शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

मांजरसुंभा ग्रामस्थांनीे वॉटर कप जिंकण्याचे ध्येय ठेवावे - उज्ज्वला गाडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 19:08 IST

नगर तालुक्यातील मांजरसुंभा गावाने पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कपस्पर्धेमध्ये सहभागी होत असल्याने ग्रामस्थांनी सर्वोकृष्ट काम करण्याची गरज आहे. गावाने उत्कृष्ट काम करुन कप जिंकण्याचे आवाहन प्रांताधिकारी उज्वला गाडेकर यांनी केले.

केडगाव : नगर तालुक्यातील मांजरसुंभा गावाने पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कपस्पर्धेमध्ये सहभागी होत असल्याने ग्रामस्थांनी सर्वोकृष्ट काम करण्याची गरज आहे. गावाने उत्कृष्ट काम करुन कप जिंकण्याचे आवाहन प्रांताधिकारी उज्वला गाडेकर यांनी केले.विशेष ग्रामसभेत त्या बोलत होत्या. यावेळी सरपंच जालिंदर कदम, उपसरपंच रंजना कदम, स्पधेर्चे जिल्हा प्रमुख बाळासाहेब शिंदे, चेअरमन गोरक्षनाथ कदम ग्रामस्थ उपस्थित होते.प्रांताधिकारी गाडेकर म्हणाल्या, स्पर्धा परीक्षांसाठी गावातील युवकांना मार्गदर्शन करणार आहे. गावातील महिला, युवक यांनी पारितोषिक मिळवावयाचे ध्येय ठेवावे. प्रत्येक कामामध्ये एकमेकात समन्वय ठेवावा असेही आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले. गावाने वॉटर कप जिंकावा. यासाठी प्रशासनासाच्या वतीने सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल. मी गावची मुलगी समजून श्रमदानासाठी कामासाठी येणार आहे. स्पर्धेच्या नियोजनासाठी होणा-या राजस्तरीय ट्रेनिंगसाठी रोहिणी बाबासाहेब कदम, रंजना कदम, तुकाराम कदम, सुदाम कदम, डॉ. राम कदम यांची निवड करण्यात आली. तुकाराम वाखुरे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार गोरक्षनाथ कदम यांनी मानले. राज्यात २०१६ आणि २०१७ या दोन वर्षी भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर पाणी फाऊंडेशनच्या वतीने अभिनेता आमिर खान व किरण राव यांनी तिसरी सत्यमेव जयते वॉटर कप २०१८ स्पर्धा जाहीर केली. स्पधेर्चे हे ३ रे वर्ष असून ७ हजार २०० पेक्षा गावांनी यात सहभाग घेतला आहे. या वर्षी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा कालावधी ८ एप्रिल ते २२ मे २०१८ पर्यत आहे. विजेत्या पहिल्या तीन गावांना अनुक्रमे ७५ लाख रुपये, ५० लाख रुपये व ४० लाख रुपये रोख पारितोषिक दिले जाणार आहे. तसेच प्रत्येक तालुक्यातून स्पर्धेत आघाडीवर असलेल्या गावालाही प्रत्येकी दहा लाख रुपये रोख पारितोषिक मिळणार आहे. स्पर्धेत विजेत्या गावांना एकूण १० कोटी रुपयांची पारितोषिके मिळणार आहेत.

गावाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. विविध उपक्रम गावाने यशस्वीपणे राबवले आहेत. वॉटर कपही मिळण्यासाठी आणखी चांगले काम करण्यात येणार आहे. १५ वर्षेापासून राजकीय हेवेदावे सोडून सुशिक्षित मंडळीसह काम करत आहोेत. गावात नियोजनबद्ध पद्धतीने काम चालू असून स्पधेर्मुळे होणा-या कामामुळे पाणीपातळी नक्कीच वाढणार आहे.-जालिंदर कदम, सरपंच

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर