शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राहुरी तालुक्यामधील ब्राम्हणी गावातील शेतक-यांचा महावितरणवर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 17:31 IST

अचानक दहा रोहित्र बंद केल्याच्या निषेधार्थ ब्राम्हणीतील शेतक-यांनी महावितरण कार्यालयासमोर हल्लाबोल करत ठिय्या आंदोलन केले. तात्काळ वीज पुरवठा सुरू न केल्यास रास्ता रोकोचो इशारा संतप्त शेतक-यांनी दिला आहे.

ठळक मुद्देदहा रोहित्र बंदवीज सुरू न केल्यास रास्ता रोकोचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कराहुरी : अचानक दहा रोहित्र बंद केल्याच्या निषेधार्थ ब्राम्हणीतील शेतक-यांनी महावितरण कार्यालयासमोर हल्लाबोल करत ठिय्या आंदोलन केले. तात्काळ वीज पुरवठा सुरू न केल्यास रास्ता रोकोचो इशारा संतप्त शेतक-यांनी दिला आहे.सध्या ऊस, कांदा लागवड सुरू आहे. अशा परिस्थिती परीसरातील पुर्व सुचना न देता गावातील दहा वीज रोहित्र बंद करण्यात आले. त्यामुळे शेतातील उभ्या पिकांसह जनावरे तसेच माणसांची पाण्याची अडचण निर्माण झाली आहे. थकीत वीज बील भरण्यास मुदत देण्यात यावी, तो पर्यत रोहित्र बंद करू नये. अशी मागणी शेतक-यांनी केली आहे. महावितरणने वीज रोहित्र बंद करून शेतक-यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरु केल्याचा आरोपही संतप्त शेतक-यांनी केला आहे.ठिय्या आंदोलनादरम्यान पंचायत समिती सदस्य सुरेश बानकर, उपसरपंच डॉ. बानकर, मोकाटे गुरुजी, रंगनाथ मोकाटे, महेंद्र तांबे, माणिक तारडे, ज्ञानदेव मोकाटे, तोलाजी नवाळे, जालू बानकर, केशव हापसे, शिवाजी राजदेव, चंद्रभान राजदेव, गोरक्ष शिंदे, उमाकांत हापसे, डॉ. काका राज देव, दादा ठुबे, अनिल ठुबे, जगन्नाथ वने, माणिक देशमुख, राम राजदेव, अजीत तारडे, संभाजी हापसे, एकनाथ वने, चंद्रभान राजदेव आदिंसह मोठ्या संख्येने ठिय्या आंदोलनात सहभागी होते.शेतक-यांना अपमानास्पद वागणूकआज मंगळवारी सकाळी एकत्रितपणे महावितरण कार्यालयाकडे जाण्यापुर्वी गावातील पदाधिका-यांसह काही शेतक-यांनी संबधित अधिका-यांना संपर्क केला. मात्र, जबाबदार अधिका-यांनी कार्यालयाकडे फिरकणे पसंत न करता शेतक-यांनाच भ्रमणध्वनीवरून उलटे बोलत अपमानास्पद वागणूक दिली. त्यामुळे संतप्त शेतक-यांनी रास्ता रोकोचा इशारा दिला आहे.बील भरून गुन्हा केला का ? - संतप्त शेतक-यांचा सवालदहा वीज रोहित्रावरील बहुतेक वीज ग्राहकांनी विहीत मुदतीत वीज बील भरले आहे. वास्तविक महावितरणे संपुर्ण वीज रोहित्र बंद न करताना प्रामाणिकपणे वीज बील भरणा-यांचा कनेक्शन कट करण्यापुर्वी विचार करणे गरजेचे होते. त्यामुळे वीज बील भरून आम्ही गुन्हा केला का, असा सवाल शेतक-यांमधून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीmahavitaranमहावितरण