शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

प्रभावी लसीकरणामुळे यंदा लम्पी आटोक्यात, सध्या केवळ ८२६ बाधीत

By चंद्रकांत शेळके | Updated: September 26, 2023 18:36 IST

सध्या जिल्ह्यात केवळ ८२६ बाधीत जनावरांची संख्या आहे.

अहमदनगर : जिल्ह्यात लम्पी साथरोगाची लागण आटोक्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात केवळ ८२६ बाधीत जनावरांची संख्या आहे. मागील वर्षी हाच आकडा ५० हजारांपर्यंत गेला होता. तरीही पावसाळ्यामुळे आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या आहेत.

मागील वर्षी राज्यात ॲागस्ट २०२२ पासून जनावरांमध्ये लंपी साथरोगाचा कहर पहायला मिळाला. ॲागस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत मोठ्या संख्येने बाधित जनावरांची संख्या वाढली. डिसेंबरपर्यंत बाधित जनावरांचा आकडा ५० हजारांच्या पुढे गेला होता. दरम्यान जनावरे मृत्यू होण्याचे प्रमाणही खूप होते. मागील वर्षीच्या लंपी लाटेत ४ हजारांहून अधिक जनावरे दगावली.

दरम्यान, पशुसंवर्धन विभागाने मोहीम राबवून दोन महिन्यात १०० टक्के लसीकरण केले. याशिवाय आवश्यक तेथे तातडीने उपचार, गोठा स्वच्छता, धूर फवारणी आदी उपाययोजना केल्याने डिसेंबरअखेरपर्यंत साथ आटोक्यात आली होती. पुढे ही संख्या कमी होत अगदी दोन आकड्यांवर आली.दरम्यान, जुलै २०२३ पासून लंपीच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा डोके वर काढले. प्रारंभी आठवड्याला १०० ते २०० बाधित जनावरांची संख्या ॲागस्टमध्ये आठवड्याला ६०० पर्यंत गेली. परंतु पशुसंवर्धन विभागाने तातडीने उपाययोजना केल्या. जन्मलेल्या वासरांचेही लसीकरण केल्याने लंपी आटोक्यात आला. यंदा जुलैपासून एकूण ४ हजार ६७८ जनावरे बाधित झाली. त्यातील ३ हजार ५८५ जनावरे उपचाराने बरी झाली. सध्या केवळ ८२६ जनावरे बाधित (ॲक्टिव्ह) आहेत. सध्या लम्पी आटोक्यात असला तरी पावसाळी वातावरण असल्याने शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी. पावसाळ्यात गोठ्यात कीटक, माशा वाढतात. त्यामुळे प्रतिबंधात्मक फवारणी करून गोठ्यात स्वच्छता ठेवावी. लक्षणे आढळल्यास तात्काळ पशुसंवर्धन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. - डॉ. दशरथ दिघे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यंदा मरतूक कमीमागील वर्षी बाधीत जनावरांचा आकडा ५० हजारांच्या पुढे गेल्याने ४ हजारांहून अधिक जनावरांचा मृत्यू चार महिन्यात झाला होता. यंदा मात्र गेल्या तीन महिन्यात केवळ २६७ जनावरांचा मृत्यू झाला आहे. १४ लाख जनावरांचे लसीकरणजिल्ह्यात सर्व म्हणजे १४ लाख जनावरांचे लसीकरण पशुसंंवर्धन विभागाने पूर्ण केले. त्यामुळे यंदा लंपीचा प्रादुर्भाव आटोक्यात राहिला. जन्मलेल्या वासरांचे लसीकरणही तातडीने करण्यात येत आहे. आठवडे बाजार अजून बंदचलम्पी साथ आटोक्यात असली तरी अजून प्रादुर्भाव आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व जनावरांचे बाजार, तसेच खरेदी-विक्री बंद करण्यात आलेली आहे. अद्याप एकही बाजार सुरू झालेला नसल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर