शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

पंधरा वर्षांतील सर्वात कमी पाऊस : जिल्ह्यात टँकरने ओलांडली शंभरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 10:44 IST

गेल्या पंधरा वर्षांतील सर्वात कमी पावसाची नोंद यंदा झाल्याने दुष्काळाची दाहकता जाणवू लागली आहे. त्यामुळे आॅक्टोबरअखेर टँकरने शंभरी ओलांडली असून, प्रशासनाने सुमारे २ लाख लोकांना पाण्याची व्यवस्था केली आहे.

अहमदनगर : गेल्या पंधरा वर्षांतील सर्वात कमी पावसाची नोंद यंदा झाल्याने दुष्काळाची दाहकता जाणवू लागली आहे. त्यामुळे आॅक्टोबरअखेर टँकरने शंभरी ओलांडली असून, प्रशासनाने सुमारे २ लाख लोकांना पाण्याची व्यवस्था केली आहे. अजून हिवाळ्याचे तीन व उन्हाळ्याचे चार असे सात महिने टंचाईचा सामना करायचा असल्याने यंदा टँकरचा उच्चांक नोंदवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.जिल्ह्याच्या पावसाची सरासरी ४९७ मिमी आहे. यंदा जून ते आॅक्टोबरअखेर केवळ ३४५ मिमी (६९ टक्के) पावसाची नोंद झाली. जी गेल्या पंधरा वर्षांतील निचांकी नोंद आहे. याआधी २००३ मध्ये ३०३ मिमी पाऊस झाला होता. त्यानंतर २००४ ते २०१० अशी सात वर्षे जिल्ह्यात ५०० मिमीच्या पुढे पाऊस होऊन सरासरी ओलांडली. पुन्हा २०११, १२, १४ व १५ ही चार वर्षे सरासरीच्या कमी पाऊस झाला. त्यामुळे या चार-पाच वर्षांच्या कालावधीत टँकरची संख्या ३०० ते ५००च्या दरम्यान राहिली. २०१५मध्ये अवघा ३९२ मिमी पाऊस झाल्याने पुढील मे २०१६अखेर प्रचंड टंचाई निर्माण होऊन टँकरची संख्या तब्बल ८२६वर गेली. २०१६ व २०१७मध्ये उच्चांकी ६७८ व ८०३ मिमी पाऊस झाला. त्यामुळे मे २०१७ अखेर अवघे ११४ टँकर सुरू होते. परंतु यंदा भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. आॅक्टोबरअखेरच जिल्ह्यात १०१ टँकरने ८५ गावे व ४०१ वाडी-वस्तींच्या सुमारे २ लाख १ हजार ६१ नागरिकांची तहान भागवली जात आहे. पुढील सात महिने पुरेल एवढे पिण्याचे पाणी व जनावरांचा चारा, तसेच दुष्काळी उपाययोजना करताना जिल्हा प्रशासनाची दमछाक होणार आहे.सध्या जिल्ह्यात १०१ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जसे प्रस्ताव येतील तसे टँकर मंजूर होत आहेत. सध्याच्या ठेकेदाराची मुदत आॅक्टोबरअखेर संपत आहे. त्यानंतर पुन्हा निविदा काढून टँकरसाठी ठेकेदार निवडले जातील. - जयसिंग भैसडे, नायब तहसीलदार, टंचाई विभाग२०१७ ८०३ ११४ १००

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय