शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

प्रभावी लसीकरणामुळे यंदा लम्पी आटोक्यात, सध्या केवळ ८२६ बाधीत

By चंद्रकांत शेळके | Updated: September 26, 2023 18:36 IST

सध्या जिल्ह्यात केवळ ८२६ बाधीत जनावरांची संख्या आहे.

अहमदनगर : जिल्ह्यात लम्पी साथरोगाची लागण आटोक्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात केवळ ८२६ बाधीत जनावरांची संख्या आहे. मागील वर्षी हाच आकडा ५० हजारांपर्यंत गेला होता. तरीही पावसाळ्यामुळे आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या आहेत.

मागील वर्षी राज्यात ॲागस्ट २०२२ पासून जनावरांमध्ये लंपी साथरोगाचा कहर पहायला मिळाला. ॲागस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत मोठ्या संख्येने बाधित जनावरांची संख्या वाढली. डिसेंबरपर्यंत बाधित जनावरांचा आकडा ५० हजारांच्या पुढे गेला होता. दरम्यान जनावरे मृत्यू होण्याचे प्रमाणही खूप होते. मागील वर्षीच्या लंपी लाटेत ४ हजारांहून अधिक जनावरे दगावली.

दरम्यान, पशुसंवर्धन विभागाने मोहीम राबवून दोन महिन्यात १०० टक्के लसीकरण केले. याशिवाय आवश्यक तेथे तातडीने उपचार, गोठा स्वच्छता, धूर फवारणी आदी उपाययोजना केल्याने डिसेंबरअखेरपर्यंत साथ आटोक्यात आली होती. पुढे ही संख्या कमी होत अगदी दोन आकड्यांवर आली.दरम्यान, जुलै २०२३ पासून लंपीच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा डोके वर काढले. प्रारंभी आठवड्याला १०० ते २०० बाधित जनावरांची संख्या ॲागस्टमध्ये आठवड्याला ६०० पर्यंत गेली. परंतु पशुसंवर्धन विभागाने तातडीने उपाययोजना केल्या. जन्मलेल्या वासरांचेही लसीकरण केल्याने लंपी आटोक्यात आला. यंदा जुलैपासून एकूण ४ हजार ६७८ जनावरे बाधित झाली. त्यातील ३ हजार ५८५ जनावरे उपचाराने बरी झाली. सध्या केवळ ८२६ जनावरे बाधित (ॲक्टिव्ह) आहेत. सध्या लम्पी आटोक्यात असला तरी पावसाळी वातावरण असल्याने शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी. पावसाळ्यात गोठ्यात कीटक, माशा वाढतात. त्यामुळे प्रतिबंधात्मक फवारणी करून गोठ्यात स्वच्छता ठेवावी. लक्षणे आढळल्यास तात्काळ पशुसंवर्धन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. - डॉ. दशरथ दिघे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यंदा मरतूक कमीमागील वर्षी बाधीत जनावरांचा आकडा ५० हजारांच्या पुढे गेल्याने ४ हजारांहून अधिक जनावरांचा मृत्यू चार महिन्यात झाला होता. यंदा मात्र गेल्या तीन महिन्यात केवळ २६७ जनावरांचा मृत्यू झाला आहे. १४ लाख जनावरांचे लसीकरणजिल्ह्यात सर्व म्हणजे १४ लाख जनावरांचे लसीकरण पशुसंंवर्धन विभागाने पूर्ण केले. त्यामुळे यंदा लंपीचा प्रादुर्भाव आटोक्यात राहिला. जन्मलेल्या वासरांचे लसीकरणही तातडीने करण्यात येत आहे. आठवडे बाजार अजून बंदचलम्पी साथ आटोक्यात असली तरी अजून प्रादुर्भाव आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व जनावरांचे बाजार, तसेच खरेदी-विक्री बंद करण्यात आलेली आहे. अद्याप एकही बाजार सुरू झालेला नसल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर