शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

मांजरसुंभा ग्रामस्थांनीे वॉटर कप जिंकण्याचे ध्येय ठेवावे - उज्ज्वला गाडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 19:08 IST

नगर तालुक्यातील मांजरसुंभा गावाने पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कपस्पर्धेमध्ये सहभागी होत असल्याने ग्रामस्थांनी सर्वोकृष्ट काम करण्याची गरज आहे. गावाने उत्कृष्ट काम करुन कप जिंकण्याचे आवाहन प्रांताधिकारी उज्वला गाडेकर यांनी केले.

केडगाव : नगर तालुक्यातील मांजरसुंभा गावाने पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कपस्पर्धेमध्ये सहभागी होत असल्याने ग्रामस्थांनी सर्वोकृष्ट काम करण्याची गरज आहे. गावाने उत्कृष्ट काम करुन कप जिंकण्याचे आवाहन प्रांताधिकारी उज्वला गाडेकर यांनी केले.विशेष ग्रामसभेत त्या बोलत होत्या. यावेळी सरपंच जालिंदर कदम, उपसरपंच रंजना कदम, स्पधेर्चे जिल्हा प्रमुख बाळासाहेब शिंदे, चेअरमन गोरक्षनाथ कदम ग्रामस्थ उपस्थित होते.प्रांताधिकारी गाडेकर म्हणाल्या, स्पर्धा परीक्षांसाठी गावातील युवकांना मार्गदर्शन करणार आहे. गावातील महिला, युवक यांनी पारितोषिक मिळवावयाचे ध्येय ठेवावे. प्रत्येक कामामध्ये एकमेकात समन्वय ठेवावा असेही आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले. गावाने वॉटर कप जिंकावा. यासाठी प्रशासनासाच्या वतीने सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल. मी गावची मुलगी समजून श्रमदानासाठी कामासाठी येणार आहे. स्पर्धेच्या नियोजनासाठी होणा-या राजस्तरीय ट्रेनिंगसाठी रोहिणी बाबासाहेब कदम, रंजना कदम, तुकाराम कदम, सुदाम कदम, डॉ. राम कदम यांची निवड करण्यात आली. तुकाराम वाखुरे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार गोरक्षनाथ कदम यांनी मानले. राज्यात २०१६ आणि २०१७ या दोन वर्षी भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर पाणी फाऊंडेशनच्या वतीने अभिनेता आमिर खान व किरण राव यांनी तिसरी सत्यमेव जयते वॉटर कप २०१८ स्पर्धा जाहीर केली. स्पधेर्चे हे ३ रे वर्ष असून ७ हजार २०० पेक्षा गावांनी यात सहभाग घेतला आहे. या वर्षी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा कालावधी ८ एप्रिल ते २२ मे २०१८ पर्यत आहे. विजेत्या पहिल्या तीन गावांना अनुक्रमे ७५ लाख रुपये, ५० लाख रुपये व ४० लाख रुपये रोख पारितोषिक दिले जाणार आहे. तसेच प्रत्येक तालुक्यातून स्पर्धेत आघाडीवर असलेल्या गावालाही प्रत्येकी दहा लाख रुपये रोख पारितोषिक मिळणार आहे. स्पर्धेत विजेत्या गावांना एकूण १० कोटी रुपयांची पारितोषिके मिळणार आहेत.

गावाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. विविध उपक्रम गावाने यशस्वीपणे राबवले आहेत. वॉटर कपही मिळण्यासाठी आणखी चांगले काम करण्यात येणार आहे. १५ वर्षेापासून राजकीय हेवेदावे सोडून सुशिक्षित मंडळीसह काम करत आहोेत. गावात नियोजनबद्ध पद्धतीने काम चालू असून स्पधेर्मुळे होणा-या कामामुळे पाणीपातळी नक्कीच वाढणार आहे.-जालिंदर कदम, सरपंच

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर