IST

अहमदनगर : नगर- मनमाड महामार्गाची पुरती चाळण झाली आहे़ नगर ते कोपरगाव मार्गावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत़ सर्वाधिक अवजड वाहनांची  वर्दळ असणाºया या महामार्गावर लहान-मोठी वाहने, दुचाकीस्वरांना अक्षरश: जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे़ जिल्ह्यातील मंत्र्यासह या भागातील आमदार महामार्गाच्या दुरुस्तीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे़ 

अण्णा नवथर 

अहमदनगर : नगर- मनमाड महामार्गाची पुरती चाळण झाली आहे़ नगर ते कोपरगाव मार्गावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत़ सर्वाधिक अवजड वाहनांची  वर्दळ असणाºया या महामार्गावर लहान-मोठी वाहने, दुचाकीस्वरांना अक्षरश: जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे़ जिल्ह्यातील मंत्र्यासह या भागातील आमदार महामार्गाच्या दुरुस्तीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे़ 

नगर जिल्ह्यातील सर्वाधिक वाहतूक असलेला नगर- मनमाड हा एकमेव महामार्ग आहे़ नगर ते कोपरगाव हे अंतर ९६ कि़मी़ इतके आहे़ सन २००६ ते २०१० या काळात महामार्गाचे मजबूतीकरण करण्यात आले़  हे काम करणाºया विकासाकडे हा महामार्ग होता़ विकासकाची मुदत संपली़ त्यामुळे टोल वसुलीतून सुटका झाली़ पण, रस्त्याची अल्पावधीत दुरवस्था झाली़  हा महामार्ग जागतिक बँक प्रकल्प विभागाच्या अधिपत्याखाली आला़

 

दरम्यानच्या काळात रस्त्याकडे दुर्लक्ष झाले़ परिणामी ठिकठिकाणी खड्डे पडले़ साईडपट्ट्यांचा भराव पावसाच्या पाण्याने वाहून गेला़ दुभाजकाच्या बाजूने खड्ड्यांची रांग लागली़ डांबराचा थर उखडून खड्डे पडले़  हे खड्डे बुजविण्यासाठी जुलै महिन्यांत  १ कोटी ४० लाखांची निविदा काढण्यात आली़  एकूण १०० कि़मी़ साठी सहा म्हणजे १५ ते २० कि़मी़ साठी एक ठेकेदाराची नेमणूक झाली़ कार्यारंभ आदेश मिळाल्यापासून ते आॅगस्ट अखेरपर्यंत एक-एक करून खड्डे बुजविले असते तर पावसाळ्यात रस्त्याची ही अवस्था झाली नसती़ मात्र ठेकेदारांनी वेळीच खड्डे बुजविले नाहीत़ ठेकेदार मोठे खड्डे पडण्याची वाट पाहत बसले़ जागतिक बँकेच्या अधिकाºयांनी बघ्याची भूमिका घेतली़  धो-धो पाऊस पडायला सुरुवात झाल्यानंतर सगळेच जागे झाले़ पण, पावसात बुजविलेले खड्डे फारकाळ टिकत नाहीत़ पावसात बुजवलेले खड्डे वाहून जात असल्याने पुन्हा खड्डे पडत आहेत़ वाहने खड्ड्यात आदळल्याने वाहनांचे मोठे नुकसान होत असून या मार्गावर अपघातांची संख्याही वाढली आहे़ वाढत्या अपघातांना जबाबदार कोण?  प्रशासन की ठेकेदार याची चौकशी करण्याची मागणी पुढे येत आहे़़़़१ लाख ६ हजार मेट्रिक टनाची वाहतूकनगर-मनमाड महामार्गाचा आराखडा तयार केला त्यावेळी साधारण ते ६ ते १२ टन क्षमतेची वाहने होती़ अलिकडे ३० ते ४० टनांची वाहने आली आहेत. ही वाहने या महामार्गावरून जातात़ पावसामुळे रस्ता खचतो़ रस्त्यातील पाणी काढून देण्यासाठी कसरत करावी लागते़ परिसरातील शेतकरी पाणी काढू देत नाहीत़ त्यामुळे मनमाड महामार्गाची दुरवस्था झाली असल्याचे कार्यकारी अभियंता नरेंद्र राजगुरू यांचे म्हणणे आहे़़़़दुरुस्तीच्या १३५ कोटींना कात्रीनगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीसाठी जागतिक बँक प्रकल्प विभागाने १३५ कोटींचंी तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात करण्याचा प्रस्ताव दिला़ हा प्रस्ताव शासनाने मंजूरही केला़ परंतु, कोविड-१९ मुळे इतर खर्चाला सरकारने कात्री लावल्याने या निधीलाही बे्रक मिळाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले़ ़़़मंत्री, खासदारांच्या बैठकाही निष्फळ ठरल्यानगर-मनमाड महामार्गासाठी खासदार डॉ़ सुजय विखे यांनी अनेक बैठका घेतल्या़ प्रशासनाला सूचनाही केल्या़ त्यामुळे खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले़ नगरविकास राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही बैठका घेतल्या़ पण, त्याचा फारसा उपयोग झाला नाही़ सध्या राज्याचे अधिवेशन सुरू आहे़ या अधिवेशानात तरी हा प्रश्न मार्गी लागेल का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे़ 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरroad safetyरस्ते सुरक्षा