शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
5
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
6
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
7
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
8
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
9
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
10
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
11
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
12
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
13
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
14
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
15
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
16
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
17
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
18
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
19
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
20
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना

प्रभावी लसीकरणामुळे यंदा लम्पी आटोक्यात, सध्या केवळ ८२६ बाधीत

By चंद्रकांत शेळके | Updated: September 26, 2023 18:36 IST

सध्या जिल्ह्यात केवळ ८२६ बाधीत जनावरांची संख्या आहे.

अहमदनगर : जिल्ह्यात लम्पी साथरोगाची लागण आटोक्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात केवळ ८२६ बाधीत जनावरांची संख्या आहे. मागील वर्षी हाच आकडा ५० हजारांपर्यंत गेला होता. तरीही पावसाळ्यामुळे आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या आहेत.

मागील वर्षी राज्यात ॲागस्ट २०२२ पासून जनावरांमध्ये लंपी साथरोगाचा कहर पहायला मिळाला. ॲागस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत मोठ्या संख्येने बाधित जनावरांची संख्या वाढली. डिसेंबरपर्यंत बाधित जनावरांचा आकडा ५० हजारांच्या पुढे गेला होता. दरम्यान जनावरे मृत्यू होण्याचे प्रमाणही खूप होते. मागील वर्षीच्या लंपी लाटेत ४ हजारांहून अधिक जनावरे दगावली.

दरम्यान, पशुसंवर्धन विभागाने मोहीम राबवून दोन महिन्यात १०० टक्के लसीकरण केले. याशिवाय आवश्यक तेथे तातडीने उपचार, गोठा स्वच्छता, धूर फवारणी आदी उपाययोजना केल्याने डिसेंबरअखेरपर्यंत साथ आटोक्यात आली होती. पुढे ही संख्या कमी होत अगदी दोन आकड्यांवर आली.दरम्यान, जुलै २०२३ पासून लंपीच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा डोके वर काढले. प्रारंभी आठवड्याला १०० ते २०० बाधित जनावरांची संख्या ॲागस्टमध्ये आठवड्याला ६०० पर्यंत गेली. परंतु पशुसंवर्धन विभागाने तातडीने उपाययोजना केल्या. जन्मलेल्या वासरांचेही लसीकरण केल्याने लंपी आटोक्यात आला. यंदा जुलैपासून एकूण ४ हजार ६७८ जनावरे बाधित झाली. त्यातील ३ हजार ५८५ जनावरे उपचाराने बरी झाली. सध्या केवळ ८२६ जनावरे बाधित (ॲक्टिव्ह) आहेत. सध्या लम्पी आटोक्यात असला तरी पावसाळी वातावरण असल्याने शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी. पावसाळ्यात गोठ्यात कीटक, माशा वाढतात. त्यामुळे प्रतिबंधात्मक फवारणी करून गोठ्यात स्वच्छता ठेवावी. लक्षणे आढळल्यास तात्काळ पशुसंवर्धन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. - डॉ. दशरथ दिघे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यंदा मरतूक कमीमागील वर्षी बाधीत जनावरांचा आकडा ५० हजारांच्या पुढे गेल्याने ४ हजारांहून अधिक जनावरांचा मृत्यू चार महिन्यात झाला होता. यंदा मात्र गेल्या तीन महिन्यात केवळ २६७ जनावरांचा मृत्यू झाला आहे. १४ लाख जनावरांचे लसीकरणजिल्ह्यात सर्व म्हणजे १४ लाख जनावरांचे लसीकरण पशुसंंवर्धन विभागाने पूर्ण केले. त्यामुळे यंदा लंपीचा प्रादुर्भाव आटोक्यात राहिला. जन्मलेल्या वासरांचे लसीकरणही तातडीने करण्यात येत आहे. आठवडे बाजार अजून बंदचलम्पी साथ आटोक्यात असली तरी अजून प्रादुर्भाव आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व जनावरांचे बाजार, तसेच खरेदी-विक्री बंद करण्यात आलेली आहे. अद्याप एकही बाजार सुरू झालेला नसल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर