शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

महाराष्ट्राला पाणीदार बनवा - आमिर खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 13:38 IST

पाणी फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत लोकसहभाग वाढत असून, लोकसहभागातून गावांना पाणीदार बनवा, असे आवाहन पाणी फाउंडेशनचे अध्यक्ष अभिनेते आमिर खान यांनी केले़ मागच्या दोन स्पर्धेत ज्या गावांनी सहभाग घेतला, त्या गावांत टँकर बंद झाले आहेत, असेही त्यांनी सांगितले़

ठळक मुद्देजोगेवाडी येथे पाणी फाउंडेशनच्या वतीने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत गावक-यांना प्रोत्साहित करण्यासाठी सिनेअभिनेता आमिर खान व किरण राव यांनी गावक-यांसह श्रमदान

पाथर्डी : पाणी फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत लोकसहभाग वाढत असून, लोकसहभागातून गावांना पाणीदार बनवा, असे आवाहन पाणी फाउंडेशनचे अध्यक्ष अभिनेते आमिर खान यांनी केले़ मागच्या दोन स्पर्धेत ज्या गावांनी सहभाग घेतला, त्या गावांत टँकर बंद झाले आहेत, असेही त्यांनी सांगितले़तालुक्यातील जोगेवाडी येथे पाणी फाउंडेशनच्या वतीने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत गावक-यांना प्रोत्साहित करण्यासाठी सिनेअभिनेता आमिर खान व किरण राव यांनी गावक-यांसह श्रमदान केले़ यावेळी श्रमदानावर आधारित लघुपटाचे चित्रीकरण करण्यात आले. आमिर खान यांच्यासमवेत किरण राव, बाळू शिंदे, प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल, तहसीलदार नामदेव पाटील, पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनीही श्रमदान केले. गावाला तीनही बाजूने डोंगर असल्याने सीसीटी बंधा-यांची कामे केली जाणार आहेत.जोगेवाडीत ७ एप्रिलपासून पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून काम सुरू करण्यात आले असून, मंगळवारी दुपारी दीड वाजता पाथर्डी येथील हेलिपॅडवर आमिर खान यांचे आगमन झाले़ यावेळी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती़ उपसरपंच बाळासाहेब आंधळे यांनी आमिर खान यांचे स्वागत केले. त्यानंतर कारने जोगेवाडी गाठून आमिर खान यांनी गावकºयांशी मुक्त संवाद साधला़ आमिर खान म्हणाले, तुमच्या गावात येऊन अतिशय चांगलं वाटलं. तुम्ही खूप काम चांगल काम करत आहात़ पाणी फाउंडेशनचा वॉटर कप तुम्ही जिंक ा, अशी तुम्हाला शुभेच्छा देतो. गावासाठी पाणी उपलब्ध करून देणं खूप चांगलं काम आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गावांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा़ एका गावाने चांगल काम केलं, तर अनेक गावांना प्रेरणा मिळते़ग्रामदैवत काशिनाथाच्या मंदिरात आमिर खान यांनी आरती करून श्रमदान केले़ गावकरी ४५ दिवस श्रमदान करणार आहेत़ प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी विक्रम बांदल यांनी आमिर खान यांचे स्वागत केले़ तहसीलदार नामदेव पाटील यांनी आभार मानले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डीAamir Khanआमिर खान